Divyamarathi provides the all Akola News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
पुढचा सामना गमावला तरी अव्वल
सर्वांत
मोठी
भागीदारी
पहिल्यांदा सलग ५ सामन्यांत
विरोधी संघाला सर्वबाद करून
जिंकला भारत. पूल एमध्ये
टॉपवर राहणार. १९८७ मध्ये
गटात सर्वोच्च स्थानी होता. पण
त्या वेळी एक सामना हरलो होतो.
भारताचा आयर्लंडवर
आठ विकेटने विजय
५वा विजय ३३३धावा झाल्या
धवनच्या या कपमध्ये.
३७२ धावांसह कुमार
संगकारा पुढे आहे.
९ सलग विजय
वर्ल्ड कपमध्ये
दोन विक्रम
भारताचा पुढचा सामना शनिवार, १४ मार्चला झिम्बाब्वेशी. | आजचा सामना : श्रीलंका स्कॉटलंड सकाळी ९ पासून.
पहिल्यांदाच पराभवाविना
भारत टाॅपवर
आयर्लंड
२५९ (४९)
भारत
२६०/२ (३६.५)
मॅन ऑफ
द मॅच
८४ चेंडूंत १०० वर शिखर ८ वे वनडे शतक. आठही वेळा भारत विजयी.११ चौकार | ५षटकार | २६धावा धावून
१५ वेळा २०१३ नंतर
३ अथवा त्यापेक्षा जास्त
विकेट घेणारा महंमद शमी
पहिला गोलंदाज.
{सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आठ
विजयांचा विक्रम धोनीने मोडला.
विंडीजच्या लॉइडच्या
विक्रमाशी बरोबरी.
कपिलच्या नावे ११ सामने
जिंकण्याचा विक्रम.
१७४ धावा धवन-रोहितच्या वर्ल्ड कपमध्ये
भारताची सर्वाधिक सलामीची भागीदारी.
१९९६ मध्ये सचिन - जडेजाच्या १६३ धावा.
{धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कपमध्ये
सर्वाधिक १२ सामने जिंकले.
अकोला बुधवार, ११ मार्च २०१५
एकूण पाने १२+४=१६ । किंमत ~३.००*
सेन्सेक्स 28709.87
मागील 28,844.78
सोने 26,750.00
मागील 26,830.00
चांदी 38,000.00
मागील 38,000.00
डॉलर 62.76
मागील 62.55
यूरो 67.48
मागील 68.02
सुविचार
हार मानणे ही आमची सर्वांत मोठी
कमजोरी आहे. एक वेळ पुन्हा
प्रयत्न करणे हा यशस्वी होण्याचा
सर्वांत चांगला मार्ग आहे.
थॉमस अल्वा एडिसन
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २३३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
सीआयएसएफमध्ये
१०,८०० जणांची भरती
नवी दिल्ली | केंद्रीय औद्योगिक
सुरक्षा दल यावर्षी १०,८००
कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
सीआयएसएफचे महानिदेशक
अरविंद रंजन यांनी ही माहिती
दिली. आतापर्यंत दलात ३-५
हजार जणांची भरती होत होती.
राहुल गांधी यांच्यावर
खटला चालणार
मुंबई | आपल्याविरोधातील
मानहानीचा खटला रद्द करावा,
अशी मागणी करणारा काँग्रेस
उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अर्ज
मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून
लावला. संघाच्या कार्यकर्त्यांनी
गांधी यांची हत्या केली होती, असा
आरोप राहुल यांनी केला होता.
छोट्या कारसाठी आता
दुप्पट विमा शुल्क
नवी दिल्ली | छोट्या कारचा
थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम
१ एप्रिलपासून दुप्पट होईल. १
हजार सीसीपर्यंतच्या कारच्या
प्रीमियममध्ये १०७.७९ टक्के
वाढीचा इर्डाचा प्रस्ताव आहे.
जास्त खाण्यावर लॉकेट
घालणार लगाम
न्यूयॉर्क | अमेरिकन संशोधकांनी
‘विअरसेन्स’ हे उपकरण बनवले
आहे. ते
युजरला जास्त
खाण्यापासून
रोखेल. ते
गळ्यात
हाराप्रमाणे
घालावे लागेल. ते युजरच्या
स्मार्टफोनशी जोडलेले असेल.
भाटी हत्याकांडात डी. पी.
यादवसह चौघांना जन्मठेप
डेहराडून | उत्तर प्रदेशचा बाहुबली
नेता डी. पी. यादवसह चार
जणांना सीबीआय कोर्टाने
जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा
दंडही झाला. १९९२ मध्ये उ. प्र.
तील दादरीचे आमदार महेंद्र भाटी
खून प्रकरणात ही शिक्षा झाली.
दिव्यमराठीविशेष
कर्नल सासऱ्याकडून मेजरचेच ‘काेर्टमार्शल’!
काैटुंबिक कलहामुळे निधड्या छातीचा मेजर पती त्रस्त, घटस्फाेटासाठी घेतली न्यायालयात धाव
मंगेश फल्ले | पुणे
लष्करात कर्नल पदावर वडील असल्याने
अापला पतीही लष्करातील अधिकारीच
असावा, अशी एका तरुणीची इच्छा हाेती.
त्यानुसार तिने मेजर असलेला जाेडीदार
शाेधून विवाह केला. मात्र, थाेड्याच दिवसांत
ही तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी मेजर पतीला
मानसिक, शारीरिक, अार्थिक त्रास देणे सुरू
केले. कर्नल सासराही पदाचा रुबाब दाखवत
छळू लागला. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेजरने
अाता घटस्फाेटासाठी अर्ज केला अाहे.
मयूर (नाव बदलले अाहे) हा तरुण
लष्करात मेजर अाहे. चार वर्षांपूर्वी त्याचा
नीलम (नाव बदलले अाहे) या शिक्षकेशी
अांतरजातीय विवाह झाला. मयूरची अाई
शास्त्रज्ञ, तर वडील उद्याेजक अाहेत. मयूर
जम्मू-काश्मिरात असताना नीलमचे वडीलही
तेथेच कर्नल हाेते. दाेन्ही कुटुंबीय पुणेकर
असल्याने विवाह लवकरच जुळला. मात्र,
थाेड्याच िदवसांत नीलम पती व सासरच्यांना
तालावर नाचवू लागली. मयूर जम्मूत
असल्याने त्याच्या अाई-वडिलांनी सुनेचे सर्व
हट्ट पुरवले. मात्र ती त्यांनाच अपमानास्पद
वागणूक देऊ लागली. दारू िपणे, पाेर्न िफल्म
पाहणे, रात्री उशिरा घरी येणे, पतीचे फाेन न
उचलणे असे तिचे वागणे सुरू झाले. त्यामुळे
घटस्फोटासाठी त्याने अर्ज केला आहे.
संरक्षण मिळाले, पण गैरवापर टाळा
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुप्रिया काेठारी म्हणाल्या, कायद्याने महिलांना
हक्क व संरक्षण िदले अाहे, मात्र त्याचा गैरवापर हाेता कामा नये.
देशसेवेसाठी काम करणाऱ्यांसाठी कुटुंबीयांपेक्षा देश महत्त्वाचा
असताे, ही बाब तरुणींनी लक्षात घ्यावी. घरातील ताण नसेल तरच
लष्कर, पाेलिस दलातील व्यक्ती सक्षमपणे कर्तव्य बजावू शकताे.
सासऱ्यानेच छळले
जम्मूतील रक्त गाेठवणाऱ्या थंडीत
सीमेवर मयूर काम करत हाेता.
मात्र अाई- वडिलांकडून नीलमचे
‘पराक्रम’ फाेनवर समजू लागल्याने
त्याला मनस्ताप व्हायचा. त्यातच
कर्नलपदी असलेला सासरा अापल्या
पदाचा गैरवापर करून वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या मदतीने मयूरचा
नाेकरीत छळ करू लागला. त्यामुळे
मयूरने बदलीसाठी अर्ज केला.
त्यानुसार पश्चिम बंगालमधील
िसलिगुडी येथे त्याची बदली झाली.
बुलडाणा | बारावीच्या जीवशास्त्र
या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे
पार्सल मंगळवारी दुपारी वाघजाळ
फाट्याजवळ आढळून आले आहे.
यामुळे टपाल खात्याचा भोंगळ
कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बारावी उत्तरपत्रिकेचे
पार्सल आढळले
प्रतिनिधी । वरूड (अमरावती)
खरगपूर आयआयटीमधून इंजिनीअर बनलेल्या
आणि एनटीपीसीमध्ये कार्यरत तरुण अभियंत्याने
अभियंता पत्नीसह दोन मुलींना मध्य प्रदेशातील
मुलताई घाटात कारमध्ये पेट्रोल ओतून जिवंत
जाळले. तिघीही जिवंत जळताना तो स्वत: बघत
होता. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार ४ मार्च
रोजी रात्री घडला. मात्र आत्महत्या करण्याचा
प्रयत्न फसलेल्या इंजिनीअरने पोलिसांना ९ मार्च
रोजी सकाळी पोलिसांना माहिती दिली. आज १०
मार्चला त्याला मुलताई पोलिसांच्या ताब्यात देण्यात
आले. संपूर्ण कुटुंबीयांना असाध्य रोग असल्याने
आम्ही सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला होता,
असे जखमी अवस्थेतील प्रविण मनवर या ३८
वर्षीय तरुणाने पोलिसांना सांगितल्याचे कळाले.
मात्र त्याच्या या 'कहानी'वर पोलिसांचा विश्वास
बसलेला नाही.
जिवंत जळालेली पत्नी शिल्पा (वय ३२),
मुलगी शर्वरी (वय १०) व परिणीता (वय २)
यांचा गंभीर भाजल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.
प्रवीण मनवरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,
कारंजा लाड (जि. वाशीम) येथील रहिवासी
असलेल्या प्रवीणचा विवाह अमरावती येथील श्याम
नगरातील शिल्पा यांच्याशी झाला होता. प्रवीण
उच्चविद्याविभूिषत असून, त्याने खरगपूर येथील
आयआयटीमधून उर्वरित पान. १२
आयआयटीअनपतीनेअभियंता
पत्नी,मुलींनाजिवंतजाळले
प्रवीण मनवर.
थरारक | वाशीम जिल्ह्यातील कारंजाच्या प्रविण मनवरचे कृत्य
असाध्य रोगामुळे सामूहिक
आत्महत्या करण्याची कहानी'
पोलिसांना अमान्य, मध्य प्रदेशातील
मुलताई घाटातील घटना
आत्महत्येचा प्रयत्न फसल्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण
याच कारमध्ये
प्रवीणने पत्नी
व दोन मुलींना
जाळून मारले.
पेट्रोल शिंपडून कार पेटवली
अपघात भासवून आत्महत्या करण्यासाठी प्रवीणने
कारमध्ये पेट्रोल िशंपडले. पेट्रोलच्या वासामुळे पत्नी,
मुली बेशुद्ध पडल्या. कार मुलताई-वरूड मार्गावर
असलेल्या प्रभात पट्टनलगतच्या मुलताई घाटात
आल्यानंतर प्रवीणने कार पहाडीवाले बाबा मंदिराच्या
वळणावर येऊन कार दीडशे ते दोनशे फुट खोल दरीत
घातली. यातच सर्वच जण जखमी होऊन बेशुद्ध पडले.
काही वेळानंतर प्रवीणला शुद्ध आली. त्यानंतर त्याने
कार पेटवून िदली. दरम्यानच्या काळात पत्नी व लहान
मुलगी परिनीताही जागी झाली. त्यामुळे परिनीताला
वाचवा, असा टाहो पत्नी िशल्पाने फोडला. त्यामुळे
कारबाहेर येऊन त्याने परिणीताला वाचवण्याचा
अयशस्वी प्रयत्न केला. काही वेळातच कारने
भडका घेतल्यामुळे कुणालाच वाचवणे प्रवीणला शक्य
झाले नाही.
आत्महत्येचा प्रयत्न फसला
पत्नी व मुलींना डोळ्यांदेखत जळताना पाहून प्रवीण
बेशुद्ध झाला. काही वेळानंतर शुद्ध आल्यानंतर दोन
मुलींसह पत्नीचा कोळसा झाल्याचे त्याला िदसले.
त्यानंतर शर्टच्या साहाय्याने प्रवीणने गळफास घेऊन
आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु तोही अयशस्वी
झाल्याने तो घटनेच्या िदवसापासून इकडे- ितकडे
िफरत होता. दरम्यान, सोमवारी ९ मार्चला प्रवीणने
स्थानिक गुन्हे शाखेत जाऊन घटनेची माहिती
पोलिसांना िदली. मंगळवारी गुन्हे शाखेचे पोलिस
पथक प्रवीणला घेऊन मंगळवारी घटनास्थळावर
तपासासाठी गेले होते. तेथे दोन मुलींसह पत्नीचा
भाजून मृत्यू झाल्याचे आढळून आले. घटनास्थळ
मुलताई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे
प्रवीणला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
देण्यात आले.
काँग्रेसचे कौतुक, भाजप धारेवर
सरकारच्या विरोधात
शिवसेनाच आक्रमक
विशेष प्रतिनिधी। मुंबई
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आमदारांनी
मंगळवारी सरकारची चांगलीच खरडपट्टी
काढली. काँग्रेसच्या काळात तरी कापसाला
जास्त भाव मिळत होता, असा घरचा आहेर माजी
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला, तर जळगाव
िजल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील यांनी
शेतकऱ्यांच्या मनातून हे सरकार ७५ टक्के उतरले
आहे, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढविला.
गुलाबराव पाटील यांनी सरकारवर हल्ला
चढवीतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
यांनाही शालजोडीतून चिमटे काढत त्यांच्यावर
अप्रत्यक्षपणे पक्षपाताचा आरोप केला. पाटील यांचे
भाषण अत्यंत आक्रमक झाले आणि विरोधकांनी
बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. उत्तर
महाराष्ट्रात मुलींची लग्ने थांबली आहेत. हे सरकार
शेतकऱ्यांच्या मनातून ७५ टक्के उतरले आहे.
शेतकऱ्यांची संघटना नाही. उद्या सर्व शेतकरी एक
झाले तर आमदारांना पळ उर्वरित .पान १२
प्रतिनिधी । कन्नड
कॉपीमुक्त परीक्षेचा डंका सर्वत्र
जोरदार सुरू असतानाच औरंगाबाद
जिल्ह्यातील कन्नड येथील न्यू
हायस्कूल या दहावीच्या परीक्षा
केंद्रावर बीजगणित विषयाची
प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या
तब्बल अर्धा तास अगोदरच चार
शिक्षक सोडवताना कन्नड पोलिसांनी
रंगेहाथ पकडले.
मंगळवार दि. १० रोजी सकाळी ११
ते दुपारी १ या वेळात इयत्ता दहावीचा
बीजगणिताचा पेपर सकाळी ११ ते १ या
वेळेत होता. मात्र, कन्नड येथील न्यू
हायस्कूल या परीक्षा केंद्रावर सकाळी
साडेदहा वाजता म्हणजे प्रत्यक्ष पेपर
सुरू होण्याच्या उर्वरित पान. १२
दहावी पेपर फोडला, ४ शिक्षक अटकेत
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
वादग्रस्त भूसंपादन विधेयक लोकसभेत आवाजी
मतदानाने मंजूर झाले. पण सरकारची खरी परीक्षा
आता राज्यसभेत होईल. सरकार तेथे अल्पमतात
आहे. हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवावे,
असा विरोधकांचा आग्रह आहे. विरोधकांनी ५२
दुरुस्त्या दिल्या होत्या. त्या एक तर परत घेण्यात
आल्या किंवा नामंजूर झाल्या.
सरकारने नाराज सहकारी आणि विरोधकांच्या
स्वीकृतीसाठी विधेयकात ९ दुरुस्त्या केल्या.
दोन नवीन तरतुदीही केल्या. त्यानंतर अकाली
दलाने सहमती दर्शवली, पण शिवसेना आणि
स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे समाधान झाले
नाही. ते तटस्थ राहिले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस,
समाजवादी पक्ष, राजद व बीजेडीनेही सभात्याग
केला. अण्णाद्रमुकने सरकारला साथ दिली.
चर्चेलाउत्तरदेतानाग्रामीणविकासमंत्रीचौधरी
वीरेंद्र सिंह म्हणाले की, शेती व शेतकऱ्यांच्या
हिताच्या सूचना यापुढेही स्वीकारल्या जातील.
मूळ कायद्यात खासगी भूसंपादनासाठी
७०-८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या
सहमतीची अट होती. ती समाविष्ट करण्याची
तृणमूलचे सौगत रॉय यांची दुरुस्ती ९४ विरुद्ध २९४
मतांनी फेटाळण्यात आली.
विरोधकांचा पवित्रा पाहता हे विधेयक
राज्यसभेत मंजूर होणे अवघड आहे. २४५
सदस्यांच्या सभागृहात २४१ सदस्य आहेत.
विधेयक मंजुरीसाठी १२२ खासदारांचा पाठिंबा
हवा आहे. १२४ खासदार तर थेट विरोधात आहेत.
दुरुस्त्यांसह भूसंपादन' मंजूर
लोकसभेत शिवसेना तटस्थ, आता राज्यसभेत सरकारची परीक्षा
पाच प्रमुख दुरुस्त्या अशा :
{ इंडस्ट्रिअल कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग
आणि रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंनी एक-एक
किमीपर्यंत मर्यादित. { शेतमजुरांच्या
प्रभावित कुटुंबातील एका सदस्याला
अनिवार्य रोजगार. { जिल्हा स्तरावरील
सुनावणी आणि तक्रार निवारणासाठी
यंत्रणा. { कमीत कमी जमिनीचे
अधिग्रहण. {सोशल इन्फ्रास्ट्रक्चर
प्रोजेक्ट्ससाठी सूट ही तरतूद हटवली.