Divyamarathi provides the all Jalgaon News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १९१ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
जळगाव मंगळवार, २४ मार्च २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ~३.००
सेन्सेक्स 28192.02
मागील 28261.08
सोने 26800.00
मागील 26,900.00
चांदी 40,300.00
मागील 40,300.00
डॉलर 62.27
मागील 62.46
केळी (रावेर) 725
फरक 20.00
सुविचार
आपण सर्वांना मदत करू
शकत नाही; पण प्रत्येक
जण कोणाला ना कोणाला
निश्चितच मदत करू शकतो.
- रोनाल्ड रिगन
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
यूजीसीचे पोर्टल सोडवणार
विद्यार्थ्यांच्या समस्या
नवी दिल्ली | विद्यापीठ अनुदान
आयोगाचे (यूजीसी) पोर्टल
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण
करेल. www. Ugc.ac.in/gv1/
हेपोर्टललाँचझाले.त्यावरविद्यार्थी
तक्रार करू शकतील. कारवाई,
सद्य:स्थितीही पाहू शकतील.
बीएमबीच्या महिनाभरात
नऊ नव्या शाखा उघडणार
विजयवाडा | भारतीय महिला
बँकेच्या या महिनाअखेरीस
आणखी ९ शाखा उघडतील.
त्यामुळे बँकेच्या एकूण शाखांची
संख्या ६० होईल. बँकेच्या
सीएमडी उषा अनंतसुब्रमण्यन
यांनी सोमवारी ही माहिती दिली.
‘स्वच्छ भारत’ अभियानाला
१ हजार कोटींचे दान
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’
अभियानाला आतापर्यंत १०००
कोटी रुपयांचे दान मिळाले आहे.
देशातील मोठ्या कंपन्यांनी ही
रक्कम दिली. त्यातून ग्रामीण
भागात विकास कामे हाेतील.
अमृतसर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा
हजारे यांनी सोमवारी सुवर्ण मंदिराला
भेट देऊन दर्शन घेतले.
अण्णांचे वाहेगुरू
जळगावचा पारा ३८अंश
पुणे | राज्यात अवकाळी पावसाचे
वातावरण निवळले असून, पारा चढू
लागल्याने उन्हाळ्याची तीव्रता जाणवू
लागली अाहे. यापुढे पारा चढण्याची
शक्यता असल्याचा अंदाज हवामान
खात्याने वर्तवला अाहे. साेमवारी
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
भिरा (जि. रायगड) येथे ४१ अंश, तर
सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव
येथे १८ अंश सेल्सियस इतकी झाली.
राज्यात उन्हाचा
पारा चढू लागला
तापमान
{ जळगाव : ३८.८ १८
{ औरंगाबाद : ३७.४ २२.२
{ अकोला : ३९ २१.३
{ अमरावती : ३७.६ २३.४
{ पुणे : ३८ १९.३
{ नाशिक : ३८ १९.८
कमाल किमान
विशेष प्रतिनिधी | मुंबई
महाराष्ट्रात गुटखाविक्रीत सहभागी
असलेल्यांवर अजामीनपात्र गुन्ह्याच्या
कलमांतर्गत कारवाई केली जाईल,
अशी माहिती राज्य सरकारने
सोमवारी दिली. राज्यात गुटखा
निर्मिती व विक्रीवर पूर्णतः बंदी आहे.
मात्र, शेजारच्या राज्यांतून महाराष्ट्रात
मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.
अन्न व औषध प्रशासनमंत्री
गिरीश बापट विधानसभेत म्हणाले,
आजवर ७२,८८७ दुकानांची तपासणी
व ३,४१८ ठिकाणी ३८ कोटींंचा गुटखा
सापडला. आरोपींवर भादंविच्या ३२८
(विष व इतर बाबींच्या माध्यमातून
जिवे मारण्याचा प्रयत्न) कलमांतर्गत
गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्याचे
ते म्हणाले. गुटखा विक्री करणाऱ्या
दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी
मागणी अनेक आमदारांनी केली.
गुटखाविक्री
अजामीनपात्र
राज्य सरकारचे आदेश
१ एप्रिलपासून रेल्वे
प्लॅटफॉर्म तिकीट ~ १०
नवी दिल्ली | येत्या १ एप्रिलपासून
रेल्वेने प्लॅटफाॅर्मच्या तिकिटात
दुपटीने वाढ केली अाहे. अाता हे
तिकीट १० रुपयांत मिळेल, अशी
माहिती रेल्वे मंत्रालयाने िदली
आहे. यापूर्वी प्लॅटफाॅर्म तिकीट
पाच रुपयांत मिळत हाेते.
पाक उच्चायुक्तांना हुरियत
नेते भेटले; भारत नाराज
दाेन्ही देशांच्या चर्चेत तिसऱ्या पक्षाला स्थान नाही : भारताचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
पाकिस्तान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित
समारोहात पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल
बासित यांनी हुरियत नेत्यांना आमंत्रण दिल्यामुळे
भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दोन्ही देशांमधील चर्चेत कोणत्याही तिसऱ्या पक्षास
मुळीच स्थान नसल्याचे भारताने या वेळी स्पष्ट केले.
उच्चायुक्त बासित यांनी हुरियत नेते सय्यद अली
शाह गिलानी, मीरवाइज उमर फारुख यांच्यासह
अनेक फुटीरतावादी नेत्यांना समारोहास आमंत्रित
केले हाेते. सोबतच तुरुंगातून सुटका झाल्यामुळे
वादात अडकलेल्या मसरत आलमलाही आमंत्रण
होते. मात्र, तब्येतीचे कारण देत त्याने दिल्लीत
येण्याचे टाळले. दरम्यान, बासित म्हणाले की,
भारताला यावर काही आक्षेप असेल असे मला
वाटत नाही. प्रसारमाध्यमे उगाच हा मुद्दा उकरून
काढत आहेत; परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे
प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
करत सांगितले की, भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा
सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मुळीच
गरज नाही.
मोदींचे शरीफ यांना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ
यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पाकिस्तान दिनाच्या
शुभेच्छा देत सल्लाही दिला आहे. भारत आणि पाकने
चर्चेच्या माध्यमातून सर्व समस्यांचे निराकरण करायला
हवे. मात्र, चर्चेपूर्वी दहशतवाद आणि हिंसामुक्त
वातावरण तयार होणे आवश्यक आहे.
पाकला मैत्री हवीय : ममनून
इस्लामाबाद । आम्हाला भारताशी मैत्री हवी असून
काश्मीर प्रश्नासह सर्व मुद्द्यांचे निराकरण व्हावे, अशी
आमची इच्छा असल्याचे पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून
हुसेन यांनी साेमवारी म्हटले आहे.
परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चा रद्द झाली होती
पाकिस्तानी उच्चायुक्तांची हुरियत
नेत्यांशी असलेली जवळीक नवीन
नाही. मागच्या ३० वर्षांत याचा
अनेकदा प्रत्यय आला आहे.
मागच्या वर्षी बासित आणि हुरियत
नेत्यंाच्या भेटीमुळे भारताने परराष्ट्र
सचिवस्तरीय चर्चाच रद्द केली
होती. तरीसुद्धा पाकिस्तानने यातून
काहीच धडा घेतला नाही. परराष्ट्र
सचिव एस.जयशंकर इस्लामाबाद
दौऱ्यावर गेले असताना बासित
यांनी कट्टर हुरियत नेता
गिलानीच्या घरी जाऊन याविषयी
चर्चा केली होती.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी पाकिस्तानने
दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवावे, असा इशारा रविवारी दिला होता. सोमवारी
पुन्हा त्यांनी घुसखोरी थांबवण्यास सांगितले आहे. पीडीपी सदस्य यशपाल
शर्मा यांनी याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
घुसखोरी
बंद करा
: मुफ्ती
सहनिबंधकांचे जिल्हा
बंॅकेच्या एमडींना पत्र
प्रतिनिधी । जळगाव
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बंॅके
(जेडीसीसी)मध्ये राखीव जागांसाठी
झालेल्या नाेकरभरतीत गैरव्यवहार
झाल्याचे स्पष्ट झाले अाहे. यासंदर्भात
सहकार विभागाने केलेल्या चाैकशीत
पाच जणांवर कारवाई करण्याचे
अादेश देण्यात अाले अाहेत.
तत्कालीनविराेधीपक्षनेतेएकनाथ
खडसे व िजल्हा नियाेजन समिती
सदस्य बाळासाहेब पवार यांनी जिल्हा
बंॅकेच्या नाेकरभरती प्रक्रियेत अार्थिक
गैरव्यवहार झाल्याचा अाराेप केला
हाेता. तसेच या प्रकरणाची चाैकशी
करण्याची मागणीही सहकारमंत्र्यांकडे
केली हाेती. त्यानुसार सहकार
विभागाने चाैकशी करून विभागीय
सहनिबंधकांकडे अहवाल पाठवला
हाेता. भरतीप्रक्रियेतील चार
उमेदवारांच्या कागदपत्रांसाेबत
अनुभवाचे बाेगस दाखले जाेडण्यात
अाले अाहेत. या दाखल्यांबाबत
चाैकशी केली असता संबंधित
संस्थांनी हे उर्वरित. पान १२
भरतीप्रकरणी पाच
जणांवर कारवाई करा
अहवाल मागवला
बंॅकेच्या भरतीप्रक्रियेबाबत तयार
झालेला अहवाल विभागीय
सहनिबंधकांकडे पाठवण्यात अाला
हाेता. याप्रकरणी नाशिक विभागीय
सहनिबंधकांनी जिल्हा बंॅकेच्या एमडींना
पत्र पाठवून कारवाईचे अादेश दिले.
दरम्यान, बंॅकेने या पत्राच्या अनुषंगाने
कारवाई करण्यासाठी सहकार
विभागाकडे चाैकशी अहवालाची मागणी
केली हाेती. हा अहवाल २३ मार्च राेजी
बंॅकेकडे पाठवण्यात अाला अाहे.
शिर्डीत १ एप्रिलपासून
ितरुपतीप्रमाणे पेड दर्शन
शिर्डी | शिर्डी येथे साईसमाधी
दर्शनासाठी व्हीअायपी पेड
दर्शनाची सुविधा १ एप्रिलपासून
सुरू होणार अाहे. ितरुपती
बालाजी संस्थानप्रमाणे सामान्य
साईभक्तांनाही पैसे भरून
व्हीअायपींप्रमाणे दर्शन घेता येईल.
दिव्य मराठी नेटवर्क । जळगाव
जळगाव जिल्ह्यात सोमवारी
लाचखाेरांवर फास अावळला
गेला. जळगाव,
भुसावळ अाणि
कजगावात
कारवाई करीत
तीन लाचखाेरांना
पकडण्यात अाले.
लाचलुचपत
विभागाच्या टीमने
(एसीबी) एकामागून एक अशा तीन
लाचखोरांना जाळ्यात अडकवत
हॅट्ट्रिक साधली. जळगावात
मक्तेदाराची िबले काढण्यासाठी
अडवणूक करून चार हजारांची लाच
मागणारा उर्वरित. पान १२
लाचखोरांवरफासअावळला
जळगाव, भुसावळ, कजगावात केलेल्या कारवाईने एसीबीची हॅट्ट्रिक
संजय नेवे
भुसावळात कारागृह शिपायास पकडले
भुसावळ येथील दुय्यम कारागृहातील अाराेपीला
भेटण्यासाठी त्याचा मित्र गेला होता. या वेळी
शिपाई अमाेल बबनराव वाघ याने त्याच्याकडे
५०० रुपयांची मागणी केली. फिर्यादीकडून
१०० रुपये घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाचे उपअधीक्षक डी. डी. गवारे यांनी
कारागृहात प्रवेश करून वाघला ताब्यात घेतले.
कजगावात तलाठ्यावर कारवाई
शेतजमिनीची वाटणी करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारताना
कजगाव येथील तलाठी धनराज भावराव मोरे यास रंगेहाथ पकडले.
वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीची वाटणी करण्यासाठी
तक्रारदाराने अर्ज दाखल केला होता. १९ मार्च २०१५ रोजी तलाठी
धनराज मोरे व मंडळाधिकारी महाडिक यांची तक्रारदाराने काम पूर्ण
होण्यासाठी भेट घेतली. या कामासाठी सहा हजार रुपयांची मागणी
केली हाेती. लाच घेताना माेरेला रंगेहाथ पकडण्यात अाले.
अमाेल वाघ
{भाजपचे सरकार सत्तेत आले तर महिनाभरात
धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश
करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी
बारामतीत आंदोलकांना दिले होते.
मुंबई | निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजपने धनगर समाजाला अनुसूचित
जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी मुंबईच्या आझाद मैदानावर
भव्य मोर्चा काढण्यात आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले.
विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
धनगर आरक्षण; आधी मोर्चा, मग वादळी चर्चा...
शशी कपूर यांना फाळके पुरस्कार
प्रतिनिधी | मुंबई/ नवी दिल्ली
‘जब जब फूल खिले’, कभी कभी,
दीवार आदी चित्रपटांतून चार दशके
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना २०१४
वर्षाचा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च
दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
झाला आहे.
नुकतेच ७७व्या वर्षात पदार्पण
केलेले शशी कपूर पुरस्काराचे ४६वे
मानकरी ठरले. सुवर्णकमळ, १०
लाख रुपये व शाल असे पुरस्काराचे
स्वरूप आहे. व्यावसायिक व समांतर
चित्रपट व रंगभूमी गाजवणाऱ्या कपूर
यांच्या नावावर पुरस्कार समितीच्या
शिफारशीनंतर शिक्कामोर्तब झाले.
याअाधी पृथ्वीराज अाणि राज कपूर
यांना हा सन्मान मिळाला हाेता.
१६० वर चित्रपट
शशी कपूर यांनी १६०
चित्रपटांमध्ये भूमिका व
अनेक चित्रपटांची निर्मिती
केली. २०११मध्ये त्यांना
पद्मभूषण सन्मान मिळाला.
शशी कपूर यांनी ‘अाग’
अाणि ‘अावारा’ या चित्रपटात
बालकलाकार म्हणून
काम केले हाेते. १९६१
मधील ‘धर्मपुत्र’ चित्रपटात
त्यांनी प्रथमच मुख्य नायक
साकारला.
तिसरे कपूर
‘कपूर घराण्यातील
व्यक्तीस मिळालेला हा
तिसरा फाळके पुरस्कार
अाहे.’ असे ट्विट अभिनेते
ऋषी कपूर यांनी केले.
याअाधी पृथ्वीराज अाणि
राज कपूर यांनाही हा
पुरस्कार मिळाला हाेता.
पृथ्वीराज यांचे पुरस्कार
जाहीर झाल्यानंतर निधन
झाल्यामुळे राज कपूर यांनी
पुरस्कार स्वीकारला हाेता.
यासारखे ‘दीवार’मधील गाजलेले संवाद असाेत
वा अापली खास शैलीत चालण्याची लकब असाे,
शशी कपूर यांनी विविध भूमिकांनी त्या काळातील
तरुणाईसह सगळ्यांनाच भुरळ घातली.
‘मेरे पास
माँ है ...’
दिव्यमराठीविशेष कर्णधारांची धडधड वाढली, मॅक्कुलमचे प्रत्येक बॉसला खुले पत्र
कृपया,
मंगळवारी
आपल्या स्टाफला
सुटी द्या. भलेही तुमचा
स्टाफ कार्यालयात
नसेल, पण सुटीत
द. आफ्रिकेवर विजय
मिळवण्यासाठी ते आम्हाला पाठिंबाच देत
असतील याची खात्री बाळगा. या आणि
आम्हाला पाठिंबा द्या. आम्ही स्टेडियममध्ये
आपल्या नावे एक सीट व झेंडाही ठेवला
आहे... झेंडा आपोआप फडकत नाही.
- आपला मॅक्कुलम, ब्लॅक कॅप्स कॅप्टन
१९८३ मध्ये क्रिकेटपटू बॉब हॉक
आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते.
आॅस्ट्रेलियाने अमेरिका कप
जिंकला होता. तेव्हा ते म्हणाले
होत, ‘ज्या बॉसने विजयानंद न
करणाऱ्या कर्मचाऱ्याला काढले
नाही तो वाईटच.’ सोमवारी ते
स्टेडियमवर पोहोचले. मॅचच्या
दिवशी ऑफिसला जावे.
कामासोबत खेळाचा आनंद
घ्या, असे ते म्हणाले.
स्टाफला सुटी द्या, त्यांचा पाठिंबा हवावृत्तसंस्था । ऑकलंड
न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया मायदेशातच
सेमीफायनल खेळत आहेत.
तरीही दबाव एवढा आहे की ते
देशवासीयांकडे पाठिंबा मागत आहेत.
एमसीजीला सोनेरी रंग द्या, असे
क्लार्कचेमागणे आहे.अर्थातधोनीला
त्यामुळे फरक पडणार नाही. कारण
२६ मार्चच्या ऑस्ट्रेलियासोबतच्या
सेमीफायनलची ७० % म्हणजे
३० हजार तिकिटे भारतीयांनी बुक
केली आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार
मॅक्कुलमने तर देशातील प्रत्येक
बॉसला खुले पत्रच लिहिले आहे.
आफ्रिकेशी लढतीपूर्वी किवीजच्या कर्णधाराचे आवाहन
पहिला सेमीफायनल आज
सकाळी ६.३० पासून
{ न्यूझीलंड ६ वेळा सेमीमध्ये,
पण एकही विजय नाही.
{द. आफ्रिका ३ वेळा अंतिम ४
मध्ये दाखल होऊन बाहेर पडला.
न्यूझीलंड-द. आफ्रिका दोघांना
फायनलची पहिली संधी
वनडे : दोघांत ६१ लढती. न्यूझीलंड
२०, ३० आफ्रिका विजयी
वर्ल्ड कप : दोघांत ६ सामने, ४
न्यूझीलंडने, २ आफ्रिकेने जिंकले.
३२ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे
पीएम म्हणाले हाेते...
गुरुदत्त तिवारी | भोपाळ
वाहन विम्यासाठी दरवर्षी तारीख
लक्षात ठेवण्याची गरज राहणार
नाही. आता एकाच वेळी ३ वर्षांची
विमापॉलिसीघेतायेईल.हीपॉलिसी
झीरो डिप्रिसिएशनची असेल.
म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या
वर्षी वाहनावर एकसारखा क्लेम
मिळेल. न्यू इंडिया अॅशुअरन्सची
ही पॉलिसी २० ते २५ टक्क्यांपर्यंत
स्वस्त मिळेल. सध्या सरकारी व
खासगी क्षेत्रातील विमा कंपन्या
स्कूटर, मोटारसायकल सारख्या
दुचाकीसाठी पहिल्या वर्षासाठी
विमा म्हणून २००० रुपये घेतात.
दुचाकीचा वाहन
विमा त्रैवार्षिक
एकाच वेळी काढणे शक्य