Divyamarathi provides the all Nashik News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. नाशिक सोमवार, ९ मार्च २०१५
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १२+६=१८ | किंमत ~ ३.५०
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २४५ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
ज्येष्ठ पत्रकार विनोद
मेहता यांचे निधन
नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार,
पायोनियर, आउटलूकचे संपादक
विनोद मेहता
(७३) यांचे
फुफ्फुसाच्या
आजाराने
निधन झाले.
संध्याकाळी
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात
आले. हरहुन्नरी, स्वच्छंदी.. पान १०
आज लाँच होणार अॅपलची
आयवॉच, एप्रिलमध्ये विक्री
सॅन फ्रान्सिस्को | अॅपलची
बहुचर्चित स्मार्टवॉच सोमवारी
रात्री उशिरा लाँच होईल. त्याची
विक्री एप्रिलपासून सुरू होऊ
शकते. या आयवॉचची किंमत ३५
हजार रुपये असू शकते.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विजयी
ऑस्ट्रेलिया श्रीलंका
376/9 (50) 312/10(46.2)
अफगाणिस्तान न्यूझीलंड
186/10 (47.4) 188/4 (36.1)
वर्ल्डकपिवंडो
आजचे सामने
इंग्लंड बांगलादेश
सकाळी 9.00 वाजेपासून
सलग 3 शतके,
6 चौकारांचा विक्रम
{श्रीलंकेच्या
संगकाराचे सलग
तिसरे शतक.
वर्ल्डकपमध्ये
प्रथमच.
{दिलशानने
सलग सहा
चौकार ठोकले.
वनडेत प्रथमच
अशी कामगिरी.
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
आयटीबीपीमध्ये पहिल्यांदा
महिला अधिकाऱ्याची भरती
नवी दिल्ली | भारत-तिबेट सीमा
पोलिस दलाने प्रथमच महिला
अधिकाऱ्यांच्या भरतीचा निर्णय
घेतला. हे अधिकारी भारत-चीन
सीमेवर तैनात असतील. आजवर
आयटीबीपीत महिलांचा समावेश
करण्यात आलेला नव्हता.
आजपासून विधिमंडळाचे
अर्थसंकल्पीय अधिवेशन
मुंबई | सोमवारी युती सरकारचे
पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन
सुरू होत आहे. १८ मार्चला
अर्थसंकल्प सादर हाेईल. काँग्रेस-
राष्ट्रवादीनेपूर्वसंध्येलासरकारतर्फे
आयोजित चहापानावर बहिष्कार
टाकला. सविस्तर. पान ४
मंदार जोशी | औरंगाबाद
पेला अर्धा सरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं ।
पेला अर्धा भरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं ।
सरला आहे म्हणायचं की, भरला आहे म्हणायचं ।
तुम्हीच ठरवा! सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत
की गाणं म्हणत । तुम्हीच ठरवा!
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या या ओळींनुसार
काळोख पसरला तरी प्रकाशाची आस बाळगून
नितीन गुलाबराव चव्हाण या ३८ वर्षांच्या तरुणाने
अपंगत्वावर मात करत यशस्वी व्यावसायिक बनून
दाखवले. गेल्या ९ वर्षांत पाय जमिनीवर न ठेवता
आकाशाला गवसणी घालणारी कर्तबगारी
केली. उठता-बसता येत नसल्याने खाटेवरूनच व्यवसाय
सांभाळत त्यांनी वर्षाला तीन कोटींची उलाढाल केली.
हैदराबादला जाताना १ मार्च २००६ रोजी पहाटे नितीन
यांच्या चारचाकीचा अपघात झाला. १५ दिवस त्यांना शुद्ध
नव्हती. नंतर आपली मान व मेंदू तेवढा कार्यरत असल्याची
जाणीव त्यांना झाली. मज्जारज्जूला (स्पायनल कॉर्ड) आघात
झाल्यामुळे हातापायांसह इतरही अवयवांची हालचाल करणे
शक्य नव्हते. त्यामुळे अपघातातून का वाचलो, एवढाच विचार
करीत ते रडत असत. या खडतर प्रसंगात पत्नी प्राची यांची साथ
त्यांना होती. दुर्घटनेच्या महिनाभर आधी या दांपत्याला मुलगा
झाला होता. मुलगी प्रांजल व मुलगा प्रणव असा नितीन यांचा
परिवार. नितीन यांची देखभाल करत प्राचीने त्यांना जगण्याची
प्रेरणा दिली. उमेद जागवली. उर्वरित. पान १२
दुकानात झोपूनच लॅपटाॅपवर व्यवहार
दुकानात नितीन यांनी लाकडी पार्टिशन करून त्यात पलंग टाकला
आहे. सकाळी १० वाजता दुकानात आल्यावर ते या पलंगावर झोपून
लॅपटॉप हँडल करतात, मोबाइलवर ग्राहकांशी संवाद साधतात.
राज्यातील आघाडीच्या सीसीटीव्ही डीलरमध्ये त्यांचे नाव आहे.
खाटेवर पडल्या पडल्या व्यवसाय, ३ कोटी रुपयांची उलाढालविभागीय डीलर, ८० उपवितरक
युरीन इन्फेक्शन, उठता-बसता येत नाही अशा अवस्थेतही
नितीन यांनी वार्षिक तीन कोटींची उलाढाल केली.
औरंगाबादेत हडकोत त्यांची वेव्हज टेलिकॉम नावाने
फर्म आहे. काही कंपन्यांचे सीसीटीव्ही, सोलार हिटरची
मराठवाड्याची त्यांची डीलरशिप आहे. ८० उपवितरकांना
ते माल पुरवतात. दुकानात दहा जण काम करतात.
अपघातात
अपंग झालेल्या
नितीन चव्हाण
यांच्या जिद्दीची
प्रेरक कथा
पत्नी प्राची
यांनी जागवली
जगण्याची उमेद,
आज विभागाची
सीसीटीव्हीची
डीलरशिप
नितीन चव्हाण
सात व्यवसाय : चिकलठाण हे नितीन यांचे मूळ गाव.
दहावीनंतर ते औरंगाबादला आले. एम.कॉम. केले. या
काळात एसटीडी चालवणे, काॅइन बॉक्स विक्री व दुरुस्ती,
मोबाइलची डीलरशिप, नेट कॅफे असे उद्योग त्यांनी केले.
सुखद
सोमवार
वृत्तसंस्था | जम्मू/श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला
तुरुंगातून फुटीर नेता मसरत आलमची
सुटका केल्याच्या मुद्यावरून
राज्याच्या आघाडी सरकारमधील
भाजप आणि पीडीपी या दोन पक्षांत
दरी निर्माण झाली आहे. हा एकतर्फी
निर्णय असल्याची प्रतिक्रिया भाजपने
व्यक्तकेली,तरयानिर्णयातभाजपचा
सहभाग होता, असा दावा पीडीपीने
केला. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने
या प्रकरणी राज्य सरकारकडून
अहवाल मागवला आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची रविवारी
जम्मूत बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष
जुगलकिशोर शर्मा बैठकीनंतर
म्हणाले, ‘मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद
सईद यांनी हा निर्णय घेताना
भाजपला विश्वासात घेतले नाही.
किमान समान कार्यक्रमात नसलेल्या
मुद्यांवरील निर्णय अथवा वक्तव्य
आम्ही स्वीकारणार नाही. पीडीपीच्या
नेतृत्वाला आमचा आक्षेप कळवू.’
पीडीपीचे प्रवक्ता, शिक्षणमंत्री
नईम अख्तर म्हणाले, ‘आलमची
मुक्तता हा किमान समान कार्यक्रमाचा
महत्त्वाचा भाग आहे. राज्यात
शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व
संबंधितांशी चर्चा करू, असे त्यात
म्हटले होते. नेत्यांना तुरुंगात ठेवून
त्यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही.’
दरम्यान, ‘न्यायालयाने आलमची
मुक्तता केली आहे आणि गृह
मंत्रालयाने त्याची अंमलबजावणी
केली,’ असा दावा पीडीपीचे दुसरे
मंत्री इम्रान अन्सारी यांनी केला.
मसरतच्या सुटकेमुळे
भाजप-पीडीपीत दरी
तणाव | हा एकतर्फी निर्णय : भाजप; निर्णयात भाजपही सहभागी : पीडीपी
स्थिती का बिघडवत आहेत : काँग्रेस
नवी दिल्ली | जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजप सरकारच्या
या निर्णयाचा आम्ही धिक्कार करत आहोत. पंतप्रधानांनी
याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी आमची मागणी
आहे. एकतर्फी निर्णय घेऊन आघाडी सरकार राज्यातील
शांततापूर्ण वातावरण का बिघडवत आहे? पंतप्रधानांची त्याला
सहमती आहे का, हे पंतप्रधानांनी सांगावे, अशी मागणी
काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली.
कोण आहे मसरत आलम
आलम हुरियत कॉन्फरन्सचा कट्टरवादी गट मुस्लिम लीगचा
अध्यक्ष आहे. हुरियतचे नेतृत्व करणारे सय्यद अली शाह
गिलानी यांचा तो उत्तराधिकारी मानला जातो. २०१० मध्ये
भारतविरोधी आंदोलन प्रकरणातील तो आरोपी आहे. या
आंदोलनानंतरच राज्यभर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये
१२० लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले
नाहीत अशा राजकीय कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य
सरकारने घेतला होता. त्यानुसार आलमची सुटका झाली आहे.
आलमला पुन्हा
अटक करावी :
प्रवीण तोगडिया
जम्मू | आलमला पुन्हा
अटक करावी, अशी मागणी
विहिंप नेते प्रवीण तोगडिया
यांनी केली. ते म्हणाले,
पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या
नेत्यांचे कान पिळून त्यांना
खुर्चीवरून कसे खेचायचे,
हे जनतेला ठाऊक आहे.
राज्यातील जनतेला गरज आहे
ती रोजगार, शिक्षण, व्यापार
आणि पर्यटनाची, दहशतवाद
वाढवण्याची नव्हे.
सन्मानासाठी हजार
सरकारे कुर्बान :
भाजप आमदार
नवी दिल्ली । भाजपच्या युवा
शाखेचे प्रदेशाध्यक्ष आणि
आमदार रवींद्र रैना म्हणाले,
मसरतची सुटका करण्याची
गरज नव्हती. त्याला राजकीय
नेता म्हणणे योग्य नाही.
आलम कट्टर अतिरेकी आहे.
देशाच्या सन्मानासाठी आम्ही
अशा हजार सरकारांची कुर्बानी
द्यायला तयार आहोत.
भाजप कोणत्याही परिस्थितीत
समझोता करणार नाही.
सुटका करून
उपकार केले नाहीत
: मसरत आलम
{ सुटका झाल्यानंतर आलम
म्हणाला, ‘मला अनेकदा अटक
करण्यात आली. तीन वेळा
जामीनही मिळाला. त्यामुळे
माझी पुन्हा सुटका होणे ही
मोठी गोष्ट नाही. मी बहुतांश
आयुष्य तुरुंगातच व्यतित केले
आहे. कोणी माझ्या सुटकेवरून
आरडाओरड करत असेल तर ती
त्यांची डोकेदुखी आहे. सरकार
बदलल्यामुळे वस्तुस्थिती बदलत
नाही. मग भलेही सरकार आम्ही
बदललेले असो की जनतेने.’
{ काश्मीर खोऱ्यात भारतविरोधी
आंदोलनात आलमला अटक
झाली होती. जून २०१० पासून तो
बारामुल्ला तुरुंगात होता. आता
सुटका झाल्याने सरकार आणि
फुटीरवाद्यांमध्ये चर्चा पुन्हा सुरू
होईल का, या मुद्यावर मसरत
म्हणाला, ‘हुरियत कॉन्फरन्स
याबाबत निर्णय घेईल. आम्ही
(मुस्लिम लीग) फोरमचा भाग
आहोत. चर्चेबाबत फोरम जो निर्णय
घेईल तो आम्ही मान्य करू.’
नवनिर्मिती मुंबईतील चार िवद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी बनवले तंत्रज्ञानाने सज्ज ‘वूमन सेफ्टी जॅकेट’
खबरदार..! छेड काढाल तर बसेल शाॅकगणेश डेमसे | नाशिक
विद्यार्थिनी, तरुणी, वर्किंग वूमन्स, मध्यमवयीन
अशा सर्वच स्तरातील महिलांमध्ये सध्या छेडछाड,
अत्याचाराच्या वाढत्या घटनांमध्ये प्रतिकार कसा
करावा, ही चिंता सतावत असते. असा बाका प्रसंग
आपल्यावर अाेढावलाच तर त्या िस्थतीत प्रतिकार
करणेवमदतमिळविणेसाेपेव्हावे,यासाठीमुंबईतील
चार विद्यार्थिनींनी जॅकेटच्या रूपाने विजेचा जाेरदार
धक्का देणारे स्वसंरक्षणाचे कवच तयार केले आहे.
नाशिकमध्ये भरलेल्या डिपेक्स प्रदर्शनात हे
‘वूमन सेफ्टी जॅकेट’ सादर करण्यात आले. त्याचे
सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते परिधान
केलेल्या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न झाल्यास
ितला हात लावणाऱ्या व्यक्तीला विजेचा तीव्र धक्का
बसताे. धाेक्याचा बझर वाजतो अाणि माेबाइलद्वारे
अाप्तांना संबंधित महिला अडचणीत असल्याची
सूचनाही त्वरित दिली जाते. उर्वरित. पान १२
डिपेक्स प्रदर्शनात प्रात्यक्षिक
दाखविताना मुंबईतील विद्यार्थिनी.
अँड्रॉइड अॅपशी कनेक्ट
कंट्रोलर युनिटला ब्लू-टूथ
कनेक्टिव्हिटीने अँड्रॉइड अॅपशी कनेक्ट
करता येते. जॅकेट परिधान केल्यानंतर
ते ब्लू-टूथ डिव्हाइसने मोबाइलशी पेअर
ठेवायचे आहे. अचानक कोणी जॅकेट
जोरात ओढण्याचा प्रयत्न केल्यास ते
कार्यान्वित हाेण्यासाठी स्विच बटण पुश
करताच धाेक्याची सूचना देणारा बझर
वाजताे व तारांमधून वीजप्रवाह सुरू
हाेताे. त्याचवेळी ते ब्लू-टूथद्वारे अँड्रॉइड
अॅपशी कनेक्ट होते. त्यात नाेंद केलेल्या
कुटुंबीयांच्या, नातेवाइकांच्या क्रमांकावर
त्वरित धाेक्याचा संदेश पाठविला जातो.
जीपीएसद्वारे ही घटना कोठे घडली आहे,
हे ट्रॅप करणेही शक्य आहे.
{बाह्यरचना सामान्य जॅकेटप्रमाणे {मधल्या भागात बारीक तारांचे कवच
{ बॅटरी अाॅपरेटेड फंक्शनिंग {मायक्राे कंट्राेलिंग युनिटद्वारे संचलन
{अँड्रॉइड अॅपद्वारे संदेशवहन {जीपीएसच्या माध्यमातून कळणार लाेकेशन.
इनाेव्हेशनला लागले
नऊ हजार रुपये
प्रायाेगिक तत्त्वावर हे जॅकेट तयार
करण्यासाठी नऊ हजार रुपये खर्च
अाला अाहे. मात्र, पेटंट मिळविल्यास
किंवा व्यावसायिक पातळीवर त्याचे
उत्पादन करणे शक्य झाल्यास
एखाद्या ब्रँडेड जॅकेटच्या किमतीत ते
महिलांसाठी उपलब्ध हाेऊ शकते.
अशी अाहे
रचना
दाभाेलकर, पानसरेंनंतर
अाता जितेंद्र अाव्हाड!'
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अामदार जितेंद्र
अाव्हाड यांना जिवे मारण्याची धमकी देणारे
एक पत्र नुकतेच त्यांच्या निवासस्थानी प्राप्त
झाले अाहे. नथुराम विचार मंचच्या नावाने
अालेल्या या पत्रावर नवी मुंबईतील एेराेलीचा
शिक्का असून, पाेलिसांनी हे प्रकरण
गांभीर्याने घेतले अाहे. ‘हे नथुरामचक्र अाहे.
नरेंद्र दाभाेलकर, गाेविंद पानसरे.... अाता
नंबर अाव्हाड अापला अाहे. तुमचा निकाल
लवकरच लागेल,’ असे त्यात म्हटले अाहे.
भारतीय अायटी सल्लागार
महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या
मेलबर्न/बंगळुरू | ऑस्ट्रेलियातील
सिडनीच्या माइंडट्रीतील आयटी कन्सल्टंट
प्रभा अरुणकुमार ऊर्फ अंकल (४१) यांची
शनिवारी त्यांच्या घरापासून जवळच चाकूने
भोसकून हत्या करण्यात आली. त्यांना
नऊवर्षीय मुलगी आहे. प्रभा एप्रिलमध्ये
भारतात येणार होत्या.
नकारात्मक बातम्या
नकारात्मक, पण तुमच्या माहितीसाठी
बंद होणार प्रवेश नियंत्रण
आणि शुल्क नियंत्रण समित्या
प्रतिनिधी | नाशिक
शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसा कमविण्याचे माध्यम
बनल्याचे चित्र सध्या दिसत असून, त्यामुळे
राज्यात अनेक शिक्षणसम्राट तयार झाले
आहेत. एकीकडे गुणवत्तेअभावी या क्षेत्राची
प्रतिष्ठा खालावत आहे, तर दुसरीकडे प्रवेश
व िशक्षणशुल्काच्या (फी) नावाखाली
वारेमाप पैसा जमवला जात आहे. वारेमाप
शुल्क अाकारल्याच्या अनेक तक्रारी येत
असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी
राज्य शासनाने ठोस पावले उचलली अाहेत.
त्याचाच एक भाग म्हणून िवधिमंडळाच्या
उन्हाळी अधिवेशनात फी रेग्युलेशन अॅक्ट'
आणणार असल्याची माहिती राज्याचे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या
कायद्यामुळे पुढील वर्षापासून प्रवेश नियंत्रण
समिती व शुल्क नियंत्रण समिती यांची गरज
राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तावडे यांनी नाशिकमध्ये अायाेजित
डिपेक्स प्रदर्शनाला रविवारी भेट दिली.
त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते
पुढे म्हणाले, काही वर्षांत अनेक संस्थांनी
शिक्षणक्षेत्रातजाळेनिर्माणकेले.प्रवेशदेताना
हजारो ते लाखो रुपयांपर्यंत देणग्या घेतल्या
जात असल्याने शिक्षण घेणे सामान्यांच्या
आवाक्याबाहेर चालले आहे. दरवर्षी खर्चात
वाढ होत असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी
राज्य शासनातर्फे पुढील अधिवेशनात
‘फी रेग्युलेशन अॅक्ट’ हा कायदा आणला
जाईल. त्यामुळे शिक्षणशुल्क अाकारणीवर
पारदर्शकपणे नियंत्रण ठेवले जाईल.
राज्यात अाता फी रेग्युलेशन अॅक्ट'
शिक्षणसम्राटांना राेखण्यासाठी येत्या उन्हाळी अधिवेशनात होणार कायदा : विनोद तावडे
इंजिनिअरिंग सीईटी बोर्ड अभ्यासक्रमानुसार
औरंगाबाद | पुढील वर्षीपासून वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी
एमएचटी सीईटीत केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावर
आधारित परीक्षा पद्धत असेल. इंजिनिअरिंगची जेईई मेन्स
ही बारावीच्याच स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर असेल, अशी
माहिती शिक्षणमंत्री तावडे यांनी दिव्य मराठी'ला दिली.
अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनाने
बदलली लिलावाची कथा
कोळसा खाणींचा लिलाव; सुटी नाही, ५ महिन्यांत रिझल्ट
हेमंत शर्मा | इंदूर
सामान्यत: संथगती किंवा कामात चालढकल
यासाठी केंद्र सरकारची खाती ओळखली
जातात. परंतु, कोळसा खात्याच्या
एका विभागाने रात्रंदिवस कष्ट उपसून
सरकारसाठी १.८१ लाख कोटी रुपये उभे
केले. कोळसा पट्ट्यांच्या लिलावासाठी
नेमलेल्या नामनिर्देशित प्राधिकरणाने पाच
महिन्यांहून कमी वेळेत ही कमाई केली.
एवढेच नाही तर या काळात एक दिवसही
सुटी घेतली नाही. हेच कोळसा पट्टे मागील
सरकारकडून जवळपास मोफत खासगी
हातात सोपवले होते. कॅगने याच कोळसा
पट्ट्यांतून सरकारला १.७६ लाख कोटी
रुपयांचा तोटा झाल्यावरून प्रश्नचिन्ह
उपस्थित केले होते.
एखाद्या सरकारी खात्यात योग्य
अधिकाऱ्यांची निवड आणि कामाप्रति
त्यांची निष्ठा व दक्षतेची ही अत्यंत स्तुत्य
कहाणी आहे. अनेक आरोपांच्या कचाट्यात
सापडलेली ही प्रक्रिया काही अधिकाऱ्यांनी
पारदर्शीच ठरवली नाही, तर त्यातून १.८१
लाख कोटी रुपयेदेखील कमवून सरकारच्या
झोळीत टाकले आहेत. तसेच, आता
दुसऱ्या आणि तिसऱ्या राउंडच्या लिलावाची
सुरुवातच झाली आहे.
कोळसा मंत्रालयातील तज्ज्ञांच्या मते
निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती
आणि दृष्टी नसती तर कदाचित ही प्रक्रिया
एवढी यशस्वी होऊ शकली नसती. केंद्रीय
कोळसा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष
गोयल यांनी हे आव्हान कोळसा सचिव
अनिल स्वरूप यांच्यावर सोपवले होते. या
कामी मंत्रालयातील सर्वात कमी वयाच्या
संयुक्त सचिवाची उर्वरित. पान १२
बाउन्सरला मारहाणप्रकरणी
आदित्य पांचोलीला जामीन
मुंबई | जुहू येथील एका नाइट
क्लबमध्ये बाउन्सरला मारहाण
केल्याप्रकरणी
अभिनेता
आदित्य
पांचोलीला
रविवारी
अटक झाली.
काही वेळानंतर त्याची जामिनावर
सुटका करण्यात आली.