Divyamarathi provides the all aurangabad News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
औरंगाबाद गुरुवार, १२ मार्च, २०१५
एकूण पाने १२+८=२०। किंमत ~३.००
सेन्सेक्स 28659.17
मागील 28709.87
सोने 26,55०.00
मागील 26,750.00
चांदी ३7,55०.00
मागील 38,000.00
डॉलर 62.78
मागील 62.76
यूरो 66.37
मागील 67.48
सुविचार
आयुष्यात कधी पडलो नाही
असे म्हणण्यात मोठेपणा नाही
तर पडल्यानंतर प्रत्येक वेळी
उभे राहणे हाच मोठेपणा आहे.
कन्फ्युशिअस
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २८३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
वाराणसीत एटीएमद्वारे १
रुपयात मिळणार पाणी
लखनऊ|वाराणसीतील गंगा घाट,
संकटमोचन, विश्वनाथ मंदिर
या प्रमुख स्थळांवर लवकरच
२५ वॉटर एटीएम लावले
जातील. त्याद्वारे एक रुपयात
एक लिटर शुद्ध पाणी मिळेल.
वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी
ही माहिती दिली.
चिनी महिला वैमानिक
जेटवर करणार कसरती
बीजिंग | चिनी महिला वैमानिक
पहिल्यांदाच चिनी जेट जे-१० वर
कसरतीकरणारआहेत.त्याचिनी
वायुदलाच्या अॅक्रोबिक संघाच्या
सदस्य आहेत. हा एअर शो पुढील
आठवड्यात मलेशियात होईल.
टॅटू, लांब केसांची मुले
असतात गुंड : पोलिस
बंगळुरू|लांब केस, टॅटू ठेवणारी
मुले गुंड असतात, असे वक्तव्य
बंगळुरूचे पोलिस उपायुक्त
आलोककुमार यांनी केले आहे.
शहरात अशा मुलांवर पोलिस
नजर ठेवून आहेत.
मंजुनाथ हत्याकांडात ६
दोषींना जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने
मंजुनाथ हत्याकांडातील ६ दोषींना
जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आयओसीचे विक्री व्यवस्थापक
मंजुनाथ यांनी तेल माफियांचे
कारनामे उघड केले होते. त्यांची
२००५ मध्ये हत्या झाली होती.
निर्भया डॉक्युमेंट्रीवर आज
हायकोर्टात सुनावणी
नवी दिल्ली | निर्भया अत्याचार
प्रकरणावरील डॉक्युमेंट्रीवरील
बंदी हटवावी, अशी मागणी
करणाऱ्या लॉच्या दोन
विद्यार्थ्यांच्या याचिकेवर दिल्ली
हायकाेर्टात गुरुवारी सुनावणी
होईल. सविस्तर. पान १०
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
स्मार्टर ३ डी स्टडी अॅप लाँच
हैदराबाद | इयता दहावीच्या
विद्यार्थ्यांसाठी स्मार्टर ३ डी स्टडी
अॅप लाँच करण्यात आले आहे.
या अॅपद्वारे आई-वडील आपल्या
मुलांच्या प्रगतीची माहिती
मिळवू शकतील. हे अॅप प्ले
स्टोअरवरून मोफत डाऊनलोड
करता येईल.
नवी दिल्ली | केंद्र सरकारी
कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची मर्यादा
६० वर्षेच आहे. त्यात घट अथवा वाढ
करण्याचा विचार नाही, अशी माहिती
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री
जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत
दिली. दरम्यान, केंद्र सरकारने नव्या
नोकऱ्यांवर बंदी घातलेली नाही, असे
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत
स्पष्ट केले. कुठलेही संवेदनशील
सरकार नोकऱ्यांवर बंदी घालण्याचा
आदेश देऊ शकत नाही, असे त्यांनी
सांगितले. दिल्ली निवडणुकीत या
दोन्ही मुद्द्यांची चर्चा झाली होती.
त्यामुळे सरकारला त्यावर स्पष्टीकरण
द्यावे लागले. यूपीए सरकारच्या
शेवटच्या टप्प्यात सेवानिवृत्तीच्या
वयात वाढ होईल, अशीही चर्चा होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची
निवृत्ती ६० व्या वर्षीच
भाकपचे ज्येष्ठ नेते काॅ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत डाव्या, पुरोगामी अाणि आंबेडकरवादी पक्ष व संघटनांनी राज्य
सरकार व हिंदुत्ववादी संघटनांच्या िवरोधात िवशाल मोर्चा काढला होता. भायखळ्यातून निघालेल्या माेर्चाचे आझाद मैदानावर सभेत रुपांतर झाले.आम्ही सारे पानसरे...
संगकाराने ठोकले
सलग चौथे शतक
आजचा सामना : द. आफ्रिका यूएई सकाळी 6.30 पासून
95 चेंडूंत
124धावा
13 चौकार
4षटकार
54 झेलांचा
विक्रम
{वर्ल्ड कपमध्ये
संगकाराचे
विकेटमागे ५४
झेल. त्याने ऑस्ट्रेलियाच्या
अॅडम गिलख्रिस्टला
(५२)मागे टाकले.
दिलशानही चमकला
१०४ धावा, ९९ चेंडू
१० चौकार, १ षटकार
संगकारा
स्कॉटलंडला १४८ धावांनी हरवले | एका
वर्ल्ड कपमध्ये ४ शतके करणारा संगकारा एकमेव
फलंदाज. मार्क वॉ (१९९६), सौरव गांगुली (२००३) आणि
मॅथ्यू हेडन (२००७) यांनी ३-३ शतके ठोकली होती.
स्कोअर
श्रीलंका
363/9
स्कॉटलंड
215/10
वनडेतही अव्वल |कुमार
संगकारा वनडेत सलग चार
डावांत शतक करणारा जगातील
पहिला फलंदाजही ठरला. यापूर्वी
सहा फलंदाजांनी तीन सलग
डावांत शतक केले होते.
७९ % महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष
दिव्यमराठीविशेष स्वत:च्या जिवापेक्षा ४० टक्के महिलांचे पहिले प्राधान्य कुटुंबालाच
व्यापार प्रतिनिधी | मुंबई
स्वयंपाकघरापासून ते कंपनीचे
बाेर्डरूम ते अगदी स्वत:चा व्यवसाय
अशा वेगवेगळ्या भूमिका अाजच्या
महिला समर्थपणे बजावत अाहेत;
परंतु व्यवसाय व वैयक्तिक जीवनाचा
समताेल राखताना स्वत:च्या
अाराेग्याकडे मात्र दुर्लक्ष हाेत अाहे.
जवळपास ४० टक्के महिलांनी
कुटुंबाला प्राधान्य देण्यास महत्त्व िदले
असले तरी त्यातही भारतीय ७९ टक्के
महिलांनी काेणत्याही चाचण्या न
केल्याचे िकंवा अाजारी पडल्यानंतरच
अाराेग्य तपासणी केली असल्याचे
अायसीअायसीअाय लोम्बार्डच्या
सर्वेक्षणात िदसून अाले अाहे.
महिलांमधील आरोग्याविषयी
जागृती व दृष्टिकोन याचे मूल्यमापन
करण्यासाठी आयसीआयसीआय
लोम्बार्डजनरलइन्शुरन्सतर्फेफेब्रुवारी
महिन्यात १००९ महिलांचे अाॅनलाइन
सर्वेक्षण केले हाेते.
{ सहा महिन्यांत एक-दाेन वेळा
अाजारी पडण्याचे प्रमाण : ४७ %
{ सहा महिन्यांत ३ हून जास्त वेळा
अाजारी पडण्याचे प्रमाण : २४ %
{ आजारी पडल्यानंतरच तपासणी
करणाऱ्या महिला : ६३ %
{ कधीत तपासणी नाही : १६ %
{ वेळेअभावी तपासणी नाही :३१%
{ तपासण्या महाग व अनावश्यक
वाटण्याचे प्रमाण : ३० %
{ अाजारांची कल्पना आहे : ६१ %
{ अद्याप प्रतिबंधात्मक चाचणीच
केलेली नाही : ५९ %
{अाराेग्य विमाच नाही : ४८ %
{ विमा कवच अाहे की नाही याची
कल्पना नसलेल्यांचे प्रमाण : १२ %
{ विमा कवच नसलेल्यांमध्ये
अाराेग्य विमा खरेदी करण्याचा
कधीही विचार न केलेल्या : ५३%
{ स्वतःच विमा खरेदी : २२ %
{ पती/ वडिलांमार्फत आरोग्य विमा
याेजना घेणाऱ्या महिला : ७९ %
{ विमा कवच अाहे, पण त्याचा
तपशील माहिती नाही : ४८ %
{ विम्याच्या दाव्याचा लाभ कसा
घ्यायचा याची माहिती नाही : ४० %
पाहणीचा तपशील आरोग्य विमा जागरूकता
प्रतिनिधी । औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन
फ्लूचा धोका वाढतच चालला
असून मंगळवारी व बुधवारी घाटी
रुग्णालयात आणखी चार जणांचा
मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूमुळे
मृतांची संख्या १३ झाली आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत घाटीत ९४
रुग्ण दाखल झाले होते. त्यातील ४०
जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
होता. यातील १३ जणांचा मृत्यू
झाला, तर उर्वरित २७ रुग्ण बरे
झाले. हे रुग्ण औरंगाबादसह खान्देश,
विदर्भातील होते. आैरंगाबादेतील रुग्ण
जालना, पुणे किंवा मुंबईला जाऊन
आले असल्याचे निरीक्षण आहे.
बुधवारी मृत्युमुखी पडलेल्यांपैकी
तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह होते.
यामध्ये महेंद्र रवींद्र नरवडे (पैठण)
या १० महिन्यांच्या बालकाचा समावेश
आहे. मंगळवारी रात्री ९ वाजता त्याचा
मृत्यू झाला. ७ मार्चपासून त्याच्यावर
उपचार सुरू होते. छावणीतील
रहिवासी शाहेदा बेगम फारूक मोहंमद
(५०) आणि जळगावचे रहिवासी
इंदरचंद देवचंद साखला (४१)
बुधवारी मृत्यू झाला.दोघांवर अनुक्रमे
६ आणि ८ मार्चपासून उपचार सुरू
होते. पैठण येथील खालेद तय्यब शहा
या १८ वर्षीय तरुणाचादेखील स्वाइन
फ्लू वाॅर्डातच उर्वरित .पान १२
औरंगाबादेत स्वाइन
फ्लूने चौघांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात आजपर्यंत मृतांची संख्या १३
आणखी १० रुग्ण
घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डामध्ये सध्या १०
रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील
४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
आहे, तर ५ जण संशयित आहेत.
दुर्लक्ष नको
^सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी आणि
घसा खवखवणे अशी लक्षणे
असल्यास स्वत: किंवा दुकानदारांच्या
सल्ल्याने औषधे घेऊ नका. डायबिटीस
किंवा बीपी असलेले, वयोवृद्ध, बालक
तसेच गर्भवतींनी अधिक काळजी
घेण्याची गरज आहे.
डॉ. सुहास जेवळीकर, अधीक्षक, घाटी
पश्चिम इंग्लंडमध्ये आयोजित
चेलटेनहॅम महोत्सवात शेवटचा
सर्वात अवघड अडथळा पार करताना
रुबी वॉल्श घोडा असा कोसळला.
कपाळमोक्ष
आजविशेष
औरंगाबाद शहराला
मिळाले ७२ कोटी
मनपा निवडणुकीच्या
तोंडावर औरंगाबादचे
पालकमंत्री रामदास
कदम यांनी शहराच्या
विकासासाठी ७२ कोटी रुपयांचा
निधी मंजूर करून घेतला आहे.
दिव्य सिटी .पान १
दमानियांचा राजीनामा,
विश्वासघाताचा आरोप
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
सर्वांना स्टिंग करा असे सांगणाऱ्या
आम आदमी पक्षाचे संयोजक
अरविंद केजरीवाल यांचेच स्टिंग
कोणीतरी जारी केले. दिल्लीत सरकार
स्थापनेसाठी काँग्रेसच्या ६ आमदारांना
फोडून त्यांचा पाठिंबा मिळवावा, असे
केजरीवाल हे आपचे माजी आमदार
राजेश गर्ग यांना सांगत असल्याचे
ऑडिओ टेपमध्ये दिसते. ही टेप
आल्यानंतर अंजली दमानिया यांनी
पक्षाचा राजीनामा दिला.
टेपमधील चर्चा गेल्या वर्षीच्या
ऑगस्टमधील आहे. कुठल्याही
पद्धतीने सरकार स्थापन करण्याचा
केजरीवाल यांचा प्रयत्न सुरू होता.
मनीष शिसोदिया आणि संजय
सिंह यांनीही याबाबत चर्चा केली
होती,’ असे गर्ग म्हणाले. ही टेप
जारी झाल्यानंतर दमानिया यांनी
राजीनामा दिला. ‘मी तत्त्वांसाठी
केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता.
अशा घोडेबाजारासाठी नाही. अशा
मूर्खपणासाठी मी आपमध्ये आले
नव्हते. केजरीवाल यांनी ४८ तासांत
त्याचे उत्तर द्यावे,’ असे ट्विट त्यांनी
केले. दरम्यान, आपने या प्रकाराचा
इन्कार केलेला नाही.
केजरीवालांचेच केले स्टिंग,
सत्तेसाठी दिल्लीत घोडेबाजार
कोलगेट | सहा जणांना आरोपी म्हणून न्यायालयाचे समन्स
मनमोहन हाजिर हो...{उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला,
पी. सी. पारेखांनाही बोलावणे
{सीबीआय न्यायालयात ८ एप्रिल
रोजी हजर राहण्याचे निर्देश
वृत्तसंस्था। नवी दिल्ली
कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ.
मनमोहनसिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत
आहेत. सीबीआय न्यायालयाने बुधवारी त्यांना
आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठी
समन्स बजावले. काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या पाठीशी
उभे राहणार असल्याचे सांगत भूसंपादनाच्या
‘काळ्या कायद्या’वरून लोकांचे लक्ष विचलित
करण्यासाठी भाजप गलिच्छ राजकारण करत
असल्याचा आरोप केला आहे.
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती भरत पराशर
यांनी भादंविच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट),
४०९ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) आणि
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार
हे समन्स बजावले. डॉ. सिंग यांच्याबरोबरच
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा
सचिव पी. सी. पारेख, हिंदाल्कोचे अधिकारी
शुभेंदूअमिताभआणिडी.भट्टाचार्ययांनाहीसमन्स
बजावले. या सर्वांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात
हजर राहायचे आहे. यापूर्वी सीबीआयने डॉ.
मनमोहनसिंग यांची दोन वेळा चौकशी केली आहे.
घोटाळ्याच्या वेळी मनमोहनसिंग यांच्याकडेच
कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता.
सिंग यांनी हिंदाल्कोला अप्रत्यक्ष मदत
केल्याने नेव्हेली लिग्नाइट या सरकारी
कंपनीचे नुकसान झाले. ओडिशातील २०००
मेगावॅटच्या प्रकल्पाला झटका बसला.
मनमोहनसिंग यांनी मंजुरी देऊन प्रक्रियेचे
उल्लंघन केले आहे. सिंग यांनी कोळसा
मंत्रालय स्वत:कडेच ठेवले होते. पंतप्रधान
असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात व्यक्तिश: लक्ष
घालण्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवली जाऊ शकत
नाही, असा दावा ते करू शकत नाहीत.
माजी पंतप्रधानांना आरोपी म्हणून न्यायालयाने समन्स पाठवण्याची ही
दुसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोघेही काँग्रेसचेच आहेत. यापूर्वी
२००० मध्ये न्यायालयाने खासदार खेरदी प्रकरणात पी. व्ही. नरसिंह
राव यांना दोषी ठरवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर त्यांची
निर्दोष मुक्तता केली होती. राव सरकारमध्ये सिंग अर्थमंत्री होते.
हा जीवनाचा भाग
माजी पीएम
दुसऱ्यांदा
आरोपी
समन्समुळे डॉ. मनमोहनसिंग
नाराज झाले. मी निराश आहे,
पण हाही जीवनाचा एक
भागच आहे. सत्य समोर
येईल असा माझा विश्वास
आहे. मला माझी बाजू
मांडण्याची संधी मिळेल, असे
त्यांनी म्हटले आहे.
समन्समध्ये काय म्हटले?
बिर्लांच्या हिंदाल्को
कंपनीला २००५ मध्ये
ओडिशातील तालाबीरा-
२ व तालाबीरा -३ मध्ये
कोळसा खाणी देण्यात
गैरव्यवहार झाला.
तेव्हा कोळसा मंत्रालय
मनमोहनसिंगांकडेच
होते. या प्रकरणी
सीबीआयने क्लोजर
रिपोर्ट दाखल केला.
परंतु न्यायालयाने तो
फेटाळला व सिंगांच्या
चौकशीचे आदेश दिले.
कोळसा मंत्र्यांचा जबाब
गरजेचा नाही का, असे
न्यायालयाने विचारले
होते. पंतप्रधानांच्या
चौकशीची परवानगी
नाही, असे सीबीआयने
सांगितले होते.
प्रकरण असे
काँग्रेस पाठीशी
^मनमोहन सिंग यांच्या
प्रामाणिकपणाबद्दल
कोणालाच शंका नाही.
अख्ख्या देशाला त्यांचा
पारदर्शकपणा माहीत
आहे. भाजप या प्रकरणाचे
राजकारण करत आहे.
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस नेते
औरंगाबादसह जिल्ह्याला बुधवारी रात्री वीजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तास
जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले. (छाया : माजिद खान)
वीजा कडाडल्या, पावसाने झोडपले