Divyamarathi provides the all Jalgaon News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १७९ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
कोलगेट|सहाजणांनाआरोपीम्हणूनन्यायालयाचेसमन्सजारी
मनमोहनसिंग हाजिर हो...{उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला,
पी. सी. पारेखांनाही बोलावणे
{सीबीआय न्यायालयात ८ एप्रिल
रोजी हजर राहण्याचे निर्देश
वृत्तसंस्था। नवी दिल्ली
कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ.
मनमोहनसिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत
आहेत. सीबीआय न्यायालयाने बुधवारी त्यांना
आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठी
समन्स बजावले. काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या पाठीशी
उभे राहणार असल्याचे सांगत भूसंपादनाच्या
‘काळ्या कायद्या’वरून लोकांचे लक्ष विचलित
करण्यासाठी भाजप गलिच्छ राजकारण करत
असल्याचा आरोप केला आहे.
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती भरत पराशर
यांनी भादंविच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट),
४०९ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) आणि
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार
हे समन्स बजावले. डॉ. सिंग यांच्याबरोबरच
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा
सचिव पी. सी. पारेख, हिंदाल्कोचे अधिकारी
शुभेंदूअमिताभआणिडी.भट्टाचार्ययांनाहीसमन्स
बजावले. या सर्वांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात
हजर रहायचे आहे. यापूर्वी सीबीआयने डॉ.
मनमोहनसिंग यांची दोन वेळा चौकशी केली आहे.
घोटाळ्याच्या वेळी मनमोहनसिंग यांच्याकडेच
कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता.
मनमोहनसिंग यांनी हिंदाल्कोला प्रत्यक्षपणे मदत
केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे नेव्हेली
लिग्नाइट या सरकारी कंपनीचे नुकसान झाले.
ओडिशामध्ये २००० मेगावॉटचा प्रकल्प सुरु
करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला. मनमोहनसिंग
यांनी मंजुरी देऊन प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे.
सिंग यांनी कोळसा मंत्रालय स्वत:कडेच ठेवले होते.
पंतप्रधान असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात व्यक्तिश: लक्ष
घालण्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही,
असा दावा ते करू शकत नाहीत.
माजी पंतप्रधानांना आरोपी म्हणून न्यायालयाने समन्स पाठवण्याची देशातील ही
दुसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोन्ही माजी पंतप्रधान काँग्रेसचेच आहेत. यापूर्वी
२००० मध्ये न्यायालयाने खासदार खेरदी प्रकरणात पी. व्ही. नरसिंह राव यांना
दोषी ठरवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली.
नरसिंहराव सरकारमध्ये मनमोहनसिंग अर्थमंत्री होते.
हा जीवनाचा भागच
माजी पंतप्रधान
आरोपी होण्याची
दुसरीच वेळ
समन्स जारी केल्यामुळे डॉ.
मनमोहनसिंग यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. मी निराश आहे पण हाही
जीवनाचा एक भागच आहे. सत्य
समोर येईल असा माझा विश्वास
आहे. तथ्य सादर करताना मला
माझी बाजू मांडण्याची संधी मिळेल,
असे त्यांनी म्हटले आहे.
समन्समध्ये कोर्टाने म्हटले...
बिर्लांच्या हिंदाल्को कंपनीला
२००५ मध्ये ओडिशातील
तालाबीरा-२ व तालाबीरा
-३ मध्ये कोळसा खाणी
देण्यात गैरव्यवहार झाला
होता. तेव्हा कोळसा मंत्रालय
मनमोहनसिंगांकडेच होते.
या प्रकरणी सीबीआयने
क्लोजर रिपोर्ट दाखल केला
होता. परंतु न्यायालयाने
तो फेटाळला आणि
मनमोहनसिंग यांच्या
चौकशीचे आदेश दिले
होते. तत्कालीन कोळसा
मंत्रालयाचा जवाब गरजेचा
नाही काय? असे न्यायालयाने
तेव्हा विचारले होते.
पंतप्रधानांच्या चौकशीची
परवानगी मिळाली नव्हती,
असे सीबीआयने न्यायालयास
सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस पाठीशी
^सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल
कोणालाच शंका नाही. अख्ख्या
देशाला त्यांचा पारदर्शकपणा
माहीत आहे. भाजप या प्रकरणाचे
राजकारण करत आहे. खाण
लिलाव थांबण्यासाठी भाजपच्याच
मुख्यमंत्र्यांनी पत्रे दिली होती.
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते
न्यूजइनबॉक्स
पहलेगुडन्यूज
वाराणसीत एटीएमद्वारे १
रुपयात मिळणार पाणी
लखनऊ|वाराणसीतील गंगा घाट,
संकटमोचन, विश्वनाथ मंदिर
या प्रमुख स्थळांवर लवकरच
२५ वॉटर एटीएम लावले
जातील. त्याद्वारे एक रुपयात
एक लिटर शुद्ध पाणी मिळेल.
वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी
ही माहिती दिली.
चिनी महिला वैमानिक
जेटवर करणार कसरती
बीजिंग | चिनी महिला वैमानिक
पहिल्यांदाच चिनी जेट जे-१० वर
कसरतीकरणारआहेत.त्याचिनी
वायुदलाच्या अॅक्रोबिक संघाच्या
सदस्य आहेत. हा एअर शो पुढील
आठवड्यात मलेशियात होईल.
टॅटू, लांब केसांची मुले
असतात गुंड : पोलिस
बंगळुरू|लांब केस, टॅटू ठेवणारी
मुले गुंड असतात, असे वक्तव्य
बंगळुरूचे पोलिस उपायुक्त
आलोककुमार यांनी केले आहे.
शहरात अशा मुलांवर पोलिस
नजर ठेवून आहेत.
मंजुनाथ हत्याकांडात ६
दोषींना जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने
मंजुनाथ हत्याकांडातील ६ दोषींना
जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आयओसीचे विक्री व्यवस्थापक
मंजुनाथ यांनी तेल माफियांचे
कारनामे उघड केले होते. त्यांची
२००५ मध्ये हत्या झाली होती.
निर्भया डॉक्युमेंट्रीवर आज
हायकोर्टात सुनावणी
नवी दिल्ली | निर्भया अत्याचार
प्रकरणावरील डॉक्युमेंट्रीवरील
बंदी हटवावी, अशी मागणी
करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी
सुनावणी होईल.
कुमार संगकाराचे सलग
चाैथे शतक
आजचा सामना :
दक्षिण आफ्रिका यूएई
सकाळी ६.३० पासून
९५ चेंडूंत
१२४ धावा
13 चौकार
4षटकार
संगकारा
वर्ल्ड कपमध्ये ४ शतके करणारा
कुमार संगकारा ठरला पहिला
खेळाडू. मार्क वॉ (१९९६) आणि
सौरव गांगुली (२००३), मॅथ्यू
हेडन (२००७) यांनी ३-३ शतके
केली होती. सविस्तर. स्पाेर्ट्स
भुसावळ । रेल्वे प्रशासनाने १३ ते २१ मार्चदरम्यान
सुरू हाेत असलेल्या दादर-भुसावळ दादर या
रेल्वेगाडीला जळगाव स्थानकावर थांबा दिला
अाहे. दादर येथून ०१०८१ ही गाडी दर शुक्रवारी
रात्री ९.४५ वाजता सुटेल. जळगावात ती पहाटे
३.३७ वाजेपर्यंत पाेहाेचेल. परतीच्या प्रवासात
०१०८२ ही गाडी शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता
भुसावळ येथून सुटेल. जळगाव स्थानकावर ती
सकाळी ९ वाजता येईल. तसेच महाराष्ट्र एक्स्प्रेस
(११०३९)ला १६ मार्चपासून एक अतिरिक्त
शयनयान काेच जाेडण्यात येणार अाहे.
दादर स्पेशल गाडीला
अखेर जळगावला थांबा
भाकपचे ज्येष्ठ नेते काॅ.
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या
निषेधार्थ बुधवारी मुंबईत डाव्या,
पुरोगामी अाणि आंबेडकरवादी
पक्ष व संघटनांनी राज्य सरकार
व हिंदुत्ववादी संघटनांच्या
िवरोधात िवशाल मोर्चा काढला
होता. भायखळ्यातून निघालेल्या
माेर्चाचे आझाद मैदानावर सभेत
रुपांतर झाले.
आम्ही सारे
पानसरे...
वृत्तसंस्था । मुंबई
गोवंशहत्या बंदी कायदा नेमका
केव्हापासून लागू झाला, ती निश्चित
तारीख सांगा अशी विचारणा करत
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य
सरकारला गुरुवारीच उत्तर देण्यास
बजावले आहे. सरकारने या
कायद्याची अधिसूचना ९ मार्चला
जारी केली होती.
मुंबई उपनगर गोमांस
व्यापारी संघटेनेच्या याचिकेवर
न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि
न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या
खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
संघटनेचे वकील युसूफ मुचला
यांनी सांगितले की, अधिसूचना
जारी करण्याआधीच पोलिसांनी
कत्तलखान्यातून गुरे जप्त केली.
गोवंश हत्याबंदी
कधीपासून?
आजच िनर्णय द्या
कडक शिक्षा
गोमांस विक्री अथवा ते जवळ
बाळगणाऱ्यास प्रतिबंध घालणाऱ्या
महाराष्ट्र सरकारच्या कायद्यावर
राष्ट्रपतींनी अलीकडेच स्वाक्षरी
केली आहे. गोमांसाची खरेदी-
विक्री करताना अथवा ते जवळ
बाळगताना पकडल्यास ५ वर्षे
कैदेच्या शिक्षेची तरतूद या
कायद्यात आहे. तसेच १० हजार
रुपये दंडही हाेऊ शकताे.
जळगाव गुरुवार,१२ मार्च २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ~३.००
सेन्सेक्स 28659.17
मागील 28709.87
सोने 26,650.00
मागील 26,850.00
चांदी 38,500.00
मागील 38,500.00
डॉलर 62.78
मागील 62.76
केळी (रावेर) 675
फरक 25.00
सुविचार
आयुष्यात कधी पडलो नाही
असे म्हणण्यात मोठेपणा नाही
तर पडल्यानंतर प्रत्येक वेळी
उभे राहणे हाच मोठेपणा आहे.
कन्फ्युशिअस
प्रतिनिधी । वरणगाव
निर्मनुष्य रस्ता, निस्तेज होऊन पहुडलेले काकांचे
पार्थिव आणि या पार्थिवाजवळ रात्रभर रडून-रडून
आसवे सुकलेल्या डोळ्यांनी केविलवाणा झालेला
अडीच वर्षीय चिमुरडा. दगडालाही पाझर फुटावा,
असा हा हृदयद्रावक प्रसंग! बुधवारची सकाळ
वरणगावातील वाकोळे कुटुंबाला हादरवून गेली.
एका होतकरू तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे
संपूर्ण गाव सुन्न झाले.
वरणगावातील सिद्धेश्वरनगरातील रहिवासी
अरविंद महादेव वाकोळे (वय २८) हा (एम.
एच.१९, एवाय-०८५२) या दुचाकीने मंगळवारी
आई व भावाचा अडीच वर्षांचा मुलगा त्रिशरण
याला घेऊन भुसावळात बहिणीकडे गेला होता.
रात्री ७.३० वाजेच्या सुमारास बहिणीकडे जेवण
आटोपून अरविंद पुतण्यासह खडका-किन्ही-
वेल्हाळे मार्गाने दुचाकीवरून वरणगावकडे
निघाला. मात्र, रात्र होऊनही घरी न पोहोचल्याने
नातेवाइकांनी अरविंदचा शोध घेतला. मात्र,
उपयोग झाला नाही.
बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास
वेल्हाळे सोडल्यानंतर सतीमाय नाल्याजवळील
खड्ड्यात दुचाकीच्या बाजूला एका तरुणाचा
मृतदेह पादचाऱ्यांना आढळला. मृतदेहाच्या
बाजूलाच एक चिमुरडा हमसून हमसून रडत
होता. ही वार्ता वरणगावातील सिद्धेश्वरनगरात
धडकताच, अरविंदच्या नातेवाइकांनी
घटनास्थळी धाव घेतली. ओळख पटताच त्यांनी
हंबरडा फोडला. वरणगाव पोलिसांनी पंचनामा
करून शवविच्छेदनासाठी मृतदेह वरणगाव
ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. यानंतर दुपारी
३ वाजेच्या सुमारास अरविंदवर अंत्यसंस्कार
करण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची
नाेंद करण्यात अाली अाहे. त्याच्या पश्चात आई,
पत्नी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
काकांच्यामृतदेहाजवळअडीचवर्षीयत्रिशरणचारात्रभरटाहो
सुटीमुळे झाला घात?
ट्रॅक्टरचालक असलेला अरविंद
विल्हाळे येथील राख वाहतुकीची
कामे करायचा. मंगळवारी बाजार
असल्याने कामाला सुटी होती.
यामुळे दिवस-रात्र राख वाहतुकीच्या
ट्रॅक्टरची ये-जा या मार्गावरून
हाेत असते. परंतु सुटीमुळे हा भाग
निर्मनुष्य होता. यामुळे अरविंदच्या
मृत्यूचे प्रकरण रात्री उशिरापर्यंत
उघडकीस आले नाही.
घातपाताचा आरोप
मृत अरविंदचे सात दिवसांपूर्वी
परिसरातील काही लोकांसोबत
भांडण झाले होते. यामुळे त्याचा
मृत्यू अपघात नसून, घातपात
असल्याचा संशय नातेवाइकांनी
व्यक्त केला आहे. मृतावस्थेत
पडलेल्या अरविंदचा डावा हात मोडून
डोक्यावर तीन ते चार मोठ्या जखमा
होत्या. मात्र, त्याच्या पुतण्याला साधे
खरचटलेले सुद्धा नाही.
अरविंद वाकाेळे
त्रिशरण वाकाेळे
{खडका
रस्त्यावरील
प्रकार
{वाकाेळे
कुटुंबीय
हादरले
{घात की
अपघात,
तर्कवितर्क
प्रतिनिधी । जळगाव, फैजपूर
जिल्ह्यात दाेन स्वाइन फ्लू सदृश
अाजाराने दाेन जणांचा मृत्यू झाला
अाहे. यात अामाेदा येथील एक महिला
तसेच जळगावातील एकाचा समावेश
अाहे. यापूर्वी सहा जणांचे मृत्यू स्वाइन
फ्लूने झाले अाहे.
अामाेदा येथील उपसरपंच िवद्या
प्रमाेद सपकाळे
(वय २८)
यांना साेमवारी
दुपारी ३ वाजता
िजल्हा सामान्य
रुग्णालयात
उपचारासाठी
दाखल करण्यात
अाले हाेते. त्यांना उर्वरित. पान १२
िजल्ह्यातील दाेघांचा
‘स्वाइन फ्लू’मुळेे मृत्यू
िवद्या सपकाळे
विधानसभा अध्यक्षांनी
दिली कडक शब्दात समज
प्रतिनिधी। मुंबई
उत्तर महाराष्ट्रातील पाणी गुजरातला
पळवण्याचा मुद्दा आणि जलसंपदामंत्री
गिरीश महाजन यांच्या आक्षेपार्ह
वर्तनामुळे विधानसभेत बुधवारी प्रचंड
गदारोळ झाला. सभागृहाचे कामकाज
एकदा स्थगित करून विधानसभा
अध्यक्षांनी महाजनांना कडक शब्दात
समज दिल्यानंतरच सभागृहाचे
कामकाज होऊ शकले.
दमणगंगा-नार पार-पिंजाळ
प्रकल्पाचे पाणी गुजरातला
वळवण्यावरून माजी मंत्री छगन
भुजबळ यांनी राज्य सरकारला
चांगलेच धारेवर धरले. या संबंधीचा
सामंजस्याचा करार तुम्ही सत्तेत
असतानाच झाला होता, याकडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष
वेधल्यावर आमच्या काळात चुकीचे
निर्णय झाले असतील तर ते निर्णय
रद्द करा, असे प्रति आव्हान त्यांनी
दिले. ही चर्चा सुरू असतानाच उन्मेष
पाटील यांनी भुजबळांच्या भाषणाला
हरकत घेतली. पाटील यांचे भाषण
सुरू असतानाच जलसंपदामंत्री गिरीश
महाजन यांचे आगमन झाले. त्यानंतर
एरंडोलचे आमदार डॉ. सतीश पाटील
यांनी बोलण्यासाठी हात वर केली
असतानाच, त्यांच्याकडे बघून मंत्री
महाजन यांनी आक्षेपार्ह इशारे केले.
यामुळे संतापलेले पाटील आणि
राष्ट्रवादीचे आमदार वेलमध्ये धावले.
माजी मंत्री जयंत पाटीलही आक्रमक
झाले. विरोधी पक्षाचे आमदार
वेलकडे धावताहेत हे बघून सत्ताधारी
आमदारही वेलकडे धावले. यामुळे
निर्माण झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे
पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी
सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी
तहकूब केले. या उर्वरित. पान १२
गिरीश महाजन यांच्या
वक्तव्यावर गदाराेळ
काेणत्या प्रेमाचे प्रतीक
अामदार सतीश पाटील म्हणाले,
‘गिरीश महाजन यांनी आता अापण
मंत्री झाल्याचे विसरू नये. तसेच
अापल्या पदाला साजेसे वर्तन करावे.
मी उभाच नव्हतो, तर मला खाली
बसा सांगायचा प्रश्नच येतोच कुठे?
आमचे प्रेमाचे संबंध असले, तरी
महाजनांचे वर्तन हे कोणत्या प्रेमाचे
प्रतीक आहे? ’
नवी दिल्ली | केंद्र सरकारी
कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची मर्यादा
६० वर्षेच आहे. त्यात घट अथवा वाढ
करण्याचा विचार नाही, अशी माहिती
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री
जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत
दिली. दरम्यान, केंद्र सरकारने नव्या
नोकऱ्यांवर बंदी घातलेली नाही, असे
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत
स्पष्ट केले. कुठलेही संवेदनशील
सरकार नोकऱ्यांवर बंदी घालण्याचा
आदेश देऊ शकत नाही, असे त्यांनी
सांगितले. दिल्ली निवडणुकीत या
दोन्ही मुद्द्यांची चर्चा झाली होती.
त्यामुळे सरकारला त्यावर स्पष्टीकरण
द्यावे लागले. यूपीए सरकारच्या
शेवटच्या टप्प्यात सेवानिवृत्तीच्या
वयात वाढ होईल, अशीही चर्चा होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची
निवृत्ती ६० व्या वर्षीच
७९ % महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष
दिव्यमराठीविशेष स्वत:च्या जिवापेक्षा ४० टक्के महिलांचे पहिले प्राधान्य कुटुंबालाच
व्यापार प्रतिनिधी | मुंबई
स्वयंपाकघरापासून ते कंपनीचे
बाेर्डरूम ते अगदी स्वत:चा व्यवसाय
अशा वेगवेगळ्या भूमिका अाजच्या
महिला समर्थपणे बजावत अाहेत;
परंतु व्यवसाय व वैयक्तिक जीवनाचा
समताेल राखताना स्वत:च्या
अाराेग्याकडे मात्र दुर्लक्ष हाेत अाहे.
जवळपास ४० टक्के महिलांनी
कुटुंबाला प्राधान्य देण्यास महत्त्व िदले
असले तरी त्यातही भारतीय ७९ टक्के
महिलांनी काेणत्याही चाचण्या न
केल्याचे िकंवा अाजारी पडल्यानंतरच
अाराेग्य तपासणी केली असल्याचे
अायसीअायसीअाय लोम्बार्डच्या
सर्वेक्षणात िदसून अाले अाहे.
महिलांमधील आरोग्याविषयी
जागृती व दृष्टिकोन याचे मूल्यमापन
करण्यासाठी आयसीआयसीआय
लोम्बार्डजनरलइन्शुरन्सतर्फेफेब्रुवारी
महिन्यात १००९ महिलांचे अाॅनलाइन
सर्वेक्षण केले हाेते.
{ सहा महिन्यांत एक-दाेन वेळा
अाजारी पडण्याचे प्रमाण : ४७ %
{ सहा महिन्यांत ३ हून जास्त वेळा
अाजारी पडण्याचे प्रमाण : २४ %
{ आजारी पडल्यानंतरच तपासणी
करणाऱ्या महिला : ६३ %
{ कधीत तपासणी नाही : १६ %
{ वेळेअभावी तपासणी नाही :३१%
{ तपासण्या महाग व अनावश्यक
वाटण्याचे प्रमाण : ३० %
{ अाजारांची कल्पना आहे : ६१ %
{ अद्याप प्रतिबंधात्मक चाचणीच
केलेली नाही : ५९ %
{अाराेग्य विमाच नाही : ४८ %
{ विमा कवच अाहे की नाही याची
कल्पना नसलेल्यांचे प्रमाण : १२ %
{ विमा कवच नसलेल्यांमध्ये
अाराेग्य विमा खरेदी करण्याचा
कधीही विचार न केलेल्या : ५३%
{ स्वतःच विमा खरेदी : २२ %
{ पती/ वडिलांमार्फत आरोग्य विमा
याेजना घेणाऱ्या महिला : ७९ %
{ विमा कवच अाहे, पण त्याचा
तपशील माहिती नाही : ४८ %
{ विम्याच्या दाव्याचा लाभ कसा
घ्यायचा याची माहिती नाही : ४० %
पाहणीचा तपशील आरोग्य विमा जागरूकता
दमानियांचा राजीनामा,
विश्वासघाताचा आरोप
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
सर्वांना स्टिंग करा असे सांगणाऱ्या
आम आदमी पक्षाचे संयोजक
अरविंद केजरीवाल यांचेच स्टिंग
कोणीतरी जारी केले. दिल्लीत सरकार
स्थापनेसाठी काँग्रेसच्या ६ आमदारांना
फोडून त्यांचा पाठिंबा मिळवावा, असे
केजरीवाल हे आपचे माजी आमदार
राजेश गर्ग यांना सांगत असल्याचे
ऑडिओ टेपमध्ये दिसते. ही टेप
आल्यानंतर अंजली दमानिया यांनी
पक्षाचा राजीनामा दिला.
टेपमधील चर्चा गेल्या वर्षीच्या
ऑगस्टमधील आहे. कुठल्याही
पद्धतीने सरकार स्थापन करण्याचा
केजरीवाल यांचा प्रयत्न सुरू होता.
मनीष शिसोदिया आणि संजय
सिंह यांनीही याबाबत चर्चा केली
होती,’ असे गर्ग म्हणाले. ही टेप
जारी झाल्यानंतर दमानिया यांनी
राजीनामा दिला. ‘मी तत्त्वांसाठी
केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता.
अशा घोडेबाजारासाठी नाही. अशा
मूर्खपणासाठी मी आपमध्ये आले
नव्हते. केजरीवाल यांनी ४८ तासांत
त्याचे उत्तर द्यावे,’ असे ट्विट त्यांनी
केले. दरम्यान, आपने या प्रकाराचा
इन्कार केलेला नाही.
केजरीवालांचेच केले स्टिंग,
सत्तेसाठी दिल्लीत घोडेबाजार