Divyamarathi provides the all Akola News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
अकोला गुरुवार, १२ मार्च, २०१५
एकूण पाने १२+४=१६। किंमत ~३.००
सेन्सेक्स 28659.17
मागील 28709.87
सोने 26,55०.00
मागील 26,750.00
चांदी ३7,55०.00
मागील 38,000.00
डॉलर 62.78
मागील 62.76
यूरो 66.37
मागील 67.48
सुविचार
आयुष्यात कधी पडलो नाही
असे म्हणण्यात मोठेपणा नाही
तर पडल्यानंतर प्रत्येक वेळी
उभे राहणे हाच मोठेपणा आहे.
कन्फ्युशिअस
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २३४ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
एलआयसी योजना चालवणार. खासगी विमा
कंपन्यांही भाग घेऊ शकतात.
कोण घेऊ
शकतो
पॉलिसी
स्कीमशी कसे
जोडणार
रिस्क
कव्हरेज
हप्ता कसा
देणार
कोणती कंपनी
चालवणार
स्वस्त विम्यासाठी खाते, आधार हवेच
दिव्यमराठीविशेष १२रुपयांतअपघातविमा,तर३३०रुपयांतजीवनविम्याचेनियमनिश्चित
दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली
अर्थ मंत्रालयाने १२ रुपयांत
अपघात विमा आणि ३३० रुपयांत
जीवन विमा संरक्षण देण्यासाठी
नियम निश्चित केले आहेत. पॉलिसी
घेण्यासाठी बँक खाते आणि त्याच्याशी
जोडलेला आधार क्रमांक आवश्यक
आहे. दोन्हींतही २ लाखांचे विमा
संरक्षण मिळेल.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी
अर्थसंकल्पात अपघात विम्यासाठी
प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि जीवन
विम्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा
योजनेची घोषणा केली होती.
प्रधानमंत्री जीवन विमा योजना : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा
१८ ते ७० वर्षांची कुठलीही व्यक्ती. आधार
कार्ड आणि त्याच्याशी जोडलेले बँक खाते
आवश्यक.
१ जूनपर्यंत अर्ज भरून बँकेत जमा करावा.
दरवर्षी पॉलिसी नूतनीकरण आवश्यक.
अपघातात मृत्यू/विकलांग झाल्यास २ लाख,
अंशत: विकलांगतेसाठी १ लाखाचे कव्हर.
विमाधारकाच्या खात्यातून कपात. अनेक
वर्षांची पॉलिसी एकाच वेळीही देता येईल.
ओरिएंटल, नॅशनल, युनायटेड इंडिया, न्यू
इंडिया इन्शुरन्स, खासगी कंपन्याही.
१८ ते ५० वर्षांची व्यक्ती. एखाद्याने ५०
वर्षाआधी पॉलिसी घेतल्यास ५५ वर्षांपर्यंत
सुरू राहील.
कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू
झाल्यास वारसांना २ लाखांचे कव्हर मिळेल.
बँक खात्यातून दरवर्षी कपात. १ वर्षापेक्षा
जास्तचा हप्ता एकत्रित कापता येईल.
दरवर्षी पॉलिसी घ्यावी लागेल. त्यासाठी
कुठलीही तारीख निश्चित केली नाही.
न्यूजइनबॉक्स
पहलेगुडन्यूज
वाराणसीत एटीएमद्वारे १
रुपयात मिळणार पाणी
लखनऊ|वाराणसीतील गंगा घाट,
संकटमोचन, विश्वनाथ मंदिर
या प्रमुख स्थळांवर लवकरच
२५ वॉटर एटीएम लावले
जातील. त्याद्वारे एक रुपयात
एक लिटर शुद्ध पाणी मिळेल.
वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी
ही माहिती दिली.
चिनी महिला वैमानिक
जेटवर करणार कसरती
बीजिंग | चिनी महिला वैमानिक
पहिल्यांदाच चिनी जेट जे-१० वर
कसरतीकरणारआहेत.त्याचिनी
वायुदलाच्या अॅक्रोबिक संघाच्या
सदस्य आहेत. हा एअर शो पुढील
आठवड्यात मलेशियात होईल.
टॅटू, लांब केसांची मुले
असतात गुंड : पोलिस
बंगळुरू|लांब केस, टॅटू ठेवणारी
मुले गुंड असतात, असे वक्तव्य
बंगळुरूचे पोलिस उपायुक्त
आलोककुमार यांनी केले आहे.
शहरात अशा मुलांवर पोलिस
नजर ठेवून आहेत.
निर्भया डॉक्युमेंट्रीवर आज
हायकोर्टात सुनावणी
नवी दिल्ली | निर्भया अत्याचार
प्रकरणावरीलडॉक्युमेंट्रीवरीलबंदी
हटवावी, अशी मागणी करणाऱ्या
याचिकेवर दिल्ली हायकाेर्टात
गुरुवारी सुनावणी होईल.
आजचा सामना :
दक्षिण आफ्रिका यूएई
सकाळी ६.३० पासून
कुमार संगकाराचे सलग
चाैथे शतक
९५ चेंडूंत
१२४ धावा
13 चौकार
4षटकार
संगकारा
वर्ल्ड कपमध्ये ४ शतके करणारा
कुमार संगकारा ठरला पहिला
खेळाडू. मार्क वॉ (१९९६) आणि
सौरव गांगुली (२००३), मॅथ्यू
हेडन (२००७) यांनी ३-३ शतके
केली होती. सविस्तर. पान ९
वृत्तसंस्था । मुंबई
गोवंशहत्या बंदी कायदा नेमका केव्हापासून
लागू झाला, ती निश्चित तारीख सांगा अशी
विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य
सरकारला गुरुवारीच उत्तर देण्यास बजावले
आहे. सरकारने या कायद्याची अधिसूचना ९
मार्चला जारी केली होती.
मुंबई उपनगर गोमांस व्यापारी संघटेनेच्या
याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे
आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या
खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. संघटनेचे
वकील युसूफ मुचला यांनी सांगितले
की, अधिसूचना जारी करण्याआधीच
पोलिसांनी कत्तलखान्यातून गुरे जप्त केली.
गोमांस जप्त करण्यात आले. अधिसूचना
जारी झालेली नसताना पोलिस कारवाई करू
शकत नाहीत, असा युक्तिवाद मुचला यांनी
केला. त्यानंतर खंडपीठाने सरकारकडून उत्तर
मागवले आहे.
गोवंश हत्याबंदी कधीपासून?
{हायकोर्टाची विचारणा {आजच द्यावे लागणार उत्तर
कडक शिक्षा
गोमांस विक्री अथवा ते जवळ बाळगणाऱ्यास
प्रतिबंध घालणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या
कायद्यावर राष्ट्रपतींनी अलीकडेच स्वाक्षरी
केली आहे. गोमांसाची खरेदी-विक्री
करताना अथवा ते जवळ बाळगताना
पकडल्यास ५ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद
या कायद्यात आहे तसेच १० हजार रुपये
दंडाची शिक्षाही केली जाऊ शकते.
कोलगेट|सहाजणांनाआरोपीम्हणूनन्यायालयाचेसमन्सजारी
मनमोहनसिंग हाजिर हो...{उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला,
पी. सी. पारेखांनाही बोलावणे
{सीबीआय न्यायालयात ८ एप्रिल
रोजी हजर राहण्याचे निर्देश
वृत्तसंस्था। नवी दिल्ली
कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ.
मनमोहनसिंग यांच्या अडचणी वाढताना दिसत
आहेत. सीबीआय न्यायालयाने बुधवारी त्यांना
आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठी
समन्स बजावले. काँग्रेसने डॉ. सिंग यांच्या पाठीशी
उभे राहणार असल्याचे सांगत भूसंपादनाच्या
‘काळ्या कायद्या’वरून लोकांचे लक्ष विचलित
करण्यासाठी भाजप गलिच्छ राजकारण करत
असल्याचा आरोप केला आहे.
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती भरत पराशर
यांनी भादंविच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट),
४०९ (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) आणि
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार
हे समन्स बजावले. डॉ. सिंग यांच्याबरोबरच
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा
सचिव पी. सी. पारेख, हिंदाल्कोचे अधिकारी
शुभेंदूअमिताभआणिडी.भट्टाचार्ययांनाहीसमन्स
बजावले. या सर्वांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात
हजर रहायचे आहे. यापूर्वी सीबीआयने डॉ.
मनमोहनसिंग यांची दोन वेळा चौकशी केली आहे.
घोटाळ्याच्या वेळी मनमोहनसिंग यांच्याकडेच
कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता.
मनमोहनसिंग यांनी हिंदाल्कोला प्रत्यक्षपणे मदत
केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे नेव्हेली
लिग्नाइट या सरकारी कंपनीचे नुकसान झाले.
ओडिशामध्ये २००० मेगावॉटचा प्रकल्प सुरु
करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला. मनमोहनसिंग
यांनी मंजुरी देऊन प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे.
सिंग यांनी कोळसा मंत्रालय स्वत:कडेच ठेवले होते.
पंतप्रधान असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात व्यक्तिश: लक्ष
घालण्याची आपल्याकडून अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही,
असा दावा ते करू शकत नाहीत.
माजी पंतप्रधानांना आरोपी म्हणून न्यायालयाने समन्स पाठवण्याची देशातील ही
दुसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोन्ही माजी पंतप्रधान काँग्रेसचेच आहेत. यापूर्वी
२००० मध्ये न्यायालयाने खासदार खेरदी प्रकरणात पी. व्ही. नरसिंह राव यांना
दोषी ठरवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने नंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली.
नरसिंहराव सरकारमध्ये मनमोहनसिंग अर्थमंत्री होते.
हा जीवनाचा भागच
माजी पंतप्रधान
आरोपी होण्याची
दुसरीच वेळ
समन्स जारी केल्यामुळे डॉ.
मनमोहनसिंग यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. मी निराश आहे पण हाही
जीवनाचा एक भागच आहे. सत्य
समोर येईल असा माझा विश्वास
आहे. तथ्य सादर करताना मला
माझी बाजू मांडण्याची संधी मिळेल,
असे त्यांनी म्हटले आहे.
समन्समध्ये कोर्टाने म्हटले...
बिर्लांच्या हिंदाल्को कंपनीला
२००५ मध्ये ओडिशातील
तालाबीरा-२ व तालाबीरा
-३ मध्ये कोळसा खाणी
देण्यात गैरव्यवहार झाला
होता. तेव्हा कोळसा मंत्रालय
मनमोहनसिंगांकडेच होते.
या प्रकरणी सीबीआयने
क्लोजर रिपोर्ट दाखल केला
होता. परंतु न्यायालयाने
तो फेटाळला आणि
मनमोहनसिंग यांच्या
चौकशीचे आदेश दिले
होते. तत्कालीन कोळसा
मंत्रालयाचा जवाब गरजेचा
नाही काय? असे न्यायालयाने
तेव्हा विचारले होते.
पंतप्रधानांच्या चौकशीची
परवानगी मिळाली नव्हती,
असे सीबीआयने न्यायालयास
सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस पाठीशी
^सिंग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल
कोणालाच शंका नाही. अख्ख्या
देशाला त्यांचा पारदर्शकपणा
माहीत आहे. भाजप या प्रकरणाचे
राजकारण करत आहे. खाण
लिलाव थांबण्यासाठी भाजपच्याच
मुख्यमंत्र्यांनी पत्रे दिली होती.
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षेच
आहे. त्यात घट अथवा वाढ करण्याचा विचार नाही, अशी
माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी
बुधवारी लोकसभेत दिली. दरम्यान, केंद्र सरकारने नव्या
नोकऱ्यांवर बंदी घातलेली नाही, असे गृहमंत्री राजनाथसिंह
यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. कुठलेही संवेदनशील सरकार
नोकऱ्यांवर बंदी घालण्याचा आदेश देऊ शकत नाही, असे
त्यांनी सांगितले. दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान या
दोन्ही मुद्द्यांची चर्चा झाली होती. त्यामुळे सरकारला त्यावर
स्पष्टीकरण द्यावे लागले. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या
सेवानिवृत्तीच्या वयात घट करण्याचा विचार करत
असल्याचे वृत्त हास्यास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनीही सांगितले होते. यूपीए सरकारच्या शेवटच्या टप्प्यात
सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होईल, अशी चर्चा होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची
निवृत्ती ६० व्या वर्षीच
अमरावती | डॉ. नरेंद्र दाभोलकर
हत्याप्रकरणी सीबीआयने दोन संशयित
मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार केले असून, ११
मार्चला अमरावती शहर पोलिसांना पाठवले
आहे. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट २०१४
मध्ये गोळ्या घालून हत्या झाली होती.
त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना
अद्याप यश आलेले नाही. यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचीही कोल्हापुरात अज्ञात
मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. मात्र, पानसरेंच्याही मारेकऱ्यांना अटक
होऊ शकली नाही. सीबीआयने दाभोलकरांच्या दोन संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्र
जारी केले आहेत. या रेखाचित्राबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार असल्याचे
अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख यांनी सांगितले.
दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत डाव्या, पुरोगामी अाणि
आंबेडकरवादी संघटनांनी िवशाल मोर्चा काढला होता.
आम्ही सारे पानसरे...
फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड)
तालुक्यातील वाई येथील प्रवीण ज्ञानदेव मनवर
(वय ३८) या उच्चशिक्षित अभियंत्याने दुर्धर
आजारपणाच्या नैराश्यातून पत्नी आणि दोन मुलींना
कारमध्ये पेटवून देऊन स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न
केला, ही घटना मंगळवार, १० मार्चला उघडकीस
आली. या धक्कादायक घटनेमुळे त्याच्या कुटुंबासह
वाई गावावर शोककळा पसरली असून, प्रवीणची
वृद्ध आई शशिकला (७०)
या घनव्याकूळ होऊन नुसत्या
रडत आहेत. कोण भेटायला
येतंय आणि काय बोलत आहे,
याचे काहीही भान त्यांना नाही.
दरम्यान, या घटनेमुळे अनेक
प्रश्न निर्माण झाले असून,
प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाला
असलेल्या आजाराविषयी सर्वच अनभिज्ञ असून,
मध्य प्रदेश पोलिस प्रवीण मनवरला असलेल्या
आजाराच्या तपासणीसाठी रक्त चाचणी करण्यात
येणार आहे, अशी माहिती त्याच्या नातेवाइकाने
दिली. या घटनेनंतर ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने
प्रवीण मनवरच्या वाई या गावात जाऊन टिपलेला
हा आखो देखा प्रसंग.
प्रवीणच्या कुटुंबातीच सर्वच जण उच्चशिक्षित
आहेत. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता.
त्यामुळेच शाळेत नेहमीच त्याचा पहिला नंबर येत
असे. त्याचा मोठा भाऊ राजदीप हा वाशीम येथे
शिक्षक आहे. विद्या आणि ममता या दोन्ही बहिणींचे
लग्न झाले असून, त्याही अनुक्रमे नागपूर आणि
परभणी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. वडील
ज्ञानदेव मनवर हे नाशिक येथे प्राध्यापक असल्याने
मनवर कुटुंबीयांचे अनेक वर्षे नाशिकला वास्तव्य
होते. ओघानेच प्रवीणचेही बालपण नाशिकला गेले.
२००६ मध्ये ज्ञानदेव मनवर हे निवृत्त झाले. दरम्यान,
प्रवीणचेही आयआयटीचे शिक्षण पूर्ण झाले आणि
मध्य प्रदेशात त्याला चांगल्या पगाराची नोकरीही
मिळाली. सेवानिवृत्तीनंतर ज्ञानदेव यांनी कारंजालाड
येथे जागा घेऊन घर बांधायला सुरुवात केली. पण,
घर पूर्ण उर्वरित पान. १२
प्रवीण मनवरची एचआयव्ही
चाचणी करणार पोलिस
नातेवाइकाची माहिती, वाईतील घरी स्मशान शांतता
शिल्पा मनवर
प्रवीण मनवर याचे वाई येथील घर
आजाराची काेणालाच माहिती नाहीसत्तर वर्षीय वृद्ध आई शशिकला
घनव्याकूळ, अश्रू थांबेनात
प्रतिनिधी । अमरावती
अभियंता असलेल्या प्रवीण मनवरशी बारा वर्षांपूर्वी आमच्या
बहिणीचे लग्न झाले होते. बारा वर्षे उलटली तरी सासरच्या
मंडळीविषयी त्याच्या मनात राग होता. या कारणासाठी तो
आमच्या बहिणीलाही त्रास द्यायचा. यातूनच त्याने आमच्या
चिमुकल्या दोन भाच्यांसह बहिणीला जाळून ठार मारले,
असा आरोप शिल्पाच्या दोन्ही
भावांनी बुधवारी केला आहे.
शिल्पा या शहरातील
श्यामनगरमध्ये राहणारे
सखारामजी ढाणके यांच्या
लहान कन्या होत्या. ‘आम्हा
चार भावंडांपैकी शिल्पा ही
लहान होती. शिल्पाचा विवाह
२५ मे २००३ रोजी प्रवीण
मनवर याच्याशी पार पडला.
पती अभियंता आहे, तीसुद्धा
अभियंता होती. दोघांचाही
संसार सुखात सुरू होता. मात्र,
सुरुवातीपासूनच प्रवीणला
आमच्याविषयी रागच होता.
तो कधीही आमच्याशी एकरूप झाला नव्हता. शिल्पाच्या
पहिल्या प्रसूतीच्या वेळी क्षुल्लक कारणासाठी आलेला
राग त्याने किमान पाच ते सहा वर्षांपर्यंत मनात धरला होता.
त्यानंतर आम्ही त्याच्यातून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न
करण्याचा प्रयत्न करतच होतो. मात्र, उर्वरित पान. १२
सासरवर हाेता प्रचंड राग,
शिल्पाला द्यायचा त्रास
२१ फेब्रुवारीला
शेवटचे संभाषण
शिल्पा यांनी २१ फेब्रुवारीला
बंधू अजय ढाणके यांना
मोबाइलवरून संपर्क केला
होता. २१ तारखेला अजय
यांचा वाढदिवस असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
देण्यासाठीच शिल्पाने फोन
केला होता. मात्र, त्या
दिवशीही तिने बोलण्यातून
नाराजी व्यक्त केली नव्हती.
वृत्तसंस्था । नवी दिल्ली
आम आदमी पक्षातील (आप)
अंतर्गत कलह सुरूच आहे. बुधवारी
आणखी एक प्रकरण समोर आले.
सर्वांना स्टिंग करा असे सांगणाऱ्या
अरविंद केजरीवाल यांचेच स्टिंग
कोणीतरी जारी केले. दिल्लीत
सरकार स्थापनेसाठी काँग्रेसच्या सहा
आमदारांना फोडून त्यांचा पाठिंबा
मिळवावा, असे केजरीवाल हे आपचे
माजी आमदार राजेश गर्ग यांना सांगत
असल्याचे ऑडिओ टेपमध्ये दिसते.
राजेश गर्ग म्हणाले, ‘काँग्रेस
आमदार फोडा असे केजरीवालांनी
मला सांगितले होते. पण मला ते योग्य
वाटले नाही. त्यामुळे त्यानंतर मी
त्यांना कधीही भेटलो नाही. टेपमधील
चर्चा गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील
आहे. तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती राजवट
होती. कुठल्याही पद्धतीने सरकार
स्थापन करण्याचा केजरीवाल यांचा
प्रयत्न सुरू होता. मनीष शिसोदिया
आणि संजय सिंह यांनीही याबाबत
चर्चा केली होती.’
केजरीवालांकडूनच
सत्तेसाठी घोडेबाजारस्टिंगमध्ये काँग्रेस आमदारांशी सौदेबाजी उघडकीस
दमानियांचा राजीनामा
ही टेप जारी झाल्यानंतर आपच्या
नेत्या अंजली दमानिया यांनी
राजीनामा दिला. ‘मी तत्त्वांसाठी
केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता.
अशा घोडेबाजारासाठी नाही. अशा
मूर्खपणासाठी मी आपमध्ये आले
नव्हते. मी राजीनामा देत आहे.
केजरीवाल यांनी ४८ तासांत त्याचे
उत्तर द्यावे,’ असे ट्विट त्यांनी केले.
दरम्यान, आम आदमी पक्षाने या
प्रकाराचा इन्कार केलेला नाही.
भूषण, यादवांची टीका
आपच्या बड्या नेत्यांनी जारी केलेल्या
वक्तव्यावर योगेंद्र यादव आणि प्रशांत
भूषण यांनी पलटवार केला आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांच्या नावे १० पानी
पत्र लिहिले आहे. भांडण संयोजक पद
मिळवण्यासाठी नाही, तर तत्त्वांसाठी
आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आता
आपण बोलू इच्छित नाही, असे यादव
यांनी स्पष्ट केले.
अतुल पेठकर | नागपूर
िवदर्भात बदली झालेल्या पश्चिम
महाराष्ट्रातील शिरजोर अधिकाऱ्यांनी
तत्काळ रुजू व्हावे, असे परिपत्रक
महाराष्ट्र शासनाने १० मार्च रोजी
काढले. िवदर्भातील सर्व जिल्ह्यातील
बदल्या व पदस्थापना झालेल्या
अधिकाऱ्यांनी रुजू व्हावे, असे स्पष्ट
आदेश याद्वारे देण्यात आले आहे.
दैनिक दिव्य मराठीने मंगळवार,
१० फेब्रुवारी २०१५ च्या अकोला
आवृत्तीत हे वृत्त ठळकपणे दिले होते.
या बातमीत िवदर्भात बदली होऊनही
रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांची यादीच
प्रसिद्ध करण्यात आली होती. पश्चिम
महाराष्ट्रातील शिरजोर अधिकारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही
ऐकत नाही. सुमारे बारा आयएएस
अधिकारी बदली होऊनही बदलीच्या
ठिकाणी रुजू झालेले नाहीत, तर
बारापैकी तीन अधिकारी बदलीच्या
ठिकाणीरुजूहोऊनलगेचरजेवरगेले.
ते अजून रुजू झालेले नसल्याचे वृत्त
दिव्य मराठीने दिले होते. या वृत्तामुळे
प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली
होती. त्याची गंभीर दखल घेत या
अधिकाऱ्यांनी िवदर्भात रुजू व्हावे,
असे परिपत्रक काढण्यात आले.
आयएएस आणि आयपीएस
अधिकारी िवदर्भात बदली झाली
की एकतर आजारी रजेवर
जातात वा रुजू होऊन रजेवर
निघून जातात. त्यांना िवदर्भात
यायचे नसल्याने ते सुटीकाळाचा
उपयोग बदली रद्द करण्यासाठी वा
मनासारखे पोस्टिंग मिळवण्यासाठी
करतात, असे दिसून येते. अनेक
अधिकारी तर मनासारखे पोस्टिंग
मिळावे यासाठी मुंबईत तळ ठोकून
बसतात, असे त्या बातमीत स्पष्टपणे
नमूद करण्यात आले होते.
‘त्या’ अधिकाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश
विदर्भात बदली होऊनही करत होते टाळाटाळ दिव्यमराठीइम्पक्ट