Divyamarathi provides the all Jalgaon News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैनिकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक १८३ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
जळगाव सोमवार, १६ मार्च २०१५
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १२+४=१६ | किंमत ~३.००
प्रतिनिधी । जळगाव
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च
कमी करण्यासाठी कापूस बीटी
बियाणांची किंमत ९३० रुपयांएेवजी
५०० रुपये करण्यात येईल. तसेच
फवारणीसाठी लगणाऱ्या अाैषधांच्या
किमतीसंदर्भात कठाेर कायदा
करण्यासंदर्भातील निर्णय येत्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला
जाईल, अशी माहिती कृषिमंत्री
एकनाथ खडसे यांनी िदली.
महिन्याभरात शेतकऱ्यांना अाठ तास
वीज पुरवठा देणार असल्याचेही
त्यांनी सांगितले.
जळगावातील जैन िहल्सवर
रविवारी अांतरराष्ट्रीय केळी
परिषदेचा शुभारंभ झाला. त्या वेळी
उद्घाटन प्रसंगी खडसे बाेलत
हाेते. परिषदेत बाेलताना ते म्हणाले,
शासनाकडेपैसेनसल्यामुळेनैसर्गिक
अापत्तीत इच्छा असूनही अापण
मदत करू शकत नाही. अागामी
काळात शेतकऱ्यांना स्वस्तात वीज
अाणि पाच लाख शेतकऱ्यांना
साैर कृषिपंप देण्यात येणार अाहेत.
तसेच शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी
उपाययाेजनाही करण्यात अाली
अाहे. स्वागतपर भाषण जैन उद्याेग
समूहाचे उपाध्यक्ष अशाेक जैन,
प्रास्ताविक डाॅ.एच.पी. सिंग यांनी तर
सूत्रसंचालन केळीतज्ज्ञ डाॅ.के.बी.
पाटील यांनी केले. संबंिधत. पान २
बीटी बियाणे ५०० रुपयांतकृषिमंत्री खडसे यांचे अाश्वासन; महिन्याभरात शेतकऱ्यांना अाठ तास वीज
जळगावसाठी
माेठी तरतूद
जिल्ह्यातील १५ वर्षांपासून
रखडलेल्या प्रकल्पांना
निधी मिळावा, यासाठी
येत्या अर्थसंकल्पात
भरघाेस तरतूद करण्यात
येणार अाहे. या निधीमुळे
पहिल्याच वर्षात पाच माेठे
प्रकल्प पूर्ण हाेतील. येत्या
पाच वर्षांत जिल्ह्यातील
एकही प्रकल्प अपूर्ण
राहणार नाही. गेल्या ६०
वर्षांत मिळाला नसेल एवढा
निधी या अर्थसंकल्पात
मिळणार असल्याचे खडसे
यांनी सांगितले.
‘बेस्ट बनाना बंच’ स्पर्धेतील िवजेता शेतकरी
शेख मोहम्मद इस्माईल साेबत एकनाथ खडसे.
उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच ४ आशियाई देश, १८ मार्चपासून १२ दिवस थरार
पहिला उपांत्यपूर्व तिसरा उपांत्यपूर्व चौथा उपांत्यपूर्व{पाकने आयर्लंडला 7
विकेट्सने पराभूत केले
{वेस्ट इंडीजचा यूएईवर
6 विकेट्सने विजय
{भारत, पाक, श्रीलंका
व बांगलादेशाला स्थान
श्रीलंका द. आफ्रिका भारत बांगलादेश ऑस्ट्रेिलया पाकिस्तान
{वर्ल्डकपमध्ये 4 वेळा लढले, 2 मॅच
अाफ्रिका जिंकली, 1 श्रीलंका, 1 टाय.
{यंदा : द.आफ्रिकेचे 4 विजय, 2
पराभव. श्रीलंकेचे 4 िवजय, 2 पराभव.
{दोघांचा वर्ल्डकपमध्ये 2 वेळा
सामना, प्रत्येकी 1-1 विजय.
{यंदा : भारत सर्व 6 सामने िवजयी.
बांगलादेशाने 3 जिंकले, 2 गमावले.
{वर्ल्डकपमध्ये 8 वेळा समाेरासमाेर,
दोघांचेही 4-4 विजय. पारडे समान.
{यंदा : ऑस्ट्रेलियाने 4 जिंकले, 1
गमावला. पाक 4 विजयी, 2 पराभूत.
18 मार्च (बुधवार) दुसरा उपांत्यपूर्व 19 मार्च (गुरुवार) 20 मार्च (शुक्रवार) 21 मार्च
सकाळी 9 वाजेपासून सिडनीमध्ये सकाळी 9 वाजेपासून मेलबर्नमध्ये सकाळी 9 वाजेपासून अॅडलेडमध्ये
न्यूझीलंड वेस्ट इंडीज
{वर्ल्डकपमध्ये 6 वेळा सामना, 3
वेळा न्यूझीलंड, 3 वेळा विंडीज सरस.
{यंदा : न्यूझीलंडने सर्व 6 सामने
जिंकले. विंडीज 3 पराभूत, 3 विजय.
आफ्रिका 3, न्यूझीलंड 6 वेळा सेमीफायनल हरले
फायनल
29 मार्च रोजी
मेलबर्नमध्ये रविवारी
सकाळी 9.30 वाजता
भारत 2 वेळा आिण ऑस्ट्रेलिया 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन
शनिवार, सकाळी 6.30 पासून वेलिंग्टनमध्ये
न्यूझीलंड
द.आफ्रिका
भारत
ऑस्ट्रेलिया
ऑकलंड, सकाळी 6.30 वा.
सिडनीत सकाळी 9 पासून
सेमी फायनल (संभाव्य सामने)
24मार्च (मंगळवार)
26मार्च (गुरुवार)
1st
2nd
बक्षिसाची रक्कम
1st
2nd
24.7 कोटी रु.
10.7 कोटी रु.
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
दिल्लीत महिलांसाठी
‘शक्ती’ कॅब सेवा
नवी दिल्ली | दिल्ली महापालिका
पुढील महिन्यापासून महिलांच्या
सुरक्षेसाठी ‘शक्ती’ ही कॅब सेवा
सुरू करणार आहे. पहिल्या
टप्प्यात २० टॅक्सींचा समावेश
असेल. महिलाच या टॅक्सी
चालवतील.
सुकन्या योजनेत उघडली
१ लाख ८० हजार खाती
नवी दिल्ली | मुलींसाठी सुरू
केलेल्या सुकन्या समृद्धी
योजनेअंतर्गत दोन महिन्यांपेक्षा
कमी काळात १.८० लाख खाती
उघडण्यात आली. सर्वांत जास्त
खाती कर्नाटकात तर कमी खाती
बिहारमध्ये उघडली.
ज्येष्ठ गांधीवादी नारायण
देसाई यांचे निधन
अहमदाबाद | प्रख्यात गांधीवादी
आणि गुजरात
विद्यापीठाचे
माजी कुलगुरू
नारायण देसाई
यांचे रविवारी
निधन झाले.
ते ९० वर्षांचे होते. देसाई गेल्या १०
डिसेंबरपासून कोमात होते.
जपानी युवकाचा पायी
चालण्याचा विक्रम
नोमी | जपानच्या २७ वर्षीय
युसुके सुझुकीने २० किमी पायी
चालण्याच्या स्पर्धेत जागतिक
विक्रम नोंदवला. त्याने १ तास
१६ मिनिटे ३६ सेकंदांत हा विक्रम
केला. यापूर्वीचा १ तास १७
मिनिटे २ सेकंदांचा विक्रम योहान
दिनिकाच्या नावे होता.
प्रतिनिधी | नागपूर
अयोध्येतभव्यराममंदिरबनवण्यासाठी
सध्या आंदोलन करणार नाही, पण
आम्ही हा मुद्दा सोडलेलाही नाही, अशा
शब्दांत रा.स्व. संघाचे सरकार्यवाह
सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी यांनी रविवारी
भूमिका स्पष्ट केली. अलाहाबाद
उच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूंच्या
बाजूने होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च
न्यायालयात आहे. तेथील सुनावणी
वेगाने व्हावी, असे मतही त्यांनी मांडले.
संघाच्या अ.भा. प्रतिनिधी सभेच्या
तीन दिवसांच्या बैठकीनंतर जोशी यांनी
पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी
स्थलांतरित हिंदूंचे संरक्षण, सार्वजनिक
सुट्यांमुळे ढळलेली कार्यसंस्कृती,
राममंदिर, मातृभाषेतून शिक्षण, गोरक्षा,
घरवापसी अशा मुद्द्यांवर कसलेल्या
फलंदाजासारखी फटकेबाजी करत
पत्रकारांचे प्रश्न टोलवून लावले.
पाकिस्तानसारख्या देशांतून
शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंना
नागरिकत्व द्यावे, असे मत व्यक्त
करून जोशी म्हणाले, पाकिस्तानमधून
आलेल्या शेकडो हिंदू कुटुंबांनी
गुजरातसह इतर राज्यांत आश्रय घेतला
आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्वाची
मागणी केली आहे. जर परदेशात
हिंदूंवर अन्याय होत असेल तर त्यांना
स्वीकारण्याची जबाबदारी समाज
आणि सरकार यांची आहे. सरकारने या
मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा.
राममंदिरावर ठामच;
तूर्तास आंदोलन नाही
वचनबद्ध | अ. भा. प्रतिनिधी सभेनंतर रा. स्व. संघाची भूमिका
संघाच्या नव्या टीममध्ये मराठी टक्का वाढला. पान ५
गोवंश हत्याबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी
महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारने गोमांस विक्रीवर बंदी घातली आहे.
त्याबाबतच्या प्रश्नावर जोशी म्हणाले, संघ गोवंश संरक्षणासाठी वचनबद्ध आहे.
फक्त काही भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदा करून काहीही
उपयोग होणार नाही. या कायद्याची तेवढीच कडक अंमलबजावणीही व्हायला हवी.
हिंदुत्व ही जीवनशैली
भाजपचे खासदार असलेले साधू आणि
साध्वींच्या हिंदुत्वाबद्दलच्या वादग्रस्त
वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येत
असल्याचे चित्र आहे. त्यावर जोशी
म्हणाले, ‘हिंदुत्व ही जीवनशैली आहे.
त्याबाबत काही बोलल्याने सरकारसमोर
गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, असे
आम्हाला वाटत नाही.’
मार्गदर्शक व्हावे
६७ वर्षीय भैयाजी तिसऱ्यांदा सरकार्यवाह
झाले. वयाबाबत विचारल्यावर वृद्ध
आणि ज्येष्ठ कोण ठरवणार, असा
प्रतिप्रश्न त्यांनी केला. गोष्टी मनाशी
जुळलेल्या असतात. पण नवी पिढी
समोर आल्यावर ज्येष्ठांनी मार्गदर्शक
व्हावे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
सुट्या कमीच कराव्या
गोवा सरकारने गांधी जयंतीची सुटी
आधी रद्द केली होती. त्यावर जोशी
म्हणाले, सार्वजनिक सुट्यांत कपात
करण्यावर संघ आग्रही आहे. भरमसाट
सुट्यांमुळे वर्षभरात १५० दिवसच
काम होते. महापुरुषांच्या जयंती,
पुण्यतिथीच्या सुट्यांचा उपयोग लोक
कसा करतात, हे सर्वांना माहिती आहे.
नन अत्याचाराचा निषेध
प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१
वर्षीय ननवर झालेल्या अत्याचाराचा
जोशींनी निषेध केला. कुठलाही समाज
अशा घटनांचा निषेधच करेल. अशा
घटनांना धार्मिक रंग देऊन दोन
समाजात तणाव पसरवण्याचा प्रयत्न
होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून हवे, असा ठराव प्रतिनिधी
सभेत मंजूर करण्यात आला. शिक्षणासोबतच प्रशासकीय
तसेच न्यायालयीन प्रक्रियाही भारतीय भाषेत आणण्यासाठी
सरकारने पुढाकार घ्यावा, असे ठरावात म्हटले आहे.
मातृभाषेतून
प्राथमिक
शिक्षण हवे
दुष्काळाच्या धगीतही औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यात आंबेगाव येथे माधुरी
राम पाटील यांनी पाॅलिहाऊस उभारून २० गुंठ्यांवर सप्तरंगी जरबेरा फुलांची
शेती केली आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबादेत ही फुले जात असून, त्यातून महिना
६० हजार रुपये मिळकत होत आहे. ४ वर्षे त्यांना हे उत्पादन मिळणार आहे.
दिल्ली, मुंबई,
पुण्यात मार्केट
उस्मानाबादच्या मित्राकडून
प्रेरणा घेऊन राम पाटील
यांनी पाॅलिहाऊसची उभारणी
केली. यासाठी दोन महिने
लागले. दिल्ली, मुंबई,
पुण्यात फुलांना मागणी
असून, तेथे चांगला भाव
मिळतो. छाया : तुकाराम धनेधर
जरबेरा | शेती २० गुंठ्यांवर, महिना ६० हजार उत्पन्न
21 लाख
रुपये खर्च
पाॅलिहाऊसला. ५०%
शासकीय मदत.
15 हजार रोपे
पुण्याहून
आणून लावली.
ठिबकद्वारे पाणी.
06 कर्मचारी.
तीन
महिलांसह ५ मजूर व
पॅकेजिंग पर्यवेक्षक.
विशेष प्रतिनिधी | मुंबई
साहित्य संमेलनाचे मोफत प्रसारण
करण्याच्या मागणीवर सगळेच काही
फुकटात हवे काय, अशा शब्दांत
खडसावणारे सांस्कृतिक कार्यमंत्री
विनोद तावडे यांनी दुसऱ्याच
दिवशी नरमाईची भूमिका घेतली.
दूरदर्शनवरून संमेलनाचे मोफत
प्रक्षेपण करण्यास त्यांनी महामंडळाला
परवानगी दिली आहे. दरम्यान, तावडे
यांनी साहित्यिकांची माफी मागावी
अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
उद््घाटन व समारोपाच्या मोफत
प्रसारणाची मागणी सरकारकडे करणे
हा फुकटेपणा नसून त्यांचा हक्कच
आहे. साहित्याच्या माध्यमातून ते
व्यापार करत नसून, मराठी भाषा व
राज्याची ते सांस्कृतिक सेवाच करत
आहेत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते
सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
तावडे यांचे वक्तव्य सत्तेचा उन्माद
दाखवणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भाषणे प्रसारित केली जात
असल्याची टीका सावंत यांनी केली.
संमेलनाच्या मोफत
प्रसारणास परवानगी
काँग्रेसची माफीची मागणी
प्रतिनिधी | नागपूर
दुष्काळ, गारपीटग्रस्त शेतकरी म्हणून
शासनाकडून मिळालेली मदत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांनी
शासनाला परत केली आहे. शासनाची
मदत इतर गरजू शेतकऱ्यांना मिळावी,
या अपेक्षेसह फडणवीस कुटुंबीयांनी ही
रक्कम १२ मार्च राेजी परत केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मूल व कोसंबी येथे
मुख्यमंत्री देवेंद्र, त्यांचे बंधू आशिष आणि
आई सरिताताई अशा तिघांच्या संयुक्त
नावे ३० ते ३५ एकर शेती आहे. मात्र,
शेतीचे बँक खाते आशिष यांच्या नावे
आहे. आशिष यांच्या खात्यात मदतीचे
१८,४५० रुपये जमा झाले, तर मूल आणि
करवन येथे मुख्यमंत्र्यांचे काका श्रीकृष्ण
ऊर्फ बाळासाहेब फडणवीस यांची ४०
एकर शेती आहे.
त्यांनाही १३,५०० रुपये
मदत चंद्रपूर जिल्हा
बँकेच्या मूल शाखेत
४ फेब्रुवारी रोजी जमा
झाली होती. पुण्यात
राहणारे श्रीकृष्ण फडणवीस यांना मूल येथे
आल्यावर हे कळले. दोघांनीही ती रक्कम
परत करण्यासाठी मूलच्या तहसीलदारांशी
संपर्क साधून तेवढ्या रकमेचे चेक दिले.
मुख्यमंत्र्यांसह कुटुंबीयांकडून मदत परत
दिव्यमराठीविशेष देवेंद्रांसहआई,भावाच्यानावेशेती;भाऊआशिषच्यानावे१८,४५०रु.दुष्काळीमदतमिळालीहोती
गरजूंना लाभ व्हावा
^आमची आर्थिक स्थिती चांगली आहे. मदत खात्यात
जमा झाल्याचे कळताच ती न स्वीकारण्याचा निर्णय
घेतला. गरजू शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ व्हावा, अशी
आमची प्रामाणिक भावना आहे.
प्रसेनजित फडणवीस, मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू
जमा झाल्यास परत करणार
^मदतीबाबत माहिती नाही. जमा झाल्यास आम्हीही
परत करू. चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे १०० टक्के
नुकसान झाले आहे. त्या सर्वांनाच मदत मिळायला हवी.
अद्याप किती जणांना मिळाली ते माहिती नाही.
शोभाताई फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या काकू
चव्हाणांनीही परत केले हाेते
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी
सत्त्वशीला यांच्या नावे २०११-१२ या वर्षासाठी ३
हजार रुपये दुष्काळी मदत
मिळाली होती. परंतु शासकीय
प्रक्रियेनुसार मिळालेली ही
मदत चव्हाण यांनी नाकारली
होती. सांगली जिल्ह्यातील
बेडग हे सत्त्वशिला यांचे माहेर.
तेथे त्यांच्या नावे सव्वासहा एकर शेती आहे. जिल्हा
बँकेच्या बेडग शाखेत ही मदत जमा झाली होती.
त्यावरून बरीच टीकाही झाली होती.
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
हुंडाविरोधी कायद्यात दुरुस्ती
करण्याचा सरकारचा विचार आहे.
या कायद्याखालील खटल्यांत
जोडप्यांमध्ये तडजोड, समेट
साधण्याची दुरुस्ती सुचवली जाणार
आहे. कायद्याचा दुरुपयोग करून
पती व त्याच्या आप्तांच्या छळाच्या
घटनांत वाढ झाली आहे. यामुळे
दुरुस्तीचा प्रस्ताव आला आहे.
दुरुस्तीत कलम ४९८ अ'चा
गुन्हा कोर्टाच्या परवानगीनंतर
माफीयोग्य ठरेल. विधी आयोग व
न्या. मलिमठ समितीने याबाबत
शिफारस केली होती. केंद्रीय
कॅबिनेटच्या मसुदा समितीने
ड्राफ्ट नोट कायदा मंत्रालयाकडे
पाठवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो.
हुंडा कायद्यात तडजाेडीची मुभापतीसहसासरच्यांनाअडकवण्याच्याघटनाराेखण्यासाठीकेंद्राचेपाऊल
गैरवापरास १५ हजार दंड
सध्या हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध
झाले नाही किंवा कायद्याचा गैरवापर
केल्याचे आढळल्यास केवळ हजार
रुपये दंडाची तरतूद आहे. प्रस्तावित
दुरुस्तीमध्ये यासाठी १५ हजार रुपये
दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय आरोपी दंडाची रक्कम भरून
तुरुंगवास टाळू शकतो.
मुंबई | ‘परीकथेतील राजकुमारा
स्वप्नी माझ्या येशील का’, यासारख्या
गाण्यांनी रसिकांवर मोहिनी
घालणाऱ्या ज्येष्ठ
गायिका कृष्णा
कल्ले (७४)यांचे
रविवारी अल्प
आजाराने निधन
झाले. त्यांच्यावर
सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
अलीकडेच त्यांना ‘लता मंगेशकर
जीवनगौरव’ सन्मान मिळाला होता.
प्रख्यात गायिका कृष्णा
कल्ले यांचे निधन
प्रतिनिधी । जळगाव
पोलिसांशी मैत्री करून िजल्हा
सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या
न्यायालयीन कोठडीतील आरोपीने
पोलिसांना गुंगारा देत पोबारा केल्याची
घटना रविवारी घडली.
जळगाव पाेिलसांनी पुणे येथील
गणेश कांतीराव िपंगळकर (वय २६)
याला फसवणूकप्रकरणी अटक केली
होती. तो न्यायालयीन काेठडीत हाेता.
२७ फेब्रुवारीला त्याला उपचारासाठी
िजल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
केले होते. तो रविवारी रात्री ८.१५
वाजेच्या सुमारास बाथरूमला जाताे,
असे सांगून गेला. परंतु रात्री ९ वाजेपर्यंत
ताे परत न अाल्याने त्यांनी शाेधा शाेध
सुरू केली. त्यानंतर ताे फरार झाल्याचे
घाेषित केले.
पाेलिसांशी केली मैत्री
अाराेपीने बंदाेबस्तासाठी असणाऱ्या
पाेिलसांशी चांगलीच मैत्री केली.
यादरम्यान ताे अनेक वेळा एकटाच
बाथरूमला जात हाेता.
जिल्हारुग्णालयातूनअाराेपीचेपलायन