Divyamarathi provides the all Nashik News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २५१ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
नुकसानग्रस्तांना पाहणी दौऱ्यात
पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन
प्रतिनिधी । नाशिक
बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे
द्राक्ष, डाळिंब, कांदा आणि गव्हाचे
शंभर टक्के नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार
वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे
राज्यातील शेतकऱ्यांना मदत
करण्यासाठी कर्जमाफी किंवा
व्याजमाफीसाठी विधानसभेत प्रस्ताव
मांडणार असल्याचे पालकमंत्री गिरीश
महाजन यांनी सिन्नर तालुक्यात रविवारी
केलेल्या पाहणी दौऱ्यात सांगितले.
नाशिक जिल्ह्यात सिन्नर, निफाड,
चांदवड, दिंडोरी, देवळा, सटाणा या
तालुक्यांत शुक्रवार आणि शनिवारी
गारपीट झाली. त्यामुळे झालेल्या
हानीमुळेशेतकऱ्यांचेकंबरडेमोडल्याने
संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांनी पंचनामे
आणि मदतीबाबत शासनाविरोधात
तीव्र भावना व्यक्त उर्वरित. पान १२
कर्जमाफीसाठी विधानसभेत प्रस्तावप्रतिनिधी | नाशिक
अस्मानी संकटानंतर पंचनाम्यांच्या
रहाटगाडग्यात भरडल्या जाणाऱ्या
बळीराजाने रविवारी वाहतूक
व्यवस्थेला राेखत जणू भावनांचा अंत
पाहू नका, असा शासनाला इशारा
दिला. निफाडवासीयांसाठी रविवार
अांदाेलनांचा ठरला. दिवसभरात सात
गावांमध्येरास्ताराेकाेकरण्यातअाला.
मात्र, िनफाड तालुक्यात झालेल्या
नुकसानीची पाहणी करण्यासाठी
पालकमंत्री न फिरकल्याने व
सपूर्ण पीककर्जमाफी करण्यात
यावी, यासाठी शिवडी रेल्वेगेट येथे
शेतकऱ्यांनी दाेन तास रेल राेकाे केला.
परिणामी, माजी पालकमंत्री छगन
भुजबळ यांना शेतकऱ्यांच्या संतप्त
भावनांचा सामना करावा लागल्याचे
चित्र पाहावयास मिळाले.
दाेन वर्षांपासून अवकाळी पाऊस
अाणि त्यात गारपिटीचा फटका
जिल्ह्यातील उर्वरित. पान १२
संबंधित बातम्या व छायाचित्रे. पान २
निफाड येथील शांतीनगर त्रिफुलीवर रास्ता राेकाे करण्यात अाला. त्यावेळी अांदाेलकांनी रस्त्यावर टाकलेल्या गारा व द्राक्ष.
बळीराजाने राेखला रस्ता; मांडली व्यथा
नाशिक सोमवार, १६ मार्च २०१५
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
एकूण पाने १२+६=१८ | किंमत ~ ३.५०
उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच ४ आशियाई देश, १८ मार्चपासून १२ दिवस थरार
पहिला उपांत्यपूर्व तिसरा उपांत्यपूर्व चौथा उपांत्यपूर्व{पाकने आयर्लंडला 7
विकेट्सने पराभूत केले
{वेस्ट इंडीजचा यूएईवर
6 विकेट्सने विजय
{भारत, पाक, श्रीलंका
व बांगलादेशाला स्थान
श्रीलंका द. आफ्रिका भारत बांगलादेश ऑस्ट्रेिलया पाकिस्तान
{वर्ल्डकपमध्ये 4 वेळा लढले, 2 मॅच
अाफ्रिका जिंकली, 1 श्रीलंका, 1 टाय.
{यंदा : द. आफ्रिकेचे 4 विजय, 2
पराभव. श्रीलंकेचे 4 िवजय, 2 पराभव.
{दोघांचा वर्ल्डकपमध्ये 2 वेळा
सामना, प्रत्येकी 1-1 विजय.
{यंदा : भारत सर्व 6 सामने िवजयी.
बांगलादेशने 3 जिंकले, 2 गमावले.
{वर्ल्डकपमध्ये 8 वेळा समाेरासमाेर,
दोघांचेही 4-4 विजय. पारडे समान.
{यंदा : ऑस्ट्रेलियाने 4 जिंकले, 1
गमावला. पाक 4 विजयी, 2 पराभूत.
18 मार्च (बुधवार) दुसरा उपांत्यपूर्व 19 मार्च (गुरुवार) 20 मार्च (शुक्रवार) 21 मार्च
सकाळी 9 वाजेपासून सिडनीमध्ये सकाळी 9 वाजेपासून मेलबर्नमध्ये सकाळी 9 वाजेपासून अॅडलेडमध्ये
न्यूझीलंड वेस्ट इंडीज
{वर्ल्डकपमध्ये 6 वेळा सामना, 3
वेळा न्यूझीलंड, 3 वेळा विंडीज सरस.
{यंदा : न्यूझीलंडने सर्व 6 सामने
जिंकले. विंडीज 3 पराभूत, 3 विजय.
आफ्रिका 3, न्यूझीलंड 6 वेळा सेमीफायनल हरले
फायनल
29 मार्च रोजी
मेलबर्नमध्ये रविवारी
सकाळी 9.30 वाजता
भारत 2 वेळा आिण ऑस्ट्रेलिया 4 वेळा वर्ल्ड चॅम्पियन
शनिवार, सकाळी 6.30 पासून वेलिंग्टनमध्ये
न्यूझीलंड
द.आफ्रिका
भारत
ऑस्ट्रेलिया
ऑकलंड, सकाळी 6.30 वा.
सिडनीत सकाळी 9 पासून
सेमी फायनल (संभाव्य सामने)
24मार्च (मंगळवार)
26मार्च (गुरुवार)
1st
2nd
बक्षिसाची रक्कम
1st
2nd
24.7 कोटी रु.
10.7 कोटी रु.
प्रतिनिधी | नागपूर
अयोध्येत भव्य राममंदिर बनवण्यासाठी
सध्या आंदोलन करणार नाही, पण
आम्ही हा मुद्दा सोडलेलाही नाही, अशा
शब्दांत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह
सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी यांनी रविवारी
भूमिका स्पष्ट केली. अलाहाबाद
उच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूंच्या
बाजूने होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च
न्यायालयात आहे. तेथील सुनावणी
वेगाने व्हावी, असे मतही त्यांनी मांडले.
संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या
तीन दिवसांच्या बैठकीनंतर जोशी यांनी
पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी
स्थलांतरित हिंदूंचे संरक्षण, सार्वजनिक
सुट्यांमुळे ढळलेली कार्यसंस्कृती,
राममंदिर, मातृभाषेतून शिक्षण, गोरक्षा,
घरवापसी अशा मुद्यांवर कसलेल्या
फलंदाजासारखी फटकेबाजी करत
पत्रकारांचे प्रश्न टोलवून लावले.
पाकिस्तानसारख्या देशातून
शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंना
नागरिकत्व द्यावे, असे मत व्यक्त
करून जोशी म्हणाले, पाकिस्तानमधून
आलेल्या शेकडो हिंदू कुटुंबांनी
गुजरातसह इतर राज्यांत आश्रय घेतला
आहे. त्यांनी भारतीय नागरिकत्वाची
मागणी केली आहे. जर परदेशात
हिंदूंवर अन्याय होत असेल तर त्यांना
स्वीकारण्याची जबाबदारी समाज
आणि सरकार यांची आहे. सरकारने या
मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा.
राममंदिरावर ठामच;
तूर्तास आंदोलन नाही
वचनबद्ध | अ. भा. प्रतिनिधी सभेनंतर रा. स्व. संघाची भूमिका
संघाच्या नव्या टीममध्ये मराठी टक्का वाढला. पान १०
गोवंश हत्याबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी
महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारने गोमांस विक्रीवर बंदी घातली आहे.
त्याबाबतच्या प्रश्नावर जोशी म्हणाले, संघ गोवंश संरक्षणासाठी वचनबद्ध आहे.
फक्त काही भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदा करून काहीही
उपयोग होणार नाही. या कायद्याची तेवढीच कडक अंमलबजावणीही व्हायला हवी.
हिंदुत्व ही जीवनशैली
भाजपचे खासदार असलेले साधू आणि
साध्वींच्या हिंदुत्वाबद्दलच्या वादग्रस्त
वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येत
असल्याचे चित्र आहे. त्यावर जोशी
म्हणाले, ‘हिंदुत्व ही जीवनशैली आहे.
त्याबाबत काही बोलल्याने सरकारसमोर
गंभीर प्रश्न निर्माण होत आहे, असे
आम्हाला वाटत नाही.’
मार्गदर्शक व्हावे
६७ वर्षीय भैयाजी तिसऱ्यांदा सरकार्यवाह
झाले. वयाबाबत विचारल्यावर वृद्ध
आणि ज्येष्ठ कोण ठरवणार, असा
प्रतिप्रश्न त्यांनी केला. गोष्टी मनाशी
जुळलेल्या असतात. पण, नवी पिढी
समोर आल्यावर ज्येष्ठांनी मार्गदर्शक
व्हावे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
सुट्या कमीच कराव्या
गोवा सरकारने गांधी जयंतीची सुटी
आधी रद्द केली होती. त्यावर जोशी
म्हणाले, सार्वजनिक सुट्यांत कपात
करण्यावर संघ आग्रही आहे. भरमसाट
सुट्यांमुळे वर्षभरात १५० दिवसच
काम होते. महापुरुषांच्या जयंती,
पुण्यतिथीच्या सुट्यांचा उपयोग लोक
कसा करतात, हे सर्वांना माहिती आहे.
नन अत्याचाराचा निषेध
प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१
वर्षीय ननवर झालेल्या अत्याचाराचा
जोशींनी निषेध केला. कुठलाही समाज
अशा घटनांचा निषेधच करेल. अशा
घटनांना धार्मिक रंग देऊन दोन
समाजात तणाव पसरवण्याचा प्रयत्न
होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून हवे, असा ठराव प्रतिनिधी
सभेत मंजूर करण्यात आला. शिक्षणासोबतच प्रशासकीय
तसेच न्यायालयीन प्रक्रियाही भारतीय भाषेत आणण्यासाठी
सरकारने पुढाकार घ्यावा, असे ठरावात म्हटले आहे.
मातृभाषेतून
प्राथमिक
शिक्षण हवे
नागपूर | दुष्काळ, गारपीटग्रस्त शेतकरी म्हणून
शासनाकडूनमिळालेलीमदतमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस
व त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाला
परत केली आहे. शासनाची मदत
इतर गरजू शेतकऱ्यांना मिळावी, या
अपेक्षेसह फडणवीस कुटुंबीयांनी ही
रक्कम परत केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मूल व कोसंबी
येथे मुख्यमंत्री देवेंद्र, त्यांचे बंधू आशिष आणि आई
सरिताताई अशा तिघांच्या संयुक्त नावे ३० ते ३५ एकर
शेती आहे. आशिष यांच्या खात्यात मदतीचे १८,४५०
रुपये जमा झाले, तर मूल आणि करवन येथे मुख्यमंत्र्यांचे
काका श्रीकृष्ण ऊर्फ बाळासाहेब फडणवीस यांची ४०
एकर शेती आहे. त्यांनाही १३,५०० रुपये मदत चंद्रपूर
जिल्हा बँकेच्या मूल शाखेत जमा झाली होती.
मुख्यमंत्र्यांसह कुटुंबीयांकडून मदत परत
दिव्यमराठीविशेष भाऊ आशिषच्या नावे १८,४५० रुपयांची मिळाली होती दुष्काळी मदत
गरजूंना लाभ व्हावा
^आमची आर्थिक स्थिती चांगली आहे. मदत
खात्यात जमा झाल्याचे कळताच ती न
स्वीकारण्याचा निर्णय घेतला. गरजू शेतकऱ्यांना या
मदतीचा लाभ व्हावा, अशी आमची प्रामाणिक भावना
आहे. प्रसेनजित फडणवीस, मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू
जमा झाल्यास परत करणार
^मदतीबाबत माहिती नाही. जमा झाल्यास
आम्हीही परत करू. चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे
१०० टक्के नुकसान झाले आहे. त्या सर्वांनाच मदत
मिळायला हवी. अद्याप किती जणांना मिळाली ते
माहिती नाही.
शोभाताई फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या काकू
चव्हाणांनीही परत केले हाेते
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या
पत्नी सत्त्वशीला यांच्या नावे २०११-१२ या
वर्षासाठी ३ हजार रुपये
दुष्काळी मदत मिळाली होती.
परंतु, शासकीय प्रक्रियेनुसार
मिळालेली ही मदत चव्हाण
यांनी नाकारली होती. सांगली
जिल्ह्यातील बेडग हे सत्त्वशीला
यांचे माहेर. तेथे त्यांच्या नावे
सव्वासहा एकर शेती आहे. जिल्हा बँकेच्या बेडग
शाखेत ही मदत जमा झाली होती. त्यावरून
बरीच टीकाही झाली होती.
दुरुपयाेग टाळण्यासाठी सरकार
हुंडाविरोधी कायद्यात दुरुस्ती करणार
नवी दिल्ली | सरकार हुंडाविरोधी छळ कायद्यात दुरुस्ती
करण्याच्या विचारात आहे. या कायद्याअंतर्गत दाखल
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पती-पत्नींमध्ये तडजोड,
समेट साधण्याची दुरुस्ती सुचवली जाणार आहे. या
कायद्याचा गैरवापर करून पती आणि त्याच्या जवळच्या
नातेवाइकांचा छळ केला जात असल्याच्या प्रकरणांत वाढ
झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचा प्रस्ताव आला आहे.
प्रस्तावित दुरुस्तीत कलम ४९८ अ'चा गुन्हा
न्यायालयाच्यापरवानगीनंतरमाफीयोग्यठरेल.विधीआयोग
आणि न्या. मलिमठ समितीने याबाबत शिफारस केली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मसुदा समितीने ड्राफ्ट नोट कायदा
मंत्रालयाकडे पाठवली असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या
अधिकाऱ्याने दिली. सध्या हा गुन्हा अजामीनपात्र असून,
आरोपीची तत्काळ अटक करण्याची तरतूद आहे.
हिरवंगार शेत होतं. दीड एकरमध्ये
आगस्ता वाणाचं टरबूज लावलं
होतं. पोरांप्रमाणंच पिकाची काळजी
घेतल्याने अवघ्या दीड महिन्यातच
एक-एक टरबूज दोन ते अडीच
किलोचं झालं होतं. मजुरी करणाऱ्या
महिला टरबुजांची काळजी घेत
नाहीत, म्हणून आम्ही तिन्ही जावा
सकाळपासून उन्हातान्हात काम
करायचो. पण, देव कोपला की काय
झालं माहीत नाही. पण, शनिवारी
दुपारनंतर जोरदार वारा सुरू झाला.
त्यानंतर ढग भरून आलं. पाऊस सुरू
झाला आणि उर्वरित. पान १२
पोरांप्रमाणंच पिकांची काळजी घेतली हाे
सचिन वाघलाइव्हरिपोर्ट
मंजिरी, लता आणि गौरी कुंदे या
तिन्ही जावा झालेली हानी सांगताना.
केदारनाथ-बद्रिनाथ यात्रेसाठी
शासकीय यंत्रणा संपूर्ण तयारीत
केदारनाथ-बद्रिनाथ-गंगाेत्री-यमनाेत्रीयाचारधाम
यात्रेवर दाेन वर्षांपूर्वी १७ जून २०१३ ला अालेल्या
भयंकर नैसर्गिक संकटानंतर उद््भवलेल्या
परिस्थितीवर मात करत उत्तराखंड राज्य सरकारने
यावर्षी सुरू हाेणाऱ्या यात्रेसाठी यंत्रणा सज्ज केली
अाहे. ठिकठिकाणी तुटलेले रस्ते व सर्व सुविधा
नव्याने िनर्माण करताना भाविकांसाठी निवास,
प्रवास अाणि सुखकर दर्शन अशा सुविधा उपलब्ध
करून देत त्यांच्या स्वागतासाठी ही देवभूमी सज्ज
झाली अाहे. यात्रा मार्गावरील सर्व कामे यापूर्वी
बाॅर्डर राेड अाॅर्गनायझेशनकडे (बीअारअाे) हाेती.
पण, अाता ती सरकारने लाेकनिर्माण िवभागाकडे
देण्यावरून वेगळाच वाद िनर्माण झाला अाहे.
केदारनाथ यात्रा २४ एप्रिलला सुरू हाेते.
त्यानंतर दर एका िदवसाच्या अंतराने उर्वरित
तीनही िठकाणच्या यात्रा सुरू हाेतात. यात्रेसाठी
महाराष्ट्रातून सर्वाधिक, तर त्यापाठाेपाठ गुजरात
अाणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या उर्वरित. पान १२
भाविकांच्या स्वागतासाठी देवभूमी सज्ज
जयप्रकाश पवार
केदारनाथ (साेनप्रयाग)
दिव्यमराठी
लाइव्हरिपोर्ट
^धार्मिक पर्यटन ही उत्तराखंडची जीवनवाहिनी अाहे. दाेन वर्षांपूर्वीच्या अापत्तीमुळे
चार धाम यात्रा ठप्प झाल्याने त्याचा परिणाम या भागातील जनजीवनावर झाला.
ढगफुटी, भूस्खलन, भूकंप व पाऊस या अापत्ती येथील भागाला नव्या नाहीत. त्यातही
ढगफुटी व भूस्खलनाचे प्रमाण वाढलेले अाहे. मात्र, तरीही भाविकांना अावाहन अाहे
की, कशाचीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावे, त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध
अाहेत. त्यांच्या प्रतिसादामुळेच या भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत हाेईल.
प्रकाशनारायण सत्यनारायण दाभाेळकरशास्त्री, पुराेहित, बद्रिनाथ (श्रीनगर, गढवाल)
भाविकांनी
निडरपणे
चार धाम
यात्रेस यावे
केदारनाथ मंदिराभोवतीचा १२ फुटांचा बर्फाचा थर.
सुकन्या योजनेत उघडली
१ लाख ८० हजार खाती
नवी दिल्ली | मुलींसाठी सुरू
केलेल्या सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत दोन महिन्यांपेक्षा
कमी काळात १.८० लाख खाती
उघडण्यात आली. सर्वांत जास्त
खाती कर्नाटकात, तर कमी खाती
बिहारमध्ये उघडली.
जपानी युवकाचा पायी
चालण्याचा विक्रम
नोमी | जपानच्या २७ वर्षीय
युसुके सुझुकीने २० कि.मी. पायी
चालण्याच्या स्पर्धेत जागतिक
विक्रम नोंदवला. त्याने १ तास
१६ मिनिटे ३६ सेकंदांत हा विक्रम
केला. यापूर्वीचा १ तास १७
मिनिटे २ सेकंदांचा विक्रम योहान
दिनिकाच्या नावे होता.
दिल्लीत महिलांसाठी
‘शक्ती’ कॅब सेवा
नवी दिल्ली | दिल्ली महापालिका
पुढील महिन्यापासून महिलांच्या
सुरक्षेसाठी ‘शक्ती’ ही कॅब सेवा
सुरू करणार आहे. पहिल्या
टप्प्यात २० टॅक्सींचा समावेश
असेल. महिलाच या टॅक्सी
चालवतील.
ज्येष्ठ गांधीवादी नारायण
देसाई यांचे निधन
अहमदाबाद | प्रख्यात गांधीवादी
आणि गुजरात
विद्यापीठाचे
माजी कुलगुरू
नारायण देसाई
यांचे रविवारी
निधन झाले.
ते ९० वर्षांचे होते. देसाई गेल्या १०
डिसेंबरपासून कोमात होते.
मुंबई | ‘परीकथेतील राजकुमारा
स्वप्नी माझ्या येशील का’,
यासारख्या
गीतांनी मोहिनी
घालणाऱ्या
पार्श्वगायिका
कृष्णा कल्ले
( ७ ४ ) यां चे
रविवारी अल्प आजाराने निधन
झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी
अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पार्श्वगायन क्षेत्रातील कार्याचा
गौरव म्हणून त्यांना ‘लता मंगेशकर
जीवनगौरव’पुरस्काराने सन्मानित
करण्यात आलेे होते. त्यांची ‘उठ
शंकरा सोड समाधी,’, ‘फुलं
स्वप्नाला आली गं’ ही गाणी
गाजली होती.
गायिका कृष्णा
कल्ले यांचे निधन
मुंबई | रतन टाटांशी संबंधित एक किस्सा रविवारी समोर आला. मुंबईत
गुरुवारी टाटांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला. टाटांऐवजी
त्यांचे निकटचे सहकारी प्रवीण कादळे यांनी तो स्वीकारला. फोर्डचा
व्यावसायिक बदला कसा घेतला याचा किस्साही त्यांनी सांगितला...
सामान्य लोक अपमानाचा बदला लगेच घेतात, असे म्हटले जाते. पण,
महान लोक त्याला विजयाचे साधन बनवतात. रतन टाटांच्या व्यावसायिक
निर्णयांतून ते लक्षात येते. एक घटना सांगतो... टाटांनी १९९८ मध्ये हॅचबॅक
कार इंडिका लाँच केली. पण, हे लाँचिंग पूर्णपणे अयशस्वी ठरले. लोकांनी
वर्षभर कारला पसंती दर्शवली नाही. विक्री नगण्य होती. तेव्हा लोकांनी
टाटांना कार विभाग विकण्याचा सल्ला दिला. त्यांनीही तो मानला. अनेक
कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. फोर्ड या अमेरिकन कंपनीने स्वारस्य
दाखवले. कंपनीचे उर्वरित. पान १२
जग्वार विकत घेऊन टाटांनी घेतला
फोर्डने केलेल्या अपमानाचा बदला
टाटा
कॅपिटलच्या
कादळेंनी
सांगितला
किस्सा