Divyamarathi provides the all Solapur News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनकभास्करसमूह १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ३ | अंक 300 | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार } गुजरात | महाराष्ट्र } महाराष्ट्र } गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
‘आप’ला भाजपचे पाच
प्रश्न, ‘खोदा पहाड,
निकला चुहा’ :आप
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा
यांचा दौरा संपताच दिल्लीतील
वातावरण तापू लागले आहे. भाजपने
निवडणूक रणनीती बदलली असून
‘घोषणापत्रा’ऐवजी दृष्टिपत्र जाहीर
करणार आहे. ‘आप’ला घेरण्यासाठी
दररोज पाच प्रश्न विचारण्यासही
गुरुवारपासून सुरुवात केली आहे.
आपने त्याची खिल्ली उडवत ‘खोदा
पहाड, निकला चुहा’ म्हटले आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७०
जागांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान
होत आहे. सर्वेक्षणात पिछाडीवर
असलेल्या भाजपचे अध्यक्ष अमित
शहा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची
बैठक घेतली. १२० खासदार, कॅबिनेट
मंत्र्यांबरोबरच सर्वच राज्यांतील
पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले
आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली
स्वत:चदिल्लीनिवडणूकव्यवस्थापन
पाहणार, असे या बैठकीत ठरले आहे.
त्यानंतर भाजपने ‘आप’ला पाच
प्रश्न विचारले. काँग्रेसने ‘यू- टर्न’
म्हणून विचारलेले प्रश्नच भाजपनेही
उपस्थित केले आहेत.
दिल्लीत धुमशान
रणधुमाळी | भाजप ‘घोषणापत्रा’ऐवजी ‘दृष्टिपत्र’ देणार
दिल्लीतील प्रचारादरम्यान एका मुलाशी संवाद साधताना किरण बेदी.
1. दिल्लीतील सत्तेसाठी
‘आप’ने तत्त्वांशी तडजोड
करून काँग्रेसचा पाठिंबा
का घेतला?
2. काँग्रेसच्या माजी
मुख्यमंत्री शीला दीक्षित
यांच्यावर कारवाईच्या
आश्वासनाचेे काय झाले?
3. व्हीआयपी सुरक्षा,
बंगल्याचा फायदा न
घेण्याचे आश्वासन दिले
होते, ते पाळले का नाही?
4. केजरीवाल शपथ
घेण्यासाठी मेट्रोने गेले
होते पण नंतर एसयूव्ही
का वापरली?
5. खासगी जेटमध्ये
प्रवास करणे माझ्या
तत्त्वांच्या विरोधात आहे,
असे केजरीवाल सांगत
होते तर मग खासगी
जेटने प्रवास का केला?
‘आप’चे उत्तर : अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या प्रश्नांची थेट उत्तरे तर दिली नाहीत. ते म्हणाले
की, ‘पडद्यामागून प्रश्न का विचारत आहात? एका मंचावर येऊन चर्चा करायला का घाबरत आहात?’
तत्पूर्वी आपचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, ‘काही मोठे प्रश्न असतील असे वाटले होते. पण भाजपने
जुनेच प्रश्न विचारले. खोदा पहाड, निकला चुहा. भाजपची घबराट त्यातून स्पष्ट दिसत आहे.’
नवी दिल्ली | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. प्रत्येक व्यक्तीच्या
खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी
निवडणुकीच्या वेळी दिले होते. ते पैसे जमा तर केलेच नाहीत, पण
स्वत: मात्र १० लाखांचा सूट घालत आहेत, असे राहुल म्हणाले.
मोदी गरिबांच्या गप्पा तर मारतात,पण उद्योगपतींचेच हित पाहतात.
भाजपने दिल्लीचा विश्वासघात केला आहे. युवकांना रोजगार द्यायचे
सोडून त्यांच्या हातात झाडू देण्यात आल्याचे राहुल म्हणाले.
मोदींनी १५ लाख रुपये जमा केले नाहीत
पण १० लाखांचा सूट घातला : राहुल
‘आप’ला विचारलेल्या प्रश्नांत भाजपकडून जुन्याच कढीला ऊत
वीर जवान ! : महेंद्रनाथ राॅय ४२ राष्ट्रीय
रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. २६
जानेवारीला त्यांना युद्ध सेवा मेडल देऊन गौरवले
होते. २७ जानेवारीला पुलवामा जिल्ह्यात वीरमरण
आले. त्यांनी अतुलनीय कामगिरी बजावली.
कर्नल पित्याला मुलीची अश्रूंची सलामी
नवी दिल्ली | दक्षिण काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना
वीरमरण आलेले कर्नल एम. एन. राॅय यांच्या पार्थिवावर
दिल्ली कॅन्टोन्मेटमध्ये गुरुवारी लष्करी इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना अखेरची सलामी
देताना मुलीला रडू कोसळले. डबडबल्या डोळ्यांनी तिने
सलामी दिली आणि ‘जय महाकाली, आयो गोरखली !’हे
जुने गोरखा युद्धगान म्हटले.
विशेष प्रतिनिधी | पुणे
केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच मदत
न केल्यास साखर कारखानदारी धोक्यात
येईल, असा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी दिला.
व्होडाफोनचे ३२०० कोटी
माफ होऊ शकतात, मग
गरीब शेतकऱ्यांकडे कोण
बघणार? असा सवालही त्यांनी केला.
येत्या १४ तारखेला बारामतीत येणाऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे साखर
उद्योगाच्या समस्या मांडणार का, या प्रश्नावर
"त्यासाठी थांबायची गरजच काय? आताही
दिल्लीला जाऊन मी त्यांना भेटू शकतो,’ असे
पवार म्हणाले.
कारखानदारांच्या प्रश्नांवर चर्चा
करण्यासाठी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष
विजयसिंह मोहिते यांनी गुरुवारी पुण्यात बैठक
अायाेजित केली होती. अध्यक्षस्थानी पवार
होते. बैठकीनंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद
साधला. ‘व्होडाफोन'कडील ३ हजार २००
कोटींच्या करवसुलीबाबत सर्वोच्च न्यायालयात
आव्हान न देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
‘व्होडाफोन'चे ३ हजार २०० कोटी माफ होऊ
शकतात. गरीब शेतकऱ्याचे कोण बघणार,
असा सवाल त्यांनी केला.
व्होडाफोनचे ३२०० कोटी
माफ, शेतकऱ्यांचे काय?
साखर कारखानदारांच्या बैठकीनंतर शरद पवार यांचा सवाल
२ हजार कोटींची मदत हवी
राज्यातील सुमारे ४५० लाख टन उसाचे
गाळप झाले आहे. आणखी ५० टक्के
गाळप व्हायचे आहे. २२ लाख ऊस
उत्पादकांचा ऊस शिल्लक आहे. एफआरपी
ठरली तेव्हा साखरेचा भाव ३१०० रुपये
क्विंटल होता. आता तो २३५० पर्यंत घसरला
अाहे. सरकारने सुमारे दोन हजार कोटींची
मदत न केल्यास साखर उद्योग अडचणीत
येईल, असा इशारा पवारांनी दिला.
प्रतिनिधी । अकलूज
अवैध वाळू तस्करांना दिसता क्षणी
गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. प्रांताधिकारी अमृत
नाटेकर यांनी ही माहिती दिली.
माळशिरस तालुक्यात भीमा नदीतून
अवैध वाळू उपसा करणाऱ्या १४
बोटी महसूल प्रशासनाने पकडल्या.
पैकी ५ नष्ट केल्या. विरोध करणाऱ्या
वाळू चोरांना दिसताक्षणी कमरेच्या
खाली गोळ्या घालण्याचे आदेश
कारवाईवेळी देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि
महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी
शंकरराव जाधव यांच्या आदेशानंतर
नाटेकर यांनी अतिशय गोपनीयता
बाळगून गुरुवारी ही कारवाई केली.
पोलिस उपअधीक्षक तिरुपती काकडे
यांच्यासह विशेष शस्त्रांसह पोलिस
बल तैनात करण्यात आले होते. अवैध
वाळू उपशात कोणत्याही गावचा
सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अथवा
इतर पदाधिकारी आला किंवा प्रत्यक्ष
वाळू उपशात त्याचा हात असल्यास
त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात
येणार आहे. संबंधित पान २ वर
वाळू तस्करांना दिसता
क्षणी गोळ्या घाला
प्रशासनाचे आदेश
वृत्तसंस्था। नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय
भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी
आणि पंतप्रधान कार्यालयातील
राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची सुरक्षा
वाढवून झेड प्लस करण्यात आली
आहे. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ
मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू
झाल्यानंतरच गडकरींनी झेड प्लस
सुरक्षा मागितली होती.
विशेषम्हणजेमंुडेयांच्याअपघाती
मृत्यूला सहा महिने उलटल्यानंतर केंद्र
सरकारने गडकरींना झेड प्लस सुरक्षा
दिली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
यांच्यानंतर झेड प्लस सुरक्षा असलेले
गडकरी हे मोदी मंत्रिमंडळातील दुसरे
कॅबिनेट मंत्री आहेत. अर्थमंत्री अरुण
जेटली यांना झेड दर्जाची, तर उर्वरित
मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे.
राज्यमंत्र्यांमध्ये जितेंद्र सिंह आणि
किरण रिजिजू (गृह) यांना झेड प्लस
सुरक्षा आहे. जितेंद्र सिंह यांच्याकडे
तीन महत्त्वाची खाती अाहेत.
नितीन गडकरी यांना
झेड प्लस सुरक्षा
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
एलपीजी कनेक्शन अाता
कुठूनही मॅनेज करता येणार
नवी दिल्ली | ‘माय एलपीजी
कियॉस्क’च्या माध्यमातून आता
स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर
कोणत्याही ठिकाणाहून सहज
मॅनेज करता येईल. सोबतच
सद्य:स्थिती व सबसिडीचीही
माहिती मिळवता येईल.
बिहारमध्ये आजपासून
एटीएमवर रेशन मिळणार
पाटणा | बिहारमध्ये सरकार
आजपासून रेशनवरील धान्य
एटीएमद्वारे वितरित करणार आहे.
यासाठी धान्य दुकानांबाहेर एटीएम
बसवले आहे. स्मार्टकार्डद्वारे तेथून
धान्य काढता येईल.
शेखर सेन संगीत - नाटक
अकादमीचे नवे अध्यक्ष
नवी दिल्ली | प्रसिद्ध गायक,
संगीतकार आणि गीतकार
शेखर सेन यांना संगीत-नाटक
अकादमीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त
करण्यात आले आहे. त्यांचा
कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
भारताकडे पुढच्या टी-२०
विश्वचषकाचे यजमान
दुबई | भारत २०१६च्या टी-२०
क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद
भूषवणार आहे. उद्घाटन ११ मार्च
व फायनल ३ एप्रिलला होईल.
आयसीसीने गुरुवारी याची घोषणा
केली. विश्वचषकातील नियमही
बदलण्यात आला आहे. फायनल
टाय झाल्यास विजेत्याचा निकाल
सुपर ओव्हरद्वारे लावण्यात येईल.
सविस्तर. स्पोर्ट्स
पर्यावरणासाठी..
चेन्नई | ग्रीन पीस सदस्यांनी ८००
शॉपिंग बॅग्जद्वारे माशाची आकृती
तयार केली आहे. ते पॉलिथिन
प्रदूषणाविरोधात निदर्शने करत होते.
सोलापूर शुक्रवार, ३० जानेवारी २०१५
एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ~३.००
सेन्सेक्स 29681.77
मागील 29,559.18
सोने 28,460.00
मागील 28,600.00
चांदी 41,300.00
मागील 41,500.00
डॉलर 61.86
मागील 61.41
यूरो 69.99
मागील 69.72
सुविचार
व्यक्ती हा आपल्या
विचारांद्वारे निर्मित प्राणी
आहे. तो जो विचार
करतो तेच तो बनतो.
- महात्मा गांधी (पुण्यतिथीनिमित्त अभिवादन)
दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
वारकऱ्याच्या रूपात आई
^चित्ररथाच्या दर्शनी
भागात दाखविलेली स्त्री
ही माझी आई लक्ष्मीबाईची
प्रतिकृती आहे.
चंद्रशेखर मोरे, कला दिग्दर्शक
धार्मिक नव्हे सांस्कृतिक
^वारी हा धार्मिक विषय असल्याने तो
टाळण्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र,
वारी ही राज्याचे सामाजिक व सांस्कृतिक
संचित असल्याचे आम्ही लक्षात आणून दिले.
संजय पाटील, तत्कालीन सांस्कृतिक संचालक
नवी दिल्ली | प्रजासत्ताक
दिन संचलनात सादर
झालेल्या महाराष्ट्राच्या
पंढरीची वारी' चित्ररथाला
प्रथम क्रमांक मिळाला आहे.
एकूण २५ चित्ररथ संचलनात
सहभागी झाले होते. कला
दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे
यांच्या मार्गदर्शनाखाली
६५ कारागिरांनी चित्ररथ
उभारला. मुंबईचे संतोष
भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली
३१ कलाकारांच्या चमूने
राजपथावर त्याचे सादरीकरण
केले होते. संबंधित. पान ३
अाधी धार्मिक म्हणून नाकारलेला
महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिला