Divyamarathi provides the all Jalna News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. जालना. बुधवार. २९ ऑक्टोबर २०१४
अँटिकरप्शन ब्युरोचे
३० सापळे यशस्वी
सरकारी काम करून देण्यासाठी
लाचेची मागणी करणारे लोकसेवक
लाचलुचपत विभागाच्या रडारवर
अाहेत. जालन्यात दहा महिन्यांत
लाचेची मागणी करण्याचे ....
४
पान ३
न्यूज इनबॉक्स
बेल्ट व फायटरने मारहाण
जालना | तू माझ्या बहिणीस का बोलला,
असे म्हणून एकास बेल्ट व फायटरने
मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न
करण्यात आला. सोमवारी रात्री ८ वाजता
अनोखी ज्यूस सेंटरवर ही घटना घडली.
सागर डहाळे, मॅडी ऊर्फ अक्षर व अन्य
दोघांनी अब्दुल रहेमान अब्दुल गफार
रेगीवाले (नुहाणनगर, जालना) यास बेल्ट
व फायटरने मारहाण केली, असे फिर्यादीत
म्हटले आहे. यावरून सदर बाजार पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक परदेशी
करत आहेत.
लग्नाचे अािमष दाखवून
मुलीस पळवले; गुन्हा दाखल
जालना | लग्नाचे अािमष दाखवून मुलीस
पळून जाण्यास सहकार्य करून प्रोत्साहन
दिल्यामुळे तिघांविरुद्ध जाफराबाद पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३०
वाजता जाफराबाद तालुक्यातील कुसळी
येथे ही घटना घडली. मुलीच्या भावाने
अजय ऊर्फ राजू सखाराम देवकर, सखाराम
किसन देवकर, मंगलाबाई यांच्याविरुद्ध
पोलिसांत तक्रार दिली आहे. तपास पोलिस
उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
शेतकऱ्यास मारहाण
जालना | गायरान जमिनीच्या वादातून एका
शेतकऱ्यास तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी
मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या
दिल्या. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी
८ वाजता जाफराबाद तालुक्यातील
काळेगावात हा प्रकार घडला. यात आरोपी
फकीरबा काशीराम बरडे, शंकर फकीरबा
बरडे, सावंत फकीरबा बरडे व राधाबाई
फकीरबा बरडे (सर्व रा.काळेगाव) यांनी
संगनमताने गायरान जमिनीच्या कारणावरून
जनार्दन रामचंद्र बरडे यांना मारहाण केली.
याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा कारवाई |मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिका आिण वाहतूक शाखेने राबवली मोहीम
प्रतिनिधी | जालना
मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या काळात
मोठी गर्दी होते. ग्राहकांच्या गर्दीसोबतच यात
फेरीवाले, रिक्षाचालक आणि ग्राहकांच्या
वाहनांची भर पडते. त्यामुळे अनेक वेळा
गर्दीतून चालणेही अवघड होते. दिवाळीच्या
खरेदीसाठी आठवडाभर हा अनुभव होता.
यात बदल व्हावा यासाठी शहर वाहतूक
शाखा व पालिकेने मंगळवारी बाजारपेठेत
रस्त्यावर आलेले साहित्य हटवण्याची
मोहीम राबविली.
या मोहिमेत रस्त्यावरील विक्रेत्यांना
हुसकावण्यात आले, तर रस्त्यावर आलेले
व्यावसायिकांचे सािहत्य जप्त करण्यात
आले. या समस्येवर कायमस्वरूपी
तोडगा काढण्यासाठी फेरीवाला धोरणाची
अंमलबजावणी करण्याची मागणी केली
जात आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी केंद्र
सरकारने चार वर्षांपूर्वी फेरीवाला धोरण
जाहीर केले. राज्य सरकारही त्या अनुषंगाने
राज्यातील नगरपालिका व महापालिकांच्या
माध्यमातून हे धोरण अंमलात आणले आहे.
जालना नगरपालिकेने गेल्या वर्षभरापासून
तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात अनेक
वेळाबैठकाघेऊनधोरणाचीअंमलबजावणी
करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र
प्रत्यक्षात हे धोरण अद्याप आकारात येऊ
शकले नाही. काही दिवसांपूर्वी पालिकेने
फेरीवाला धोरणानुसार नोंदणी करण्यासाठी
अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू केली होती.
त्यालाविक्रेत्यांचाचांगलाप्रतिसादमिळाला.
जवळपास दोन हजार अर्ज विक्री झाले, तर
१५० ते २०० विक्रेत्यांनी अर्ज दाखल केले.
मात्र, अद्यापही या धोरणाला अंतिम स्वरूप
मिळू शकले नाही. गर्दी कमी करण्यासाठी
हाच एकमेव उपाय असल्याने या धोरणाची
अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी
नागरिकांकडून केली जात आहे.
फेरीवाल्यांचे रस्त्यावरील साहित्य हटवले
पुन्हा कारवाई
^नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत
शुक्रवारी शहरातील सिंधी
बाजार, सराफा बाजार, शिवाजी
पुतळा या मोहीम राबविण्यात आली.
यात रस्त्यातच उभ्या करण्यात येत
असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात
आली. तसेच व्यापाऱ्यांनी रस्त्यावर
ठेवलेले सामानही जप्त करून
पालिकेत जमा केले आहे.
रफिक शेख, पोलिस निरीक्षक, वाहतूक
शाखा, जालना.
महिनाभरात धोरण
^फेरीवाला धोरण तयार झाल्यानंतर
बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची
समस्या कमी होऊ शकेल. हे धोरण
तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
आहे. अर्ज विक्रीला चांगला प्रतिसाद
मिळाला आहे. लवकरच हे धोरण
तयार होईल. धोरण तयार होताच
त्याची कडक अंमलबजावणी करण्यात
येईल.
बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी, जालना,
नगरपालिका.
शहरातून जवळपास दोन हजार
फेरीवाल्यांनी अर्ज घेतले आहे. मात्र,
स्थिर व फिरते फेरीवाले या दोन्ही
वर्गात नोंदणीची कमाल संख्या
ठरवणे, तसेच शहरात फेरीवाला क्षेत्र
घोषित करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची
संमती घेणे आवश्यक आहे. त्याबरोबर
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा मसुदा
तयार केल्यावर तो सर्वसाधारण
सभेत सादर करणे, मंजूर मसुद्यावर
नागरिकांच्या हरकती, शिफारशी
मागवणे, हरकतींची सुनावणी घेऊन
त्याप्रमाणे दुरुस्त्या करणे व मसुदा
सरकारकडे मान्यतेसाठी देण्याच्या
सूचना या धोरणात करण्यात आल्या
आहेत. त्यामुळे पालिकेने हे धोरण तयार
केल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी
बराच वेळ लागू शकतो.
या धोरणानुसार शहरातील फिरते विक्रेते
व स्थिर विक्रेते असे दोन भाग करण्यात
येणार आहे. त्यानुसार पालिकेला
आपल्या हद्दीतील सर्व फेरीवाल्यांचे
सर्वेक्षण करून त्यांची या दोन गटांत
विभागणी करावी लागणार आहे.
त्यानंतर शहर फेरीवाला समिती, प्रभाग
फेरीवाला समिती व प्रभाग फेरीवाला
तांत्रिक समिती अशा ३ समित्या
स्थापन करण्याचे निर्देश आहेत. यात
मुख्यािधकारी, नगररचनाकार, स्थानिक
नगरसेवक व फेरीवाल्यांचे प्रतिनिधी
यांचा समावेश असणार आहे. जालना
पालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी या
कामाला मोठा वेग दिला होता; मात्र
लोकसभा आिण त्यानंतर विधानसभा
निवडणुकांमुळे हे काम पुढे जाऊ शकले
नाही, असे सूत्रांनी सांगितले.
बाजारपेठेत अतिक्रमणे हटवताना अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटाव पथक दाखल होताच काही
विक्रेत्यांनी स्वत:हून आपल्या दुकानांची अतिक्रमणे काढून घेतली, तर पथकाने रस्त्यावर आलेले सािहत्य जप्त करून ट्रॅक्टरमध्ये भरले. या
कारवाईच्या वेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. छाया : नागेश बेनिवाल
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण ठराव महत्त्वाचा
हे करावे
हे करू नका
रस्त्यावरील दुकाने हटवली फेरीवाला धोरणाचे स्वरूप
Áमोकळ्या जागेत अतिक्रमण न
होऊ देता शहर सुशोभीकरणाचा
कार्यक्रम पालिकेने आखावा.
Áमुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी
जाणाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी
सुसज्ज जागा उपलब्ध करून द्यावी.
Áशहरातील मुख्य बाजारपेठेतील
व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील
सामान रस्त्यावर ठेवू नये.
Áवाहनधारकांनी आपली वाहने
रस्त्यावर उभी न करता पार्किंगमध्ये
उभी करावी. ०२ दिवस दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक
पोलिस शाखेच्या वतीने दुचाकी आिण रिक्षांना मुख्य
बाजारपेठेत येण्यासाठी केली होती मनाई.
फेरीवाला धोरणांतर्गत अधिकृत फेरीवाला म्हणून
नोंदणी करण्यासाठी शहरातील जवळपास दोन हजार
फेरीवाल्यांनी पािलकेकडून अर्ज घेतले आहेत, तर
जवळपास २०० फेरीवाल्यांनी हे अर्ज पालिकेकडे
दाखल केले आहेत. त्यामुळे हे धोरण तातडीने
अमलात आणण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शहर विभागामधील या फेरीवाल्यांची
वाढती अतिक्रमणे रोखणे, तसेच सर्व फेरीवाल्यांना
कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत आणणे हा फेरीवाला
धोरणाचा मुख्य उद्देश आहे. नगरपालिकांनी शहरातील
परिस्थितीप्रमाणे आवश्यक ते बदल करून संस्थेचा
कायदा म्हणून धोरण प्रस्थापित करावे व त्याप्रमाणे
अंमलबजावणी करावी, अशा सूचना सरकारने दिल्या
आहेत. त्यानुसार जालना पालिकेला या धोरणाला अंतिम
स्वरूप द्यावे लागणार आहे.
शहरातील काही
व्यापाऱ्यांनी
आपल्या
दुकानांसमोरील
रस्त्यावर साहित्य
ठेवले होते.
यामुळे वाहतुकीस
अडचणी येत होत्या. सदरील कारवाईत व्यापारी,
फळविक्रेत्यांनीही रस्त्यावरच ठेवलेले सामान
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात जप्त
केले, तर काही टपऱ्या आणि हातगाड्या तसेच
विक्रेत्यांचे साहित्य पालिकेच्या पथकाने जप्त केले.
या कारवाईमुळे व्यावसायिकांची मात्र चांगलीच
धावपळ उडाली, तर बाजारपेठेने मात्र काही प्रमाणात
मोकळा श्वास घेतला.
जिल्ह्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण अाहे. त्यामुळे िकमान तापमान १८, तर कमाल तापमान २४ अंशांपर्यंत
पोहोचले आहे. जालना शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर दुपारी टिपलेले हे छायाचित्र. छाया : दिव्य मराठी
ढगाळ वातावरण
भाजपच्या गटनेेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची माहिती मिळताच भोकरदन येथील भाजपच्या
कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष झाला. या वेळी मुकेश चिने, नंदकुमार देशपांडे, राजेश जोशी आदी.
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी
निवड झाल्यानिमित्त आनंदोत्सव
प्रतिनिधी | भोकरदन
भाजप प्रदेशाध्यक्ष देवंेंद्र फडणवीस यांची भारतीय
जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच
भोकरदन शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
आतषबाजी करून तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा
केला.
मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे पक्ष निरीक्षक
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, जे. पी. नड्डा यांच्या
उपस्थितीत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या
नवनिर्वाचित आमदारांच्या विधिमंडळ बैठकीत
भाजपच्यागटनेेतेपदीप्रदेशाध्यक्षदेवंेद्रफडणवीसयांची
निवड झाल्याचे जाहीर होताच भाजप कार्यालयासमोर
कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. या
वेळी मुकेश चिने, नंदकुमार देशपांडे, राजेश जोशी,
किरण देशपांडे, दादाराव सपकाळ, गणेश सामसकर,
गजानन तांदुळजे, विलास मुळे, विराम चिने, सुदाम
बोर्डे, शे. महंमद, विजय मतकर, दीपक मोरे, स. बाबर
अली, जनार्दन कराड आदींची उपस्थिती होती.
भोकरदन येथे भाजपचा जल्लोष
लातूरच्या तुलनेत
जालना पिछाडीवरच
जालना आिण लातूर हे दोन्ही जिल्हे एकाच
दिवशी अस्तित्वात आले. विकासाबाबत
तुलना केली असता जालना शहराचा
विकास खुंटलेलाच
असल्याचे दिसून येते.
प्रशस्त रोड, नाल्या,
डिव्हायडर, ओव्हर
ब्रिज, सिग्नल, दर्जेदार
शैक्षणिक संस्था आदी
बाबतींत लातूरपेक्षा
जालना शहराचा
िवकास कमी आहे.
शहरातून कुंडलिका
आिण सीना नदी वाहते. या दोन्ही नद्यांचे
पाणी पावसाळ्यात अडवल्यास शहराला
पाणीटंचाईचा सामना करावा लागणार
नाही. या कामासाठी सामाजिक संघटना,
नागरिकांनी पाठपुरावा केल्यास या कामाला
चालना मिळू शकते. तसेच सर्वांनी
कर वेळेवर भरून शासनाला सहकार्य
करावे. यामुळे शहराच्या विकासासाठी
प्रशासनालाही पुढाकार घ्यावा लागेल.
शहरातील अतिक्रमणांमुळे अनेकदा
वाहतुकीचा खोळंबा होतो. याचबरोबर
शहरात शौचालयांची संख्या कमी असून
कचरापेट्यांची संख्या अल्प प्रमाणात आहे.
स्वच्छता अिभयानाला गती दिल्यास या
अिभयानाला सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळेल
आणि शहर स्वच्छ आिण सुंदर व्हायला वेळ
लागणार नाही. शब्दांकन : लहू गाढे
विनायक
कल्याणकर
उपाध्यक्ष, महाराष्ट्र
बसव परिषद.
जमिनीच्या वादातून
राजेवाडी येथे
जावयाचा खून
प्रतिनिधी | जालना
जमीन नावे करून दे, असे म्हणून
लाठ्या-काठ्याने मारहाण करून
जावयास िजवे मारल्याची घटना
बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे
सोमवारीसायंकाळी७वाजताघडली.
हरिसिंग नरसिंग घुसिंगे (राजेवाडी,
ता. बदनापूर) असे मृताचे नाव आहे.
मृत हरिसिंग घुसिंगे व त्याचे
सासरे हे राजेवाडीतच राहतात.
दरम्यान, माझ्या मुलीच्या नावे जमीन
करून दे, असे सासरे मृत हरिसिंग
यास म्हणत होते. यावरून त्यांच्यात
वाद होत असत. मंगळवारी वाद
विकोपाला गेला व तुंबळ हाणामारी
झाली. लाठ्या-काठ्यांनी झालेल्या
मारहाणीत हरििसंगला जबर मार
लागूनत्याचामृत्यूझाला.याघटनेनंतर
परिसरात मोठी गर्दी झाली होती.
याप्रकरणी मृताची आई झुंबरबाई
नरसिंग घुसिंगे यांनी बदनापूर पोलिस
ठाण्यात तक्रार दिली. यावरून नंदाबाई
हरसिंग घुसिंगे, नंदू मन्साराम नायमन,
मन्साराम आसाराम घुसिंगे, िदराबाई
मन्साराम घुसिंगे यांच्यािवरुद्ध खुनाचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अिधक तपास सहायक
पोलिस निरीक्षक पंकज जाधव
करत आहेत.
मतदान केल्यावरून
जबर मारहाण
प्रतिनिधी | जालना
घरासमोर बसलेल्या दोघा भावांना
मतदान कोणाला केले, अशी
विचारणा करून मारहाण केल्याची
घटना जालना तालुक्यातील नंदापूर
येथे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०
वाजता घडली.
बाबासाहेब कचरू खरात व
त्यांचा भाऊ संतोष दोघे घरासमोर
बसले होते. त्या वेळी बबन चांदगुडे,
प्रल्हाद चांदगुडे, दीपक चांदगुडे,
मनोज चांदगुडे व बाबूराव चांदगुडे
यांनी संगनमत करून तुम्ही मतदान
कोणास केले अशी विचारणा केली.
तसेच काठीने मारहाण करण्यास
सुरुवात केली. या वेळी बाबासाहेब
यांचे वडील सोडवण्यास आले
असता त्यांना शिवीगाळ करून
जिवे मारण्याची धमकी दिल्यावरून
तालुका ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
सभापतींना खातेवाटप तसेच वार्षिक अहवालास मंजुरी दिली जाणार असल्याने बैठकीकडे सर्वांचे लागले लक्षखातेवाटप
शुक्रवारी होणार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा
प्रतिनिधी | जालना
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा
शुक्रवारी कै. यशवंतराव चव्हाण
सभागृहात आयोजित करण्यात आली
असून यात सभापतींचे खातेवाटप
होणार आहे.
गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष
पदाची निवड करण्यात आली, तर
१ ऑक्टोबर रोजी ४ सभापतींची
निवड झाली. मात्र, प्रत्यक्षात खाते
वाटप झाले नव्हते. यामुळे आता
३१ ऑक्टोबर रोजी खाते वाटप
करण्यासाठी सर्वसाधारण सभा
बोलावली आहे.
मुंबईचा बेत फसला
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर ३१
ऑक्टोबर रोजी नव्या सरकारचा
शपथविधी आहे. जिल्हा परिषदेचे
पदाधिकारी-सदस्य हा सोहळा
पाहण्यासाठी जाणार होते. तशी
तयारीसुद्धा करण्यात आली होती.
यामुळे ३१ रोजी खातेवाटपासाठी
होणारी सर्वसाधारण सभा पुढे
ढकलावी, अशी मागणी काही
सदस्यांनी प्रशासनास केली. मात्र,
सभापती निवड झाल्यानंतर ३०
दिवसातखातेवाटपकरणेअसानियम
असल्यामुळे सभा पुढे ढकलणे शक्य
नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात
आले. यामुळे निवडक सदस्यच
मुबईत जातील उर्वरित सदस्य येथेच
सभेला थांबणार असल्याचे सुत्रांनी
सांिगतले. मात्र, अध्यक्ष तुकाराम
जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही
बैठक होणार आहे .
जिल्हा परिषदेतील संख्याबळ
भाजप १५
शिवसेना १५
राष्ट्रवादी १६
काँग्रेस ४
मनसे १
अपक्ष ४
एकूण ५५
युती-आघाडीच्या
ओढाताणीत निवड
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना-
भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जागा
वाटपावरून चांगलीच ओढाताण झाली होती.
दरम्यान, युती-आघाडी तुटते की काय अशी
स्थिती होती.
याच धामधुमीत २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदी
भाजपचे तुकाराम जाधव व उपाध्यक्ष म्हणून
शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांची सर्वानुमते
निवड झाली. दरम्यान, २५ रोजी युती-आघाडी
तुटली. यामुळे सभापती निवडीत काय होते
याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, वरती युती तुटली
तरी जिल्हा परिषदेत युती कायम राहिली व
ठरल्याप्रमाणे १ ऑक्टोबर रोजी भाजपला २, तर
शिवसेनेला २ सभापतिपदे मिळाली.
खातेवाटप असे होईल
अध्यक्षांकडे सिंचन व पाणीपुरवठा खाते, तर उपाध्यक्ष
बांधकाम व वित्त खाते होते. ही पदे जैसे थे राहण्याची शक्यता
असून तुकाराम जाधव यांच्याकडे सिंचन व पाणीपुरवठा, तर
अनिरुद्ध खोतकर यांना बांधकाम व वित्त खाते मिळेल. तसेच
ए. जे. बोराडे : शिक्षण व आरोग्य, लीलाबाई लोखंडे : कृषी व
पशुसंवर्धन, मीनाक्षी कदम : महिला व बालकल्याण, शहाजी
राक्षे : समाजकल्याण अशा पद्धतीने खातेवाटप होईल.
प्रतििनधी | जालना
तालुक्यातील पीरकल्याण, मान
देऊळगाव, नाव्हा, कडवंची परिसरात
रानडुकरांचा वावर वाढला आहे. ही
रानडुकरे पिकांची प्रचंड नासाडी करत
असल्याने शेतकरी हवालदिल झाले
आहेत. वन विभागाने या प्राण्यांचा
बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
अपुऱ्या झालेल्या पावसामुळे
कपाशी, तुरीचे पीक सुकत चालले
आहे. तसेच उसाचेही मोठ्या प्रमाणात
नुकसान होत आहे. त्यातच अनेक
ठिकाणी कपाशीवर लाल्या, पिठ्या
ढेकणाचा प्रादुर्भाव झाला आहे.
उत्पादनापूर्वीच कपाशी पूर्णपणे लाल
पडली आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या
प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण
झालली आहे.
सध्या शेतातील शाळू ज्वारी,
हरभरा या पिकांचे रानडुकरांकडून
मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या शोधात फिरत
असलेल्या वन्यप्राण्यांचा वावर
बिनधास्त वाढत चालला आहे.
सोमनाथ, जळगाव, बाजीउम्रद,
नाव्हा, वखारी, वडगाव या परिसरात
ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
यामुळे सदरील रानडुकरे दिवसा
उसाचा आधार घेतात. या रानडुकरांना
हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास
ते अंगावर धावून येतात. यामुळे
शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात
जाण्यास धजावत नाही. वन विभागाने
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची
मागणी होत आहे.
रानडुकरांकडून उसाची नासाडी
शेतकरी रात्री शेतात
जाण्यास धजावत नाहीत
जालना ते भोकरदन
रस्त्यांची दुरवस्था
प्रतििनधी | भोकरदन
जालना ते भोकरदन या मार्गावर अनेक
गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था
झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे
खड्डे पडल्याने वाहनधारकांसह
पादचारीही त्रस्त झाले आहेत. या
खराब रस्त्यामुळे अनेकदा अपघातही
झालेले आहेत.
भोकरदन ते जालना ६०
िकलोमीटर अंतर असून या रस्त्यावर
जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
या रस्त्यावरून वाहन चालविताना
वाहनधारकांचे हाल होत आहेत.
औरंगाबाद, सिल्लोड, जालना,
जळगाव, विदर्भाकडे जाण्यासाठी
या रस्त्याचा अवजड वाहनधारकही
वापर करतात. मात्र, या रस्त्याची
अनेक दिवसांपासून दुरुस्ती झालेली
नसल्यामुळे िठकठिकाणी खडी
उखडलेली आहे. अनेेक पुलांचे
कठडेही गायब झाले आहेत. यामुळे
या रस्त्यावरून अनेकदा अपघात
झालेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा
अपघात तसेच वाहनांचे नुकसान
होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांची
कामे होणे अत्यंत गरजेचे असून
सार्वजनिक बांधकाम विभागाने
या गरजेच्या परंतु तितक्याच गंभीर
प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होत
आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात
यावी, अशी मागणी होत आहे.
वाहनधारकांसह
पादचारीही झाले त्रस्त