1. प्रश्र्न : बादशाह औरंगजेब च्या दक्षिण धोरणाचे वर्णन करा.
प्रस्तावना :
बादशहा औरंगजेब शहाजानचा तिसरा मुलगा होता. वडलांना क
ै देत टाक
ू न तो 1659 मध्ये बादशाह झाला.
औरंगजेब प्रखर बुद्धिमान होता. त्याला अरबी, फारसी, तुर्की व हिंदी भाषा अवगत होत्या, क
ु रानचे त्याला ज्ञान
होते. परंतु ललीत कलांमध्ये आवड नव्हती.
औरंगजेब उत्तम सैनिक व सैन्य संचालक होता. दक्षिणेचा सुभेदार असताना तिथे लावलेल्या उत्तम
व्यवस्थेमुळे तो क
ु शल शासन प्रबंधक व क
ु टनीतीज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या पूर्वजांप्रमानेच
विस्तारवादी धोरणाचा स्वीकार क
े ला व दक्षिण भारताच्या विजयासाठी दक्षिण मोहीम काढली.
औरंगजेबचे दक्षिण धोरण :
औरंगजेबाने आपल्या दक्षिणच्या दुसऱ्या सुभेदारीत (1652-1657) असताना विजापुर व गोवळकोंडा हे
शियापंथीय राज्य जिंकण्याचा प्रयत्न क
े ला. परंतु त्यानंतर वारसाहक्काचे युद्ध व उत्तरेच्या राजकारणातील व्यस्त
घडामोडींनी तो 1681 पर्यंत उत्तरेचा राजकारणातच गुंतून होता. त्यानंतर मात्र तो दक्षिणेवर चालून आला व 1707
पर्यंत दक्षिणेतच राहिला.
औरंगजेबाच्या दक्षिण मोहीमेची कारणे :
1. दक्षिणेतील स्वतंत्र राज्य जिंक
ू न घेणे -:
औरंगजेब साम्राज्य विस्तारवादी शासक असल्याने त्याला दक्षिणेतील स्वतंत्र राज्य जिंकायची होती.
2. धार्मिक उद्देश :
औरंगाबादचे राजकीय धोरण राजनैतिकते बरोबरच धार्मिकही होते. संपूर्ण भारत जिंक
ू न भारताला
सुन्नी पंथीय इस्लाम करणे हा त्याचा हेतू होता त्यामुळे दक्षिणेतील शियापंथीय व मराठा राज्याचा शेवट
करण्यासाठी त्याने दक्षिण मोहीम काढली.
3. मुगलांच्या विरोधकांचा आश्रय नष्ट करणे :
दक्षिणेतील राज्य मुगल साम्राज्याच्या विरोधकांना आश्रय देत असल्याने ते नष्ट करणे या
मोहिमेमागे त्याचा उद्देश होता.
4. विशाल फौजेला युद्धात गुंतविणे :
वायव्येकडील स्वारीतून मुक्त झालेल्या विशाल मुगल फौजेला युद्धात गुंतविणे आवश्यक होते.
औरंगजेबचा दक्षिण विजय :
1. राजपुत्र अकबरने बंडे करून दक्षिणेत मराठ्यांकडे आसरा घेतला तेव्हा अकबराचा बंदोबस्त करणे व
दक्षिण विजयासाठी औरंगजेब आपली विशाल सेना व साधन सामग्रीसह 1682 मध्ये दक्षिण आला.
मराठ्यांना गोवळकोंडा व विजापूरची असलेली मदत लक्षात घेऊन त्याने विजापूर 1686 व गोवळकोंडा
1687 आक्रमण करून जिंक
ू न घेतले व मोगल साम्राज्यात विलीन क
े ले.
2. च्यविजापूर व गोवळकोंड्याच्या शेवटानंतर औरंगजेबने मराठी राज्यावर आक्रमण क
े ले. छत्रपती
संभाजींनी 9 वर्ष मुघलांशी कडवी झुंज दिली. परंतु औरंगजेबाने 1689 मध्ये मराठ्यांची राजधानी रायगड
जिंकला व संभाजीला पकडून ठार क
े ले. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रावर व दक्षिण भारतावर मुगलांचा
अधिकार होऊन औरंगजेबचा दक्षिण भारत विजय पूर्ण झाला.
2. 3. राज्य जिंकले असले तरी औरंगजेबाला मराठा राष्ट्र नष्ट करता आले नाही. संभाजीच्या मृत्यूनंतर
छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई यांचे नेतृत्वात लोकयुद्ध सुरू क
े ले आणि अनेक आघाड्यांवर
मुगलांचा पराभव क
े ला. मराठ्यांचे हे स्वातंत्र्य युद्ध औरंगजेबच्या अखेरपर्यंत (१७०७) सुरू होते.
मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाने औरंगजेबाच्या दक्षिण विजयाची विफलता स्पष्ट होऊन त्याचे दक्षित
धोरण अपयशी ठरले.
औरंगजेबाच्या दक्षिण अपयशाची कारणे :
1. सर्व जनता मराठ्यांच्या पाठीशी :-
सर्व भारत इस्लाममय करणे हे औरंगजेबचे उद्दिष्ट होते. त्यामुळे स्वधर्म वाचविण्यासाठी सर्व
हिंदू मराठ्यांच्या पाठीशी उभे राहिले.
2. शियापंथीय मुस्लिमांची मराठ्यांना मदत :-
औरंगजेबाने शियापंथीय मुस्लिमांची प्रतारणा क
े ल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध मराठ्यांना मदत
क
े ली.
3. औरंगजेब चा संशयी स्वभाव :- औरंगजेबचा कोणावरच विश्वास नव्हता तो सर्वांकडे संशयी वृत्तीने पाहत
असे. त्यामुळे त्याच्या सेनानींमध्ये विद्रोही प्रवृत्ती निर्माण झाली.
4. मराठ्यांची मारक क्षमता :-
मराठ्यांच्या मारक शक्तीपुढे मुगल फौज व अधिकाऱ्यांची मारक क्षमता कमी पडली. त्यामुळे ते
मराठ्यांचा यशस्वी मुकाबला करू शकले नाही.
5. डोंगराळ प्रदेश व मराठ्यांचा गनिमी कावा:-
मोगल सैन्य मैदानी भागात लढणारे, ऐसआरामात जगणारे होते. त्यामुळे त्यांना दक्षिणेतील
खडतर स्थिती व मराठ्यांच्या गनिमी कावा युद्धपद्धतीचा मुकाबला करता आला नाही.
6. लोक युद्धात लोकांना विजय मिळतात :-
शत्रू कितीही प्रबळ असला तरी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या युद्धात शेवटी विजय लोकांनाच मिळत
असतो. या इतिहासाच्या साक्षीनुसार मराठ्यांना विजय मिळाला.
औरंगजेबच्या दक्षिणाचे परिणाम :
1. भारत इस्लाममय झाला नाही :- औरंगजेब त्याच्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी झाला नाही. त्यामुळे संपूर्ण
भारत इस्लाममय झाला नाही.
2. मुगल सत्ता दुर्बळ झाली :- मुगल -;मराठा युद्धाने क
ें द्र सत्ता दुर्बळ झाली त्यामुळे उत्तरेतील शांतता नष्ट
झाली.
3. मुगलांविरुद्ध उत्तरेत बंड :- औरंगजेब दक्षिणेत असल्याने व तो त्याच्या कार्यात असफल ठरल्याने मुघल
साम्राज्याविरुद्ध उत्तरेत बंडास सुरुवात झाली.
4. लष्करी शक्ती क्षीण झाली:- मुगलांची मोठ्या प्रमाणात सैन्य व लष्करी सामग्रीची हानी झाल्याने त्यांची
लष्करी ताकद कमी झाली.
5. खजिना रिकामा झाला:- युद्ध दीर्घकाळ चालल्याने मोठ्या प्रमाणात खर्च झाला. परिणामी तिजोरी
रिकामी होऊन मुघल साम्राज्याचा आर्थिक पाया कमक
ु वत झाला.