1. बौद्ध धर्मातील पंथ
इतर धर्मांप्रमाणेच बौद्ध धर्मामध्ये ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानावरून बौद्ध अनुयायांमध्ये मतभेद निर्माण
झाले. त्यातूनच अनेक पंथांची निर्मिती झाली त्यातील हीनयान पंथ व महायान पंथ हे प्रमुख आहे.
हीनयान पंथ
1. हीनयान पंथ कट्टरपंथी भिक्षूंचा आहे. याचे मुळ धर्म रूप कायम आहे.
2. हिनयान पंथीय क
े वळ बुद्धांचे उपदेश मान्य करतात.
3. हीनयान पंथाचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे व त्याचा विस्तारही मर्यादित आहे.
4. यांच्या मते मुळ धर्म सिद्धांतात बदल करणे म्हणजे धर्मा विरुद्ध कार्य आहे.
5. यांचा बुद्धाला अवतार मानून पूजा करण्याच्या पद्धतीला विरोध आहे.
6. हा पंथ प्रतीक स्वरूपात पूजा करतात. उदाहरणार्थ स्तूप.
7. हीनयान पंथीयांनी ग्रंथ निर्मिती पाली भाषेत क
े ली आहे.
8. अहर्त किं वा निर्वाण यांचे अंतिम लक्ष असते. सदाचार आणि सत्कर्म निर्वाण प्राप्तीचा मार्ग मानतात.
9. हीनयान पंथीयांचा भर व्यक्तिगत निर्वाण प्राप्ती वर जास्त होता.
10. या पंथाचा विस्तार श्रीलंका व भारतात मर्यादित स्वरूपात होता.
महायान पंथ
1. महायान पंथ सुधारणावादी आहे. तो बुद्धाला आदर्श मानतात
2. महायान पंथीय काळानुसार बौद्ध धर्म सिद्धांतात बदल करतात.
3. बुद्धाच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करणे या पंथीयांनी सुरू क
े ले.
4. धर्म सिद्धांताबरोबरच तंत्र-मंत्र इत्यादी गोष्टीही आत्मसात क
े ल्या.
5. व्यक्तिगत मुक्ती ऐवजी सर्वांचे कल्याण हा या पंथाचा मुख्य उद्देश होता.
6. या पंथाने साहित्यनिर्मिती संस्कृ त व पाली भाषेत क
े ली आहे.
7. या पंथाने अश्वघोष, वसुबंधू, नागार्जुन यांच्या सारखे प्रकार पंडित भारताला दिले.
8. या पंथाचा प्रसार भारताबरोबरच आशिया खंडात मोठ्या प्रमाणात झाला.
बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारणे
1. सरळ सिद्धांत
2. वैदिक धर्म तत्वाचा विरोध
3. लोक भाषेचा स्वीकार
4. गौतम बुद्धाचे व्यक्तिमत्व
5. बौद्ध धर्माला मिळालेला राजाश्रय
6. बौद्ध संघ
बौद्ध धर्माच्या मर्यादित विस्ताराची कारणे
1. राजाश्रय नष्ट झाला
2. 2. मूळ सिद्धांत बदल
3. बौद्ध धर्मातील पंथभेद
4. बौद्ध संघातील भ्रष्टाचार
5. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन
6. विदेशी आक्रमणे
बौद्ध कला
बुद्धाचा संदेश लोकांपर्यंत पोचविण्यासाठी बौद्ध धर्माने कलेचा आश्रय घेतला. परिणामी बौद्ध कला
विकसित होत गेली. त्यातूनच स्तूप, चैत्य, विहार, लेण्या, मूर्ती, चित्रकला इत्यादींची निर्मिती झाली.
बुद्ध किं वा बौद्ध साधूंच्या अस्तींवर बांधलेल्या स्मारकांना स्तूप असे म्हणतात. याचा आकार
अर्धगोलाकृ ती दिसतो.
बुद्धाच्या अस्तींवर क
ु शीनगर, राजगृह, पावा, वैशाली, कपिलवस्तु इत्यादी ठिकाणी स्तूप बांधण्यात
आले. सम्राट अशोकाने 84 हजार स्तूप बांधले याचे उल्लेख आढळतात.
सांचीचा स्तूप आपल्या भव्य बांधकामासाठी व चारही बाजूच्या प्रवेशद्वारावरील कलाकृ तींमुळे प्रसिद्ध
आहे. तो वास्तुकलेचा उत्कृ ष्ट नमुना मानला जातो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात सम्राट कनिष्काने पुरुषपूर
(पेशावर) येथे बांधलेला स्तूप गांधार शैलीचा उत्कृ ष्ट नमुना आहे.
बौध्दांची चित्रकला पर्वत. लेणी व मंदिराच्या भिंती इत्यादींमध्ये आढळते. अजिंठा-वेरूळ व बाघ येथील
लेणी आपल्या स्थापत्यकले बरोबरच चित्रकलेसाठीही प्रसिद्ध आहे. अजिंठा येथील सतराव्या गुंफ
े तील आई व
मुलगा बुद्धाला भिक्षा देत असल्याचे चित्र उत्कृ ष्ट आहे.
बुद्धाच्या पाषाण व ब्रांझच्या अनेक मूर्ती तयार झाल्या. भारहुत, गया, नागार्जुनकोंडा व अमरावती
येथील मूर्ती कलात्मक आहे. सारनाथ येथील ब्रांझची बुद्धमूर्ती, बौद्ध मूर्तिकलेचा उत्तम नमुना आहे.
बौद्ध भिक्षू च्या तपश्चर्या व ध्यानधारणेसाठी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून चैत्य निर्मिती होऊ
लागली तर सम्राट अशोकाच्या काळापासून पर्वत खोदून लेणी निर्माण क
े ल्या जाऊ लागल्या.
बौद्ध धर्माचा सांस्कृ तिक प्रभाव
1. अंधश्रद्धा विरुद्ध सामाजिक जागृती
2. नैतिक आचरण
3. अहिंसेला महत्व
4. बौद्ध संघाची निर्मिती
5. बोली भाषेचे महत्व वाढले
6. समानतेची शिकवण
7. सामाजिक संस्कृ ती क
े क
े
8. मूर्ती पूजेचा प्रसार
9. भारतीय संस्कृ तीचा विदेशात प्रसार.