मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. २७ जून २०१४ रोजी झालेल्या १३४ व्या बैठकीत कल्याण आणि भिवंडीला जोडणाऱ्या खाडीवर दुर्गाडी किल्ल्यानाजिक सध्या अस्तित्त्वात असलेल्या पुलानजीक सहा पदरी पूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच कोपर ते टिटवाळा रिंगरूट प्रकल्पही ह्याच बैठकीत मंजूर करण्यात आला ९ ऑक्टोबर २०१२ पासून आपले कार्यवंत आमदार श्री प्रकाश भोईर दोन्ही प्रकल्पांसाठी पाठपुरावा करत आहेत. कल्याणच्या खासदारांनी दोन दिवस पत्र व्यवहार केल्यानंतर, त्यांच्या प्रयत्नाने सदर प्रकल्पांचे काम मंजूर झाल्याच्या बातम्या काही वर्तमानपत्रात छापून आलेल्या आहेत. शासन दरबारी कोणताही प्रकल्प २ दिवसात मंजूर होत नाहीत. आम्ही जनतेच्या माहितीसाठी आमदारांच्या पत्रव्यवहारातील काही महात्त्वाची पत्रे समोर ठेवत आहोत. सर्वप्रथम मागणी आणि सततचा पाठपुरावा फक्त आणि फक्त आमदार साहेबांनी केलेला आहे. आता सुज्ञ जनतेने ठरवावे काय खरे ? आणि काय खोटे ?.