2. असूराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा
नातू आणि विरोचनाचा पुत्र होता.
बळीराजा राक्षसकु ळात जन्म घेऊनही
चारित्र्यवान, विनयशील प्रजादक्ष राजा
होता. दानशूरात अग्रेसर होता. त्याची
शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने
देवांचाही पराभव के ला. देवांचे स्वातंत्र्य
हरवले. मग बळीराजाला हरवण्यासाठी
विष्णूची निवड करण्यात आली. एकदा
बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर
दानधर्माची पद्धत होती.
3. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण
के ला आणि बटूवेशात बळीराजा समोर
उभे झाले. बळीने विचारले ‘काय
पाहिजे’ बटू म्हणाला ‘मी मागेल ते तुला
द्यावे लागेल, असे वचन दे’. बळी
म्हणाला ‘मी वचन देतो, तुला हवे ते
माग’. बटू म्हणाला ‘तिन्ही लोकांवर तुझे
राज्य आहे. मला तीन पावले जमीन दे’.
बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता.
4. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण
के ले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू
लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या
डोक्यावर ठेवले. बळीराजा
पाताळलोकात गेला. हा राजा जनतेची
काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य
अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात
अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना
म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य
येवो" अशी म्हण रूढ आहे.
5. याच दिवशी बळीराजा आपल्या
शेतात राबणाऱ्या जनावरांची
मनोभावे सेवा करतो. तसेच या
दिवशी गाय, बैल आणि इतर
जनावरांना अंघोळ घालून धूप, चंदन
व फु लांचा हार घातला जातो.
गोमातेला मिठाई भरवल्यानंतर
तिची पूजा के ली जाते.
6. मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या दिवट्या
करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले
जाते. येथेही शेणाच्या गवळणी तयार के ल्या जातात. डोक्यावर
दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार
करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक के ला जातो.
ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात या दिवशी दारासमोर
तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत
चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकू ण पाच शेणगोळे
ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे
फू ल वाहिले जाते.
7. धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण.
मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी
लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या
गळ्यात हळकुं डाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात
पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न
लावलें जातें.
पाठारे प्रभू समाजातील घराघरांत घोड्यावर बसलेल्या बळीराजाची
मूर्ती असते. या दिवशी पहाटेच प्रभू गृहिणी घरातला के र-कचरा
काढते आणि घराबाहेर टाकायला जाताना थाळा वाजवत म्हणते-
इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. हे बळीचें राज्य म्हणजे
अर्थातच शेतकरी राजाचें राज्य.
8. आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-
बकऱ्यांच्या गळ्यात फु लांच्या माळा घालून
त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप
करून त्याच्यात दिवे पाजळतात.
बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले
गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात.
गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार
के लेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून
ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय
बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत
नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना
कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची
श्रद्धा आहे. याला आदिवासी 'ढोर उठवणे'
असे म्हणतात.
9. गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा
मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. यासाठी
बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते
ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृ ती करून त्याची पूजा
करतात.
अन्नकू ट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. विविध प्रकारची
पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृ ष्णाच्या मूर्तीच्या पुढे
मांडणे व कृ ष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकू ट म्हणतात.
10. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे.
पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर
इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.
श्रीकृ ष्णाने इंद्रदेवाच्या क्रोधापासून
गोकु ळवासीयांना वाचवण्यासाठी गोवर्धन
डोंगर आपल्या करंगळीवर उचलला.
श्रीकृ ष्णाचा अवतार जाणून घेतल्यावर त्यांनी
श्रीकृ ष्णाची माफी मागितली. सातव्या दिवशी
भगवान श्रीकृ ष्णाने गोवर्धन पर्वत खाली
ठेवला तेव्हा ग्रामस्थांनी आनंदाने व सन्मानार्थ
अन्नकू ट साजरे के ले.
11. या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. पाडवा हा
साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या
वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ
करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या
नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत.
12. 'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कु णाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कु णाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...'
इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो